शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

जोडणी न देताच ४० हजारांचे वीजबिल, प्रधानमंत्र्यांना जोडणीसाठी पत्र लिहिणाऱ्या शेतकऱ्याला शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 17:52 IST

वीज जोडणी दिलीच नाही तर सदर शेतकऱ्याला ४० हजार रुपयांचे वीज बिल देण्यात आल्याची घटनाही समोर आली आहे.

वैजापूर (जि. औरंगाबाद): तालुक्यातील घायगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कृष्णा रुस्तुम धने यांना कोटेशन भरून नऊ वर्षे झाली. मात्र, वीज जोडणी मिळाली नाही, त्यात महावितरणचा कहर म्हणजे सदर शेतकऱ्याला चाळीस हजारांचे वीजबिल दिले आहे. महावितरणने हा प्रकार केवळ धने यांच्याबाबतच केलेला नसून, तालुक्यातील सहा हजार जण या भोंगळ कारभाराचे चटके सहन करीत असल्याचे समोर आले आहे.

घायगाव येथील शेतकरी कृष्णा धने यांची गट नंबर १२६ मध्ये शेती आहे. जवाहर रोजगार योजनेंतर्गत शासनाच्या निधीतून २००८ साली त्यांनी या शेतात विहीर खोदली. यानंतर, त्यांनी वीज जोडणीसाठी ५ हजार ३०० रुपये इतके कोटेशन २०१३ साली भरले आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत जोडणी देण्यात आलेली नाही. गेल्या नऊ वर्षांपासून ते सतत महावितरण कार्यालयात चकरा मारीत आहेत. पर्याय नसल्याने ते तेव्हापासून डिझेल पंपाचा पाणी उपसण्याकरिता वापर करीत आहेत. यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनाही निवेदन पाठविले. मात्र, दखल घेतली गेली नाही. शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून वीज जोडणी देण्याची विनंती केली आहे. ‘लोकमत’ने याबाबत २६ मार्च रोजी ‘मोदीजी चकरा मारून थकलो, आता तरी वीज द्या’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्याने संबंधित विभागाची सारवासारव सुरू आहे. त्यात सदर शेतकऱ्याला ४० हजार रुपयांचे वीज बिल देण्यात आल्याची घटनाही समोर आली आहे. धने हे आकडा टाकून वीज वापरत असल्याचा जावईशोध लावून सदर बिल देण्यात आल्याचे कार्यालयाकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, एकटे धनेच नाही, तर तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे.

 

अंदाज, तर्कांवर वीजबिल

२०११ साली महावितरणने ‘महावितरण आपल्या दारी’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत पाच खांबाच्या आत अंतर असलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी नसली, तरी आकडा टाकून वीजपंप सुरू करण्यास परवानगी दिली गेली होती, असे कार्यालयाचे म्हणणे आहे. तेव्हापासून ज्या शेतकऱ्यांनी जोडणीसाठी कोटेशन भरले, त्यांना वीजबिल सुरू केले. तालुक्यात असे सहा हजार वीजपंपांचे ग्राहक असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हे शेतकरी आकडा टाकतात की नाही, याबाबत कुठलीही पाहणी कंपनी करीत नसून, अंदाज व तर्कांच्या आधारेच कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना वीजबिल दिले जात आहे.

या शेतकऱ्याने ‘महावितरण आपल्या दारी’ या योजनेंतर्गत आकडा टाकून विजेचा वापर केलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांना वीजबिल देण्यात आले आहे.

- राहुल बिडवे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, वैजापूर.

 

मी कधीही आकडा टाकून वीजचोरी केलेली नाही. मी पिकांना पाणी देण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर करीत आहे. सध्या डिझेलचे भावही वाढल्याने मला खूप खर्च येत आहे. यासाठी मी वीज जोडणीसाठी महावितरण कार्यालयात चकरा मारीत आहे.

- कृष्णा रुस्तुम धने, शेतकरी, घायगाव.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानelectricityवीजAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी