शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

जोडणी न देताच ४० हजारांचे वीजबिल, प्रधानमंत्र्यांना जोडणीसाठी पत्र लिहिणाऱ्या शेतकऱ्याला शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 17:52 IST

वीज जोडणी दिलीच नाही तर सदर शेतकऱ्याला ४० हजार रुपयांचे वीज बिल देण्यात आल्याची घटनाही समोर आली आहे.

वैजापूर (जि. औरंगाबाद): तालुक्यातील घायगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कृष्णा रुस्तुम धने यांना कोटेशन भरून नऊ वर्षे झाली. मात्र, वीज जोडणी मिळाली नाही, त्यात महावितरणचा कहर म्हणजे सदर शेतकऱ्याला चाळीस हजारांचे वीजबिल दिले आहे. महावितरणने हा प्रकार केवळ धने यांच्याबाबतच केलेला नसून, तालुक्यातील सहा हजार जण या भोंगळ कारभाराचे चटके सहन करीत असल्याचे समोर आले आहे.

घायगाव येथील शेतकरी कृष्णा धने यांची गट नंबर १२६ मध्ये शेती आहे. जवाहर रोजगार योजनेंतर्गत शासनाच्या निधीतून २००८ साली त्यांनी या शेतात विहीर खोदली. यानंतर, त्यांनी वीज जोडणीसाठी ५ हजार ३०० रुपये इतके कोटेशन २०१३ साली भरले आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत जोडणी देण्यात आलेली नाही. गेल्या नऊ वर्षांपासून ते सतत महावितरण कार्यालयात चकरा मारीत आहेत. पर्याय नसल्याने ते तेव्हापासून डिझेल पंपाचा पाणी उपसण्याकरिता वापर करीत आहेत. यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनाही निवेदन पाठविले. मात्र, दखल घेतली गेली नाही. शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून वीज जोडणी देण्याची विनंती केली आहे. ‘लोकमत’ने याबाबत २६ मार्च रोजी ‘मोदीजी चकरा मारून थकलो, आता तरी वीज द्या’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्याने संबंधित विभागाची सारवासारव सुरू आहे. त्यात सदर शेतकऱ्याला ४० हजार रुपयांचे वीज बिल देण्यात आल्याची घटनाही समोर आली आहे. धने हे आकडा टाकून वीज वापरत असल्याचा जावईशोध लावून सदर बिल देण्यात आल्याचे कार्यालयाकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, एकटे धनेच नाही, तर तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे.

 

अंदाज, तर्कांवर वीजबिल

२०११ साली महावितरणने ‘महावितरण आपल्या दारी’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत पाच खांबाच्या आत अंतर असलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी नसली, तरी आकडा टाकून वीजपंप सुरू करण्यास परवानगी दिली गेली होती, असे कार्यालयाचे म्हणणे आहे. तेव्हापासून ज्या शेतकऱ्यांनी जोडणीसाठी कोटेशन भरले, त्यांना वीजबिल सुरू केले. तालुक्यात असे सहा हजार वीजपंपांचे ग्राहक असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हे शेतकरी आकडा टाकतात की नाही, याबाबत कुठलीही पाहणी कंपनी करीत नसून, अंदाज व तर्कांच्या आधारेच कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना वीजबिल दिले जात आहे.

या शेतकऱ्याने ‘महावितरण आपल्या दारी’ या योजनेंतर्गत आकडा टाकून विजेचा वापर केलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांना वीजबिल देण्यात आले आहे.

- राहुल बिडवे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, वैजापूर.

 

मी कधीही आकडा टाकून वीजचोरी केलेली नाही. मी पिकांना पाणी देण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर करीत आहे. सध्या डिझेलचे भावही वाढल्याने मला खूप खर्च येत आहे. यासाठी मी वीज जोडणीसाठी महावितरण कार्यालयात चकरा मारीत आहे.

- कृष्णा रुस्तुम धने, शेतकरी, घायगाव.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानelectricityवीजAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी