शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

जोडणी न देताच ४० हजारांचे वीजबिल, प्रधानमंत्र्यांना जोडणीसाठी पत्र लिहिणाऱ्या शेतकऱ्याला शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 17:52 IST

वीज जोडणी दिलीच नाही तर सदर शेतकऱ्याला ४० हजार रुपयांचे वीज बिल देण्यात आल्याची घटनाही समोर आली आहे.

वैजापूर (जि. औरंगाबाद): तालुक्यातील घायगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कृष्णा रुस्तुम धने यांना कोटेशन भरून नऊ वर्षे झाली. मात्र, वीज जोडणी मिळाली नाही, त्यात महावितरणचा कहर म्हणजे सदर शेतकऱ्याला चाळीस हजारांचे वीजबिल दिले आहे. महावितरणने हा प्रकार केवळ धने यांच्याबाबतच केलेला नसून, तालुक्यातील सहा हजार जण या भोंगळ कारभाराचे चटके सहन करीत असल्याचे समोर आले आहे.

घायगाव येथील शेतकरी कृष्णा धने यांची गट नंबर १२६ मध्ये शेती आहे. जवाहर रोजगार योजनेंतर्गत शासनाच्या निधीतून २००८ साली त्यांनी या शेतात विहीर खोदली. यानंतर, त्यांनी वीज जोडणीसाठी ५ हजार ३०० रुपये इतके कोटेशन २०१३ साली भरले आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत जोडणी देण्यात आलेली नाही. गेल्या नऊ वर्षांपासून ते सतत महावितरण कार्यालयात चकरा मारीत आहेत. पर्याय नसल्याने ते तेव्हापासून डिझेल पंपाचा पाणी उपसण्याकरिता वापर करीत आहेत. यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनाही निवेदन पाठविले. मात्र, दखल घेतली गेली नाही. शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून वीज जोडणी देण्याची विनंती केली आहे. ‘लोकमत’ने याबाबत २६ मार्च रोजी ‘मोदीजी चकरा मारून थकलो, आता तरी वीज द्या’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्याने संबंधित विभागाची सारवासारव सुरू आहे. त्यात सदर शेतकऱ्याला ४० हजार रुपयांचे वीज बिल देण्यात आल्याची घटनाही समोर आली आहे. धने हे आकडा टाकून वीज वापरत असल्याचा जावईशोध लावून सदर बिल देण्यात आल्याचे कार्यालयाकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, एकटे धनेच नाही, तर तालुक्यातील सहा हजार शेतकऱ्यांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे.

 

अंदाज, तर्कांवर वीजबिल

२०११ साली महावितरणने ‘महावितरण आपल्या दारी’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत पाच खांबाच्या आत अंतर असलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी नसली, तरी आकडा टाकून वीजपंप सुरू करण्यास परवानगी दिली गेली होती, असे कार्यालयाचे म्हणणे आहे. तेव्हापासून ज्या शेतकऱ्यांनी जोडणीसाठी कोटेशन भरले, त्यांना वीजबिल सुरू केले. तालुक्यात असे सहा हजार वीजपंपांचे ग्राहक असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हे शेतकरी आकडा टाकतात की नाही, याबाबत कुठलीही पाहणी कंपनी करीत नसून, अंदाज व तर्कांच्या आधारेच कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना वीजबिल दिले जात आहे.

या शेतकऱ्याने ‘महावितरण आपल्या दारी’ या योजनेंतर्गत आकडा टाकून विजेचा वापर केलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांना वीजबिल देण्यात आले आहे.

- राहुल बिडवे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, वैजापूर.

 

मी कधीही आकडा टाकून वीजचोरी केलेली नाही. मी पिकांना पाणी देण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर करीत आहे. सध्या डिझेलचे भावही वाढल्याने मला खूप खर्च येत आहे. यासाठी मी वीज जोडणीसाठी महावितरण कार्यालयात चकरा मारीत आहे.

- कृष्णा रुस्तुम धने, शेतकरी, घायगाव.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानelectricityवीजAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी