शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी आले ३८४ कोटी; आता चिंता मनपाच्या ८२२ कोटींच्या वाट्याची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 20:10 IST

मनपाच्या वाट्याची रक्कम कर्ज स्वरूपात घेतली तरी मनपाला हफ्ते भरणे अवघड आहे.

छत्रपती संभाजीनगर : निधी संपल्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता होती. परंतु केंद्र आणि राज्य शासनाकडून सोमवारी तब्बल ३८४ कोटी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. २७४० कोटी रुपयांच्या योजनेत मनपाला ८२२ कोटींचा वाटा टाकायचा आहे. ही रक्कम राज्याकडून अनुदान स्वरूपात मिळावी, यासाठी मनपाने नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत.

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, केंद्र शासनाने १३७ कोटी २४ लाख ४९ हजार ९८० रुपये तर राज्य शासनाचे २४६ कोटी ९८ लाख २० रुपये असे एकूण ३८४ कोटी २२ लाख ४९ हजार रुपये सोमवारी संध्याकाळी मनपाच्या खात्यात जमा केले. त्यामुळे आणखी काही महिने योजनेला निधीची कमतरता भासणार नाही. मनपाच्या वाट्याची रक्कम कर्ज स्वरूपात घेतली तरी मनपाला हफ्ते भरणे अवघड आहे. त्यामुळे अनुदान स्वरूपात रक्कम मिळावी, अशी मागणी शासनाकडे केली. मंत्रिमंडळ बैठकीसमोर योजनेच्या कामाचे व्हिडीओ चित्रीकरण सादर केले जाईल. आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाकडून १४२४ कोटी १७ लाख रुपये आले. त्यातील १४१५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

-योजनेचा एकूण खर्च -२७४० कोटी रुपये-केंद्र शासन हिस्सा: २५ टक्के (६८५ कोटी १९ लाख)-राज्य शासन हिस्सा: ४५ टक्के (१२३३ कोटी ३४ लाख) -महापालिकेचा हिस्सा: ३० टक्के (८२२ कोटी २२ लाख)

केंद्र शासनाने हिश्यातील ५०८ कोटी ४७ लाख व राज्य शासनाने ९१५ कोटी ६९ लाख रुपये निधी दिलेला आहे. मनपाने वाटा टाकलेला नाही.शासन.......एकूण हिस्सा.....दिलेला निधी.....प्रलंबित निधी (आकडे कोटीत)केंद्र.............६८५................६४६.............३९राज्य.......१२३३...................११६१.............७२मनपा........८२२...................०.००..............८२२.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका