शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षात वाहनधारकांकडून ३५ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: December 20, 2014 23:34 IST

बीड : वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते़ त्यामुळे त्यांच्यावर वाहतूक पोलीस नेहमीच कारवाई करतात़ वर्षभराच्या कालावधित वाहतूक

बीड : वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते़ त्यामुळे त्यांच्यावर वाहतूक पोलीस नेहमीच कारवाई करतात़ वर्षभराच्या कालावधित वाहतूक पोलिसांनी १९ हजार ८५२ वाहनधारकांवर कारवाई करीत तब्बल ३५ लाख ९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे़जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ त्यांना धाक रहावा म्हणून वाहतूक पोलीस नेहमीच त्यांच्यावर कारवाई करीत दंड ठोठावत असतात़ त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, विरूध्द दिशेने येणे, चौकामध्ये वाहन उभे करणे, परवाना नसणे, अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सीट गाडी चालविणे, वाहनाची कागदपत्रे न बाळगणे, चालत्या वाहनावरून मोबाईलवर बोलणे, रहदारीस अडथळा यासह अनेक बाबींचा समावेश आहे़ वाहतूक पोलिसांच्या वतीने मांजरसुंबा ते गेवराई महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकाची तपासणी करण्यात आली़ तो मद्य पिऊन वाहन चालवित असल्याचे समोर आल्यास त्याला ताब्यात घेऊन संबंधित पोलीस ठाण्यांतर्गत न्यायालयात दाखल करण्यात येते़ त्यानंतर त्याला दंड ठोठावण्यात येतो़ यासह सिग्नल तोडून पळून जाणारे किंवा विना परवाना वाहन चालविणाऱ्यांना वाहतूक पोलीस पावती फाडून दंड वसूल करतात़ वर्षभराच्या कालावधीत ३५ लाख ९ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ हा आकडा नोव्हेंबरअखेरचा असल्याची माहिती पोलिस प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे़ गेल्या वर्षी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत ३२ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता़ यात यावर्षी ३ लाख रूपयांची वाढ झाली आहे़ वारंवार कारवाया होत असल्याने वाहनधारकांनी धसका घेतला आहे़ परंतु कळत नकळत वाहतूक नियमांचे उल्लंघन होतच असते़ दंड देऊनही नियमांचे उल्लंघन होत आहे़अधीक्षकांनी दिल्या सूचनावाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी केल्या आहेत़ तसेच कारवाई करताना कोणी अडथळा निर्माण करत असल्यास त्याच्यावरही कारवाई करावी, असेही त्यांनी वाहतूक पोलिसांना सांगितले आहे़ वाहन पकडल्यानंतर संबंधित व्यक्ती नेते मंडळींना फोन लावतात़ त्यामुळे वाहतूक पोलिसांवर दबाव निर्माण होतो़ त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई तर कराच, अडथळा आणणाऱ्यावरही कारवाई करण्याचे सांगितले आहे़ (प्रतिनिधी)४२०१३ या वर्षांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ हजार ५६० वाहनांधारकांवर कारवाया करण्यात आल्या़४त्यांच्याकडून ३२ लाख ३७ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता़४नोव्हेंबर २०१४ पर्यंत जिल्ह्यात १९ हजार ८५२ वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३५ लाख ९ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़