शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
3
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
4
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
5
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
6
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
7
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
9
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
10
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
11
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
12
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
13
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
14
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
15
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
16
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
17
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
18
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
19
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
20
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीनगर नामकरणाचा ३४ वर्षांचा प्रवास; आता निर्णय केंद्राकडे, वाचा पुढील कायदेशीर प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 12:09 IST

३४ वर्षांपासून औरंगाबादचे संभाजीनगर करण्याबाबतची राज्य सरकारच्या पातळीवरील पहिली पायरी पूर्ण झाली

औरंगाबाद : जिल्ह्याचे नामकरण औरंगाबादवरून ‘संभाजीनगर’ करण्याच्या जुन्या प्रस्तावाला आगामी महापालिका निवडणूक आणि शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. 

३४ वर्षांपासून औरंगाबादचे संभाजीनगर करण्याबाबतची राज्य सरकारच्या पातळीवरील पहिली पायरी पूर्ण झाली असून, आता केंद्र शासनाच्या कोर्टात नामकरणाचा चेंडू गेला आहे. मनपाच्या सहा निवडणुका शिवसेना-भाजपने एकत्रितपणे २०१५ पर्यंत लढल्या. २०१९ ला युती तुटल्यानंतर औरंगाबादचे संभाजीनगर या नामकरणावर भाजपने शिवसेनेवर वारंवार हल्लाबोल केला.

नामकरणाचा प्रवास असा...- १९८८ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामकरण करण्याचा नारा दिला.

- १९९५ जूनमध्ये औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ हे नामकरण करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला.

- १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्यामुळे नामकरणाची अधिसूचना काढण्यात आली.

- १९९६ मध्ये मुश्ताक अहेमद यांनी औरंगाबादच्या नामकरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

- १९९९ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन युतीचे सरकार गेले. नामकरणाचा प्रस्ताव पुढे सरकला नाही.

- २००२ मध्ये मुश्ताक अहेमद यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका निकाली निघाली.

- २००५ च्या सांस्कृतिक मंडळावरील मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील सभेत पुन्हा संभाजीनगरचा मुद्दा गाजला.

- २०१० मध्ये औरंगाबाद हवे की संभाजीनगर, याच मुद्द्यावर शिवसेना-भाजप युतीने महापालिका जिंकली.

- २०१४ मध्ये सेना-भाजप युती सत्तेत आल्यानंतर नामकरणाच्या प्रस्तावाला पुन्हा हवा मिळाली, परंतु निर्णय झाला नाही.

- २०१५ मध्ये हिंदुत्व, संभाजीनगर हे मुद्दे घेत निवडणुका, मात्र नामकरणाला बगल दिली गेली.

- ४ मार्च २०२० रोजी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणबाबतची न्यायालय याचिका, एनओसीबाबत शासनाने विभागीय प्रशासनाकडून माहिती मागविली.

- २०२१ मध्ये सुपर संभाजीनगर असा नारा देत शहरात डिस्पले (इल्युमिनेटेड लेटर्स) लावले. तसेच पालकमंत्र्यांनी जाहीरनामा प्रकाशित केला, सरकारी दौऱ्यात संभाजीनगर छापून आल्याने वादाला तोंड.

- ८ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी समृध्दीनंतरच नामकरण करण्याचा विचार जाहीर सभेत व्यक्त केला.

- २१ जून २०२२ रोजी शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर राज्य सरकार अल्पमतात येण्याची प्रक्रिया सुरू झाली.

- २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला.

आता पुढे काय होणार; एखाद्या शहराच्या नामांतराची कायदेशीर तरतूद अशी :- एखाद्या शहराचं अथवा गावाचं नाव बदलायचं असेल, तर त्यासाठी आधी राज्य सरकारला प्रस्ताव तयार करून, तो मंजूर करून घ्यावा लागतो. तो प्रस्ताव नंतर केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाकडे पाठवावा लागतो. केंद्रीय गृहमंत्रालयाचे तत्कालीन उपसचिव सरदार फत्तेसिंग यांनी १९५३ साली या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. - २००५ साली या तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली. या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे केंद्रातील सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया, रेल्वे, पोस्ट, आयबी इ. केंद्रीय संस्थांशी अशा प्रस्तावासंदर्भात विचारविनिमय करण्यात येतो व त्यांची ना हरकत प्राप्त झाल्यानंतर, केंद्रीय गृहखाते या प्रस्तावाला मंजुरी देते. - त्यानंतर, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून शहराचे नाव बदलण्यात येते, अशी माहिती उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील ॲड.देवदत्त पालोदकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा