शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ३२ लाख हेक्टर शेती पाण्यात; नुकसानभरपाई अडकली बँकेच्या केवायसीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:45 IST

शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतरच मिळणार नुकसानीची मदत

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ३१ लाख ९८ हजार ४६७ हेक्टर शेती सध्या पाण्यात आहे. त्यातील २३ लाख ६० हजार ३६८ हेक्टवरील नुकसानीचे पंचनामे झाले असून, १८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी शासनाने दिलेल्या १५०० कोटींच्या नुकसानभरपाईचे वाटप प्रशासकीय पातळीवर सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन केवायसी केल्यानंतरच भरपाई मिळेल, असे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

आयुक्त पापळकर म्हणाले, मागील २ दिवस पावसाचे मोठे संकट होते. सध्या पाऊस थांबला आहे. पुढील ४ दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असा दावा आयुक्तांनी केला.

आतापर्यंत १५०० कोटींपेक्षा अधिक मदतनिधी आला असून, याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. व्हीकेएन नंबर याद्या गावनिहाय प्रसिद्ध होतील. १८ व २३ सप्टेंबर रोजी दोन आदेशानुसार १५०० कोटी आले आहेत. जून, जुलै, ऑगस्टमधील नुकसानीची ही मदत आहे. शेतकऱ्यांना बँकेत जावे लागेल. शेती व शेतकरी यामध्ये वारंवार बदल होतात, त्यामुळे केवायसी बंधनकारक आहे. बँकांनी कुठल्याही कर्जाच्या हप्त्याची कपात करून घेऊ नये, हा मदतनिधी आहे. जर ऑटो पे असा नियम काही बँकांचा असेल तर तेथे शेतकऱ्यांनी अर्ज देऊन रक्कम कपात करू नये, असे सांगावे. मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रांचे पथक येणार आहे का, याबाबत विचारले असता विभागीय आयुक्तांनी अद्याप तरी पथक येण्याबाबत माहिती प्राप्त नसल्याचे नमूद केले. यावेळी अपर आयुक्त खुशालसिंग परदेशी, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची उपस्थिती होती.

२४ हजार ७०० लोकांचे स्थलांतरणजायकवाडीतील विसर्गामुळे प्रशासकीय यंत्रणेने २४ हजार ७०० लोकांचे स्थलांतरण केले. १७ हजार ७८५ निवारागृहात आहेत, तर ६ हजार ७८१ घरी पोहोचले आहेत. सध्या पुरात कुणीही अडकलेले नाही. विभागात इंटरनेट, वीज पुरवठ्याबाबत धाराशिव, लातूरमधून काही तक्रारी होत्या, असेही आयुक्तांनी सांगितले.कोणत्या जिल्ह्यात किती शेती पाण्याखाली?जिल्हा......................................शेती हेक्टरमध्ये

छत्रपती संभाजीनगर.....................२३६५२८जालना...............................२३२०८२

परभणी...............................२७३०३३हिंगोली.....................................२७३४१३

नांदेड..................................६५४४०१बीड.................................६७५८९१

लातूर.............................४०३४३८धाराशिव.....................४४९६८१

एकूण.......................३१९८४६७

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Farms Submerged; Compensation Stuck in Bank KYC

Web Summary : Marathwada's 32 lakh hectares of farmland are underwater. Compensation distribution is underway, but farmers need KYC updates. 1500 crore rupees allocated for losses in June, July and August. 24,700 people were displaced due to flooding.
टॅग्स :Rainपाऊसfloodपूरchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर