शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दोन दिवसांत पकडल्या ३१८ वीजचोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 11:27 PM

महावितरणने औरंगाबाद परिमंडळात सुरू केलेल्या धडक मोहिमेच्या अवघ्या दोनच दिवसांत वीजचोरीची तब्बल ३१८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देमहावितरण : ७ जूनपर्यंत चालणार मोहीम

औरंगाबाद : महावितरणनेऔरंगाबाद परिमंडळात सुरू केलेल्या धडक मोहिमेच्या अवघ्या दोनच दिवसांत वीजचोरीची तब्बल ३१८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी वाढलेली आहे. अशावेळी आकडे टाकून किंवा अनधिकृतपणे विजेचा वापर करतात. या सगळ्यातून वीजचोरीमुळे विद्युत यंत्रणेवर ताण येऊन रोहित्रे नादुरुस्त होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याबरोबरच ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीसाठी तात्पुरता खंडित केलेला आहे, असे ग्राहकही चोरून वीज वापरण्याची शक्यता असते. या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण व जालना या तिन्ही मंडळांत विशेष पथके नेमून २ ते ७ जूनदरम्यान वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सर्व अभियंते-कर्मचाऱ्यांना दिले आहेत. या मोहिमेत २ व ३ जून या दोनच दिवसांत वीजचोरीची ३१८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. या सर्व ग्राहकांना वीजचोरीची बिले देण्यात येणार असून, ही बिले त्यांनी मुदतीत भरणा न केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.मीटरमध्ये छेडछाड, आकडे टाकलेऔरंगाबाद शहर मंडळात ३१, औरंगाबाद ग्रामीण मंडळात १४६, तर जालना मंडळात वीजचोरीची १४१ प्रकरणे उघडकीस आली. ३१८ प्रकरणांत विजेच्या अनधिकृत वापराची १८ प्रकरणे उघडकीस आली, तर मीटरमध्ये छेडछाड, आकडा टाकून थेट वीजचोरी केल्याची ३०० प्रकरणे आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणCrime Newsगुन्हेगारी