शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

३०० सहकारी संस्था जिल्ह्यातून गायब !

By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST

जालना : सहकार खात्यात कार्यरत असणाऱ्या संस्थांनी आपला विविध प्रकारचा अहवाल दरवर्षी सादर करणे गरजे आहे. मात्र जालना तालुक्यातील १३५० पैकी ३०० संस्था गायब झाल्या आहेत.

जालना : सहकार खात्यात कार्यरत असणाऱ्या संस्थांनी आपला विविध प्रकारचा अहवाल दरवर्षी सादर करणे गरजे आहे. मात्र जालना तालुक्यातील १३५० पैकी ३०० संस्था गायब झाल्या आहेत. आता या संस्था अवसायानात काढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. साखर कारखाने, सूतगिरण्या, पत संस्था, कर्मचारी संस्था, सहकारी बँका, मजुर सहकारी सोसायटी, औद्योगिक, गृहनिर्माण, पाणी वापर, सुशिक्षीत बेरोजगार, ग्राहक संस्था, माती परीक्षण संस्था व इतर संस्थांची नोंदणी सहायक निबंधक कार्यालयात केली जाते. मात्र या संस्थांना दरवर्षी शासनाच्या नियमानुसार माहिती सादर करावी लागते. त्यात सध्या संस्थेचे कलम ७९ नुसार रिर्टन, ९७ वी घटना दुरूस्ती आदी माहिती सहायक निबंधक कार्यालयात सादर करण्यात आली नाही. संस्थेकडून वार्षिक हिशोब अथवा इतर कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. संस्थेची दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालक मंडळाची मासिक सभा घेतली जात नाही.संस्थेचे सन २०१४ अखेर लेखा परीक्षण अहवाल, लेखा परिक्षणातील दोष दुरूस्ती अहवाल, कलम ८२ नुसार सादर करण्यात आली नाही. त्यामुळे संस्थेच्या उद्देशानुसार व्यवहार चालू करण्याबाबत संस्थेचे पदाधिकारी व सभासदांची इच्छा नसल्याचे दिसून आल्याची नोटीस सहकारी संस्थांचे सहायक निबंधक एस.बी. भालेराव यांनी बजावली. ३०० संस्था बंद असून कोणताही ठावठिकाणा नाही. ही बाब तपासणीत उघड झाली आहे. त्यामुळे आता या संस्था अवसायानात काढून कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येत्या १५ दिवसात संबंधित संस्थांनी संपर्क साधला नाही तर संचालक मंडळ व सभासदांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)सहकार खात्याने सध्या ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात सर्वप्रथम ड वर्गातील सहकारी संस्थांचा समावेश आहे. या निवडणूका घेण्यासाठी प्राधीकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात विविध क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. ४ही निवड प्रक्रीया सहकार खात्याने केली आहे. प्राधीकरणाची निवड होताच गृह निर्माण संस्था, मजुर सहकारी संस्था तसेच पाणी वापर संस्थांचा समावेश आहे. या निवडणूकीचा कार्यक्रम ३ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यासाठी सहकार खात्याने गत सहा महिन्यांपासून सर्वच सहकारी संस्थांचा आढावा घेऊन निवडणूकीसाठी पात्र असणाऱ्या संस्थांची यादी तयार केली आहे.