शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

मराठवाड्यात ३ हजार ६४० गावांना अतिवृष्टीचा फटका; पावणेचार लाख हेक्टर पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 11:58 IST

विभागातील सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत

औरंगाबाद : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील १८२ मंडळांत आजवरच्या पावसाने दाणादाण उडवून दिली असून ३ हजार ६४० गावांतील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यात जमा आहे. विभागात प्राथमिक अहवालानुसार सुमारे पावणेचार लाख हेक्टरवर पेरण्यानंतर बुड धरलेल्या पिकांचा चिखल झाला आहे. सव्वा लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे आजवर झाले आहेत. अडीच लाख हेक्टरवरील पंचनामे अद्याप होणे बाकी आहे. ३२ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

६ लाख २१ हजार शेतकऱ्यांचे आजवर झालेल्या पावसाने नुकसान केले आहे. मराठवाड्यात (८ ते २५ जुलै) जोरदार पावसाचा ३६४० गावांतील पिकांना फटका बसला आहे. विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, जालना २५५ हेक्टर, परभणी १२०० हेक्टर, हिंगोली ७६ हजार ७७१, नांदेड २ लाख ९८ हजार ८६१, तर लातूर जिल्ह्यातील १६४०, तर बीडमधील २६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

विभागात आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४४५ मि.मी. पाऊस झाला आहे. २८४ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. १६१ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. ६६ टक्के पावसाचे प्रमाण असून, उर्वरित ६६ दिवसांच्या पावसाळ्यात ३४ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला, तर विभागातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

नांदेडमध्ये ४०० कोटींचे नुकसाननांदेड जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ३३ हजार ४८४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २ लाख ९८ हजार ८६१ हेक्टरवरील पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. फळपीक, बागायत क्षेत्र, जिरायत क्षेत्रावरील नुकसानीचा यात समावेश आहे. रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय मालमत्ता, इमारतींसह ४०० कोटींपेक्षा अधिक नुकसानीचा अंदाज आहे.

सर्व प्रकल्पांत ७७ टक्के पाणीविभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ७७.७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यात जायकवाडी ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. निम्न दुधना ६९, येलदरी ६४, सिद्धेश्वर ५४, माजलगाव ४०, मांजरा ३५, पैनगंगा ८६, मानार १०० टक्के, तर निम्न तेरणा ६३, विष्णुपरी ७७, तर सिनाकोळेगाव प्रकल्पात सध्या १९ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसMarathwadaमराठवाडा