शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ३ हजार ६४० गावांना अतिवृष्टीचा फटका; पावणेचार लाख हेक्टर पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 11:58 IST

विभागातील सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत

औरंगाबाद : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील १८२ मंडळांत आजवरच्या पावसाने दाणादाण उडवून दिली असून ३ हजार ६४० गावांतील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यात जमा आहे. विभागात प्राथमिक अहवालानुसार सुमारे पावणेचार लाख हेक्टरवर पेरण्यानंतर बुड धरलेल्या पिकांचा चिखल झाला आहे. सव्वा लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे आजवर झाले आहेत. अडीच लाख हेक्टरवरील पंचनामे अद्याप होणे बाकी आहे. ३२ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

६ लाख २१ हजार शेतकऱ्यांचे आजवर झालेल्या पावसाने नुकसान केले आहे. मराठवाड्यात (८ ते २५ जुलै) जोरदार पावसाचा ३६४० गावांतील पिकांना फटका बसला आहे. विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, जालना २५५ हेक्टर, परभणी १२०० हेक्टर, हिंगोली ७६ हजार ७७१, नांदेड २ लाख ९८ हजार ८६१, तर लातूर जिल्ह्यातील १६४०, तर बीडमधील २६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

विभागात आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४४५ मि.मी. पाऊस झाला आहे. २८४ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. १६१ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. ६६ टक्के पावसाचे प्रमाण असून, उर्वरित ६६ दिवसांच्या पावसाळ्यात ३४ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला, तर विभागातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

नांदेडमध्ये ४०० कोटींचे नुकसाननांदेड जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ३३ हजार ४८४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २ लाख ९८ हजार ८६१ हेक्टरवरील पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. फळपीक, बागायत क्षेत्र, जिरायत क्षेत्रावरील नुकसानीचा यात समावेश आहे. रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय मालमत्ता, इमारतींसह ४०० कोटींपेक्षा अधिक नुकसानीचा अंदाज आहे.

सर्व प्रकल्पांत ७७ टक्के पाणीविभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ७७.७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यात जायकवाडी ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. निम्न दुधना ६९, येलदरी ६४, सिद्धेश्वर ५४, माजलगाव ४०, मांजरा ३५, पैनगंगा ८६, मानार १०० टक्के, तर निम्न तेरणा ६३, विष्णुपरी ७७, तर सिनाकोळेगाव प्रकल्पात सध्या १९ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसMarathwadaमराठवाडा