शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

मराठवाड्यातील २७ तालुक्यांना दुष्काळाची कळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:15 AM

: मराठवाड्यातील ७६ पैकी २७ तालुक्यांत दुष्काळाची दुसरी कळ (ट्रिगर) लागू झाल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. २७ तालुक्यांत गंभीर, तर १४ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे सरकारी जुमला : शास्त्रीय पद्धतीच्या मूल्यांकनामुळे नुकसान होण्याची दाट शक्यता

औरंगाबाद : मराठवाड्यातील ७६ पैकी २७ तालुक्यांत दुष्काळाची दुसरी कळ (ट्रिगर) लागू झाल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. २७ तालुक्यांत गंभीर, तर १४ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शास्त्रीय मूल्यांकनाआधारे दुष्काळ पाहण्याच्या सरकारी पद्धतीमुळे विभागातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.महाराष्ट्र सुदूर संवेदन यंत्रणे(एमआरसॅक)कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांची यादी राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने जाहीर केली आहे. एमआरसॅक सॅटेलाईटनुसार काम करणारी यंत्रणा आहे. त्याआधारे शासनाने मराठवाड्यातील २७ तालुक्यांना दुसरी कळ लागू केली आहे. गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ त्याअंतर्गत विचारात घेतला गेला आहे.दुष्काळ मोजण्यासाठी कळ जी लावली आहे, ती तालुक्याला लावली आहे. तालुक्याच्या विवरणानुसार दुष्काळाचे मूल्यमापन कसे होणार. कोणत्याही तालुक्याचे उदाहरण घेतले, तर असे दिसते की, तेथे पाण्याखाली १० टक्के किती गावे असतील. उर्वरित ९० टक्के गावे कशी मोजणार याची अडचण येत आहे. मंडळनिहाय, सजानिहाय गावांची अवस्था पाहिली जात नाही. शितावरून भाताची परीक्षा अशा पद्धतीने दुष्काळाचे मूल्यमापन होत असल्याचा आरोप होतो आहे.दुष्काळाची दुसरी कळ अशीऔरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर या तालुक्यांत गंभीर दुष्काळ आहे, तर कन्नड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे.बीड जिल्ह्यातील आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर, वडवणी तालुक्यांत गंभीर, तर अंबाजोगई, केज, परळी, पाटोदा तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे.हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगावमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे.जालना जिल्ह्यातील अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी तालुक्यांत गंभीर स्वरूपाची, तर जाफ्राबाद, जालना आणि परतूर तालुक्यांत मध्यम स्वरूपाची दुष्काळ परिस्थिती आहे.परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सोनपेठमध्ये गंभीर दुष्काळी स्थिती आहे, तर पालम, परभणी, सेलू तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे सांगण्यात आले.नांदेड जिल्ह्यातील मुखेड, उमरी तालुक्यांत गंभीर, तर देगलूर तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.लातूर, उस्मानाबाद सुजलाम्...सुफलाम्लातूर आणि उस्मानाबाद हे दोन्ही जिल्हे सुजलाम् सुफलाम् असल्याचे दुष्काळच्या दुसºया कळीनुसार सांगण्यात येत आहे. लातूरमधील शिरूर अनंतपाळ परिसरात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे, तर उस्मानाबादमधील लोहारा भागात तशीच स्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाdroughtदुष्काळ