शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

छत्रपती संभाजीनगरच्या विकास आराखड्यातील बदलांवर अडीच हजार आक्षेप; सोमवारी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 20:00 IST

अडीच हजार नागरिकांचे आक्षेप, ५ दिवस चालेल काम

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाने एप्रिल महिन्यात शहर विकास आराखडा मंजूर केला. त्यामध्ये शासनाकडून आमुलाग्र बदल करण्यात आले. या बदलांवर कोणाला आक्षेप असेल त्यांनी सूचना- हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. शहरातील अडीच हजारांहून अधिक नागरिकांनी आक्षेप दाखल केले होते. या आक्षेपांवर सोमवार, २५ ऑगस्टपासून स्मार्ट सिटी कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.

शहराचा विकास आराखडा राज्य शासनाकडून ३३ वर्षांनी मंजूर करण्यात आला. मंजुरीपूर्वी शासनस्तरावर ३५० पेक्षा अधिक बदल आराखड्यात करण्यात आले. त्याला वगळलेला भाग (ईपी) म्हटल्या जाते. या ईपीवर कोणाला आक्षेप असेल तर त्यांनी लेखी स्वरूपात शासनाच्या सहायक संचालक कार्यालयात हरकती, सूचना दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. ठरावीक मुदतीत अडीच हजार नागरिकांनी आक्षेप दाखल केले. ईपीमध्ये मोठ्या प्रमाणात चुका करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत होता. नको त्या ठिकाणी आरक्षणे टाकली, मोठे रस्ते लहान केले होते. ज्या नागरिकांनी आक्षेप दाखल केले होते, त्यांची सुनावणी कधी होणार, असा प्रश्न मागील काही दिवसांपासून उपस्थित करण्यात येत होता.

गुरुवारी (२१ ऑगस्ट) महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटी कार्यालयात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसह सहसंचालक नागरगोजे व अन्य अधिकारी उपस्थित होते. हरकती, सूचनांवर सोमवारपासून सुनावणी सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. २८ ऑगस्टपर्यंत सुनावणी चालेल. सेक्टरनिहाय सुनावणी घेतली जाणार आहे. ज्या नागरिकांनी हरकती, सूचना दिल्या आहेत त्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. सुनावणीसाठी तज्ज्ञांचे पथक असणार आहे.

इतर आक्षेपांसाठी एक दिवसविकास आराखड्यात ईपी वगळता अन्य कोणत्याही भागावर नागरिकांचा आक्षेप असेल तर त्यासाठी स्वतंत्रपणे एक दिवस सुनावणी घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये काही गंभीर आक्षेप आढळून आल्यास ते शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका