शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

मराठवाड्यातील २५०० कुटुंबांचे स्थलांतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 6:07 AM

पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग गडद झाले

संजय जाधव।औरंगाबाद : पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग गडद झाले असून पैठण तालुक्यातून जवळपास २५०० कुटुंबांनी रोजी-रोटीच्या शोधात महानगरांकडे स्थलांतर केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.औरंगाबादसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत केवळ ३८ टक्के पाऊस झाला. पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सलग चाळीस दिवस पावसाचा थेंबही पडलेला नाही. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असल्याने शेतकºयांची आशा ओलावली आहे.पैठण तालुक्यातील गेवराई (मर्दा) येथील २५ तरुण कामधंद्यासाठी बाहेर पडले असून, यंदा ४० टक्के गावकºयांना ऊसतोडीसाठी जावे लागणार असल्याचे येथील उपसरपंच महंमद पठाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खादगावमधून५० तरुणांनी, तर कडेठाण गावातील८० तरुणांनी मजुरीसाठी गाव सोडलेआहे. आडूळमधील २५० तरुणांनी स्थलांतर केले असून, ३०० महिला रोजंदारी कामासाठी शेंद्रा एमआयडीसी येथे जात असल्याची माहिती सरपंच श्रीपाल राठोड यांनी दिली.>साडेसात महिन्यांत५८० शेतकरी आत्महत्यामराठवाड्यात दुष्काळाचे सावट किती गडद झाले आहे, हे आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या आकडेवारीवरून दिसून येते. १ जानेवारी ते १३ आॅगस्टपर्यंत मराठवाड्यात ५८० शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले असून सर्वाधिक ११५ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात७९, जालना ५३, परभणी ७३, हिंगोली ३३, लातूर ५६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ७८शेतकºयांनी स्वत:ला संपविले. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे५८० जणांनी आपली जीवनयात्रा संपविली असली तरी प्रशासनाने नियमाच्या कसोटीत४०० प्रकरणेच पात्र ठरविली आहेत.>पैठण तालुक्यातील हर्षी गावातून २३ जोडपी चाकण येथील औद्योगिक वसाहतीत काम शोधण्यासाठी गेले आहेत. तांडा बुदु्रकमधून १० जोडपी नगर येथील कुक्कुटपालन उद्योग,तर १५ जण चितेगाव येथे गेल्याचे सरपंच ज्ञानेश्वर चाबुकस्वार यांनी सांगितले.दावरवाडीतून ५० तर नांदरातून ३० जोडप्यांनी गाव सोडले आहे. स्थलांतराची ही आकडेवारी एकट्या पैठण तालुक्यातील आहे.अशीच परिस्थिती जालना, बीड, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात आहे. बीडमधून दरवर्षी ऊसतोड मजुरांचे हंगामी स्थलांतर होते. मात्र, यंदा हंगामापूर्वीच स्थलांतर सुरु झाले.> ऐन पावसाळ्यात जलसाठे कोरडेमराठवाड्यातील ७९ मध्यम प्रकल्पात केवळ ४०.०३ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा असून जायकवाडीत ५० टक्के तर माजलगाव धरणात ६ टक्के इतकेच पाणी उपलब्ध आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यात लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच वेळ येऊ शकते. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणनिहाय उपयुक्त जलसाठा असा...