शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस, तर २९ लाखांची विनाआधारकार्ड नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 12:38 IST

शिक्षण विभागाने खंडपीठात सादर केली माहिती; राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी असल्याचा याचिकेत दावा

औरंगाबाद : राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस असल्याची, तर २९ लाखांची विनाआधारकार्ड नोंदणी झाली असल्याची माहिती शिक्षण विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली. राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही माहिती देण्यात आली.

१० वर्षांपूर्वी बोगस पटपडताळणी मोहिमेत २० लाख बोगस विद्यार्थी सापडले होते. या बोगस विद्यार्थीसंख्येला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांची आधारकार्डद्वारे नोंदणी करण्यात आली. तरीही बोगस विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली नाही. उलट ती वाढली. विशेष म्हणजे, राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्डच बोगस असल्याचे समोर आले आहे. तर, २९ लाख विद्यार्थ्यांची विनाआधारकार्ड नोंदणी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

राज्यात तब्बल २४ लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणारी जनहित याचिका बीड जिह्यातील ब्रिजमोहन मिश्रा यांनी ॲड. सचिन देशमुख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्यात खासगी शाळांचे संस्था संचालक, मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करण्यात आला होता. बोगस विद्यार्थीसंख्येची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर खंडपीठाने ऑनलाइन पद्धतीने आधारकार्डसोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यात राज्य सरकारने सादर केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांत किती बोगस विद्यार्थी ?पुणे -२,४३,५८२ , नागपूर - १,८४,२६२ , जळगाव - १,७२,५४३ , नांदेड - १, ५२, ७२३ , यवतमाळ - १,१७.५१९, बुलडाणा - ९८,४८८ , धुळे - ८५,१५७ , मुंबई - ८०,८०० , नाशिक - २५३ , अहमदनगर - ६०,९५१, अकोला - ५६,४७८ , अमरावती - ५,१०७ , औरंगाबाद - १०,६६६ आणि बीड -८,५२८.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठEducationशिक्षणStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार