शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस, तर २९ लाखांची विनाआधारकार्ड नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 12:38 IST

शिक्षण विभागाने खंडपीठात सादर केली माहिती; राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी असल्याचा याचिकेत दावा

औरंगाबाद : राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस असल्याची, तर २९ लाखांची विनाआधारकार्ड नोंदणी झाली असल्याची माहिती शिक्षण विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली. राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही माहिती देण्यात आली.

१० वर्षांपूर्वी बोगस पटपडताळणी मोहिमेत २० लाख बोगस विद्यार्थी सापडले होते. या बोगस विद्यार्थीसंख्येला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांची आधारकार्डद्वारे नोंदणी करण्यात आली. तरीही बोगस विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली नाही. उलट ती वाढली. विशेष म्हणजे, राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्डच बोगस असल्याचे समोर आले आहे. तर, २९ लाख विद्यार्थ्यांची विनाआधारकार्ड नोंदणी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

राज्यात तब्बल २४ लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणारी जनहित याचिका बीड जिह्यातील ब्रिजमोहन मिश्रा यांनी ॲड. सचिन देशमुख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्यात खासगी शाळांचे संस्था संचालक, मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करण्यात आला होता. बोगस विद्यार्थीसंख्येची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर खंडपीठाने ऑनलाइन पद्धतीने आधारकार्डसोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यात राज्य सरकारने सादर केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांत किती बोगस विद्यार्थी ?पुणे -२,४३,५८२ , नागपूर - १,८४,२६२ , जळगाव - १,७२,५४३ , नांदेड - १, ५२, ७२३ , यवतमाळ - १,१७.५१९, बुलडाणा - ९८,४८८ , धुळे - ८५,१५७ , मुंबई - ८०,८०० , नाशिक - २५३ , अहमदनगर - ६०,९५१, अकोला - ५६,४७८ , अमरावती - ५,१०७ , औरंगाबाद - १०,६६६ आणि बीड -८,५२८.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठEducationशिक्षणStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार