शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस, तर २९ लाखांची विनाआधारकार्ड नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 12:38 IST

शिक्षण विभागाने खंडपीठात सादर केली माहिती; राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी असल्याचा याचिकेत दावा

औरंगाबाद : राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस असल्याची, तर २९ लाखांची विनाआधारकार्ड नोंदणी झाली असल्याची माहिती शिक्षण विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली. राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही माहिती देण्यात आली.

१० वर्षांपूर्वी बोगस पटपडताळणी मोहिमेत २० लाख बोगस विद्यार्थी सापडले होते. या बोगस विद्यार्थीसंख्येला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांची आधारकार्डद्वारे नोंदणी करण्यात आली. तरीही बोगस विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली नाही. उलट ती वाढली. विशेष म्हणजे, राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्डच बोगस असल्याचे समोर आले आहे. तर, २९ लाख विद्यार्थ्यांची विनाआधारकार्ड नोंदणी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

राज्यात तब्बल २४ लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणारी जनहित याचिका बीड जिह्यातील ब्रिजमोहन मिश्रा यांनी ॲड. सचिन देशमुख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्यात खासगी शाळांचे संस्था संचालक, मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करण्यात आला होता. बोगस विद्यार्थीसंख्येची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर खंडपीठाने ऑनलाइन पद्धतीने आधारकार्डसोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यात राज्य सरकारने सादर केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांत किती बोगस विद्यार्थी ?पुणे -२,४३,५८२ , नागपूर - १,८४,२६२ , जळगाव - १,७२,५४३ , नांदेड - १, ५२, ७२३ , यवतमाळ - १,१७.५१९, बुलडाणा - ९८,४८८ , धुळे - ८५,१५७ , मुंबई - ८०,८०० , नाशिक - २५३ , अहमदनगर - ६०,९५१, अकोला - ५६,४७८ , अमरावती - ५,१०७ , औरंगाबाद - १०,६६६ आणि बीड -८,५२८.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठEducationशिक्षणStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार