शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नागरिकांच्या शिव्या, प्रचंड विरोध झुगारून छत्रपती संभाजीनगरात १८० अतिक्रमणे हटविली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:29 IST

हर्सूल भागात महापालिकेची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल परिसरातील गट क्रमांक २१६ आणि २१७ येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गृह प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र येथील जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी अतिक्रमण केले होते. सोमवारी महापालिकेने पाेलिस बंदोबस्त रद्द झाल्यानंतरही कारवाईला सुरुवात केली. प्रारंभी नागरिकांनी मोहिमेला कडाडून विरोध दर्शविला. शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. मनपा अधिकाऱ्यांंनी सर्व विरोध झुगारून तब्बल १८० अतिक्रमणे जमीनदोस्त केली.

पंतप्रधान आवास योजनेच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्याचा मुद्दा मागील एक वर्षांपासून गाजत होता. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाला वेळ मिळत नव्हता. अनेकदा पोलिस बंदोबस्ताअभावी मोहीम रद्द करावी लागली. चार दिवसांपूर्वीच मनपाने अतिक्रमण करणाऱ्यांना स्वत:हून अतिक्रमणे काढून घ्यावीत, असा इशारा दिला होता. सोमवारी (दि. २४) सकाळी १० वाजता मनपाचे पथक पोलिस बंदोबस्त नसतानाही दाखल झाले. पथक पाहून नागरिकांनी प्रचंड आक्रोश सुरू केला. मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंगावर नागरिक धावून जात होते. अधिकाऱ्यांनी नागरिकांची अनेकदा समजूत घालण्याचा प्रयत्न केला. नागरिक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे लक्षात आल्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पत्र्याचे शेड असलेली १८० लहान-मोठी अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली.

१५० जणांचा फौजफाटापोलिस बंदोबस्त न मिळाल्याने महापालिकेने नागरी मित्र पथकाचे कर्मचारी, सफाई निरीक्षक, अग्निशमन जवान, आरोग्य विभागाच्या ॲम्ब्युलन्ससह १५० कर्मचारी तैनात केले होते. सकाळी १०.३० वाजता सुरू झालेली कारवाई दुपारी २.३० वाजता संपली.

कोणतीही कागदपत्रे नाहीतशासकीय खुल्या जागेवर नागरिकांनी अनेक वर्षांपासून अतिक्रमण केले होते. त्यांच्याकडे जागेचे कोणतेही कागद नव्हते.मात्र, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, विजेचे मीटर आदी सोयीसुविधा त्यांना देण्यात आल्या होत्या.

आणखी काही पक्की घरे१) सोमवारी केलेल्या कारवाईत गट क्रमांक २१६ येथील अतिक्रमणांवर कारवाई केली. गट क्रमांक २१७ मधील काही पक्की अतिक्रमणे काढायची बाकी असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.२) बहुतांश नागरिकांकडे विजेचे मीटर होते. काही घरांमध्ये अंडरग्राउंड केबलद्वारे वीजपुरवठा देण्यात आला होता. हे दृश्य पाहून मनपा कर्मचाऱ्यांनाही नवल वाटले.३) आज काढलेल्या अतिक्रमणांतील नागरिकांनी सांगितले की, आम्ही येथे २० ते २५ वर्षांपासून राहत आहोत.

चार किलो बाजरीसाठी धडपडजेसीबीच्या साह्याने एकानंतर एक पत्र्याची घरे पाडण्यात येत होती. एका घरात चार किलो बाजरी होती. एक महिला ओरडली, किमान चार किलो बाजरी तरी काढून द्या... तिचा हंबरडा ऐकून नागरी मित्र पथकाच्या जवानांना पाझर फुटला. त्यांनी त्वरित चार किलोची पिशवी महिलेच्या हातात आणून दिल्यानंतर तिचे रडणे थांबले.

बाप-लेक आजारीएका घरात बाप-लेक दोघेही गंभीर आजारी होते. मनपा अधिकाऱ्यांनी घरात जाऊन पाहणी केल्यानंतर दोघांना बाहेर काढले. त्यांना झाडाच्या सावलीमध्ये बसवले. त्यानंतर कारवाई केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEnchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका