शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार दरवाजे गायब

By admin | Updated: July 30, 2014 01:18 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून मराठवाड्यात बांधलेल्या शेकडो कोल्हापुरी बंधाऱ्यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादराज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून मराठवाड्यात बांधलेल्या शेकडो कोल्हापुरी बंधाऱ्यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विभागातील ५२५ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे तब्बल १८६९७ दरवाजे गायब झाले आहेत. त्यामुळे यंदा पुरेसा पाऊस झाला तरी विभागातील या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठणार नाही. परिणामी या बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या हजारो हेक्टर शेतीला त्याचा फटका बसणार आहे. मराठवाड्याला मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकार जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन दरवर्षी त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. दुसरीकडे याआधी बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची अवस्था मात्र अतिशय वाईट झाली आहे. बहुतेक बंधाऱ्यांचे गेट चोरीला गेले असल्यामुळे हे बंधारे काही कामाचे उरतच नाहीत. मराठवाड्यात एकूण २६६३ कोल्हापुरी बंधाऱ्यांची उभारणी केलेली आहे. या सर्व बंधाऱ्यांना एकूण १ लाख ३८ हजार ९१२ दरवाजे बसविण्यात आलेले आहेत; परंतु गेल्या काही दिवसांत जिल्हा परिषद आणि जलसंपदा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आतापर्यंत या बंधाऱ्यांचे तब्बल १८ हजार ६९७ दरवाजे गायब झाले आहेत. अडीच हजारपैकी ५२५ बंधाऱ्यांना सध्या एकही दार नाही. विशेषत: बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात ही संख्या मोठी आहे. बीड जिल्ह्यात तब्बल ५ हजार ६७ तर औरंगाबाद जिल्ह्यात ३३९१ दरवाजे चोरीला गेले आहेत. उर्वरित सहा जिल्ह्यांतही कमी अधिक प्रमाणात कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे गायब झाले आहेत. पावसाळ्याच्या शेवटी म्हणजे सप्टेंबरअखेरीस कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये दरवाजे टाकून पाणी अडविणे आवश्यक असते. मात्र, जुलै महिना संपत आला तरी गेट खरेदी करण्याची कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही.४१३ कोटींची गुंतवणूक पाण्यातमराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जिल्हा परिषद, स्थानिक स्तर, जलसंपदा आणि कडा कार्यालयाच्या माध्यमातून हे बंधारे बांधण्यात आलेले आहेत. या सर्व बंधाऱ्यांवर तब्बल ४१३.३० कोटी रुपये खर्च झाला आहे. मात्र, आता या बंधाऱ्यांना दरवाजेच उरले नसल्यामुळे ही गुंतवणूक वाया जात आहे. सिंचन क्षमता घटणारमराठवाड्यातील सर्व कोल्हापुरी बंधाऱ्यांची एकूण साठवण क्षमता ३९ हजार ९५३ दशलक्ष घनफूट तर सिंचन क्षमता ८३ हजार २४५ हेक्टर आहे. मात्र, सद्य:स्थितीत सुमारे २० टक्के बंधारे दरवाजाविना आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठणार नाही. परिणामी १६ ते १७ हजार हेक्टर जमिनीला पाणी मिळू शकणार नाही.गेटसाठी लागणार १३ कोटीविभागीय आयुक्त कार्यालयातील विकास शाखेने मराठवाड्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दरवाजांची माहिती संकलित केली आहे. त्यानुसार चोरीला गेलेल्या दरवाजांच्या ठिकाणी नवीन दरवाजे टाकण्यासाठी १३.६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी मिळावा यासाठी शासनाकडे विभागीय स्तरावरून पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्हाबंधारेगेट नसलेले दरवाजे गायब औरंगाबाद५५८१५१३३९१जालना२४६९३०२परभणी३७७४७५हिंगोली३०४१६५नांदेड१५७१३१८७बीड३७६२०८५०६७लातूर२८२३११५८३उस्मानाबाद९७७८९७५२७एकूण२६६३५१२१८६९७