१६४ गावांचा कारभार झीरो तलाठ्यांच्या हाती
By Admin | Updated: May 29, 2014 01:12 IST2014-05-29T00:51:05+5:302014-05-29T01:12:37+5:30
विजय गायकवाड, वैजापूर वैजापूर तालुक्यातील तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने १० मंडळांतर्गत ५९ तलाठी सजा कार्यालयांतर्गत येणार्या १६४ गावांचा कारभार वार्यावर आहे.

१६४ गावांचा कारभार झीरो तलाठ्यांच्या हाती
विजय गायकवाड, वैजापूर वैजापूर तालुक्यातील तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने १० मंडळांतर्गत ५९ तलाठी सजा कार्यालयांतर्गत येणार्या १६४ गावांचा कारभार वार्यावर असून येथील सजा झीरो तलाठी सांभाळत आहेत. तालुक्यातील ‘अप्पा मंडळी’ घरभाडे वसूल करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. वैजापूर शहराचा अपवाद वगळता तालुक्यात मुख्यालयी एकही तलाठी राहत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील ग्रामीण भागाचा कारभार असाच रामभरोसे सुरू आहे. तलाठ्यांना मूळ वेतन व गे्रडपेच्या एकूण १० टक्के घरभाडे भत्ता मिळतो; परंतु शासनाकडून घरभाडे भत्ता वसूल केला जातो; मात्र मुख्यालयी राहण्याच्या नावाने सर्वांचीच बोंबाबोब आहे. तालुक्यात वैजापूर,वैजापूर ग्रामीण, नांदगाव, घायगाव, सुराळा, खंडाळा, कोल्ही, जानेफळ, आघूर, जरूळ, शिऊर, बळहेगाव, रघुनाथपूरवाडी, मनेगाव, गारज, मनूर, मांडकी, पोखरी, लासूरगाव, जळगाव, दहेगाव, पालखेड, भगूर, करंजगाव, महालगाव, डवाळा, सिरसगाव, चोरवाघलगाव, गाढेपिंपळगाव, जांबरगाव, लाडगाव, विरगाव, सावखेडगंगा, पुरणगाव, बाबतारा, भऊर, नागमठाण, डाकपिंपळगाव, बाजाठाण, हमरापूर, जातेगाव, वांजरगाव, लोणी खुर्द, वाकला, तलवाडा, अंचलगाव, खरज, पारळा, बोरसर, परसोडा, नालेगाव, भिवगाव, धोंदलगाव व शिवराई, बिलोणी अशी एकूण ५९ तलाठी सजा कार्यालये आहेत. आठवडी बाजाराच्या दिवशीच गावात हजेरी संबंधित तलाठी मंडळी फक्त आठवडी बाजाराच्या दिवशीच गावात हजेरी लावतात. त्यामुळे आठवड्यातील अन्य दिवशी काम पडल्यास ग्रामस्थांना या तलाठ्यांना शोधत बसण्याची वेळ येते किंवा आठवडाभर त्याची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. तालुक्यातील जवळपास सर्वच तलाठी हे जिल्हा अथवा तालुक्याच्या ठिकाणी राहून ये-जा करतात. तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने जात, रहिवासी व उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणावर अडचणी येतात. आता जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे लागणार्या विविध प्रमाणपत्रांसाठी तलाठ्यांकडून विद्यार्थ्यांना कागदपत्रांची आवश्यकता असते. परंतु तलाठी महाशय गावात राहतच नसल्याने विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. झीरो तलाठ्यांवर वचक नसल्याने अनागोंदी दरम्यान, तालुक्याच्या ग्रामीण भागात एकही तलाठी राहत नसल्याने या गावांचा कारभार ‘झीरो’ तलाठ्यांच्या भरवशावर सुरू आहे. जवळपास सर्वच अप्पा मंडळींकडे झीरो तलाठी असल्याने ते गावाकडे फारसे फिरकत नाही. वैजापूर शहरालगतची जी गावे आहेत, त्या सर्व गावांचा कारभार वैजापूर शहरातूनच चालतो. त्यांनी शहरातच कार्यालये थाटले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी उंबरे झिजवावे लागतात. गेल्या अनेक वर्षांपासून असाच हा अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यांच्या या गलथान व ढिसाळ कारभारावर ना लोकप्रतिनिधींचा वचक आहे ना वरिष्ठ महसूल अधिकार्यांचा.