१५ दिवसांत साडेतीन कोटी वसूल
By Admin | Updated: December 18, 2014 00:38 IST2014-12-18T00:04:06+5:302014-12-18T00:38:27+5:30
बीड : महावितरणच्या बीड विभागाला महिन्याकाठी १८ कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट असताना केवळ ६ कोटीच रुपयांची वसुली होत असत़ त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीमध्ये वाढ होत होती़

१५ दिवसांत साडेतीन कोटी वसूल
बीड : महावितरणच्या बीड विभागाला महिन्याकाठी १८ कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट असताना केवळ ६ कोटीच रुपयांची वसुली होत असत़ त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीमध्ये वाढ होत होती़ वसुलीविषयी आदेश मिळताच बीड विभागाने १५ दिवसातच साडेतीन कोटींची वसुली केली आहे़
या वसुली मोहिमेला १ डिसेंबरपासून सुरूवात करण्यात आली आहे़ यामध्ये ५०० ते ५ हजार रूपयापर्यंत थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचे थेट मीटर जप्त केले जात आहे़ बीड विभागात ३५ हजार ८८८ एवढ्या ग्राहकांची संख्या ५०० ते ५ हजार रूपयांदरम्यान आहे़ २ हजार ६३९ घरगुती ग्राहकांवर थेट कारवाई करण्यात आली आहे तर विभागात १८०४ ग्राहक हे व्यावसायिक स्वरूपाचे असून यामधील २८२ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे़ बीड विभागाअंतर्गत असलेल्या शहर, ग्रामीण गेवराई, आष्टी, पाटोदा आदींचा समावेश होतो़ ही वसुली मोहीम अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे़ वाढती थकबाकी पाहता वसुलीची कडक पाऊले उचलण्यात आली आहेत़ १६ डिसेंबर रोजी उप कार्यकारी अभियंता एम़ एल़ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १७ कर्मचाऱ्यांसह शहरातील संजीवनगर, व्यंकटेशनगर, भाग्यनगर, धानोरा रोड, नामदेव रोड आदी भागातील ३३ मीटर वीजबिल न भरल्यामुळे ताब्यात घेण्यात आले आहेत़ सरासरीइतकी वसुली होईपर्यंत ही मोहीम राबविणार असल्याचे उप कार्यकारी अभियंता एम़ एल़ जाधव यांनी सांगितले़ ग्राहकांनी त्यांची मानसिकता बदलून बिले अदा करण्याचे आवाहनही त्यांनी केले़ (प्रतिनिधी)