शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

१४ व्या शतकात नान-पराठा आला मराठवाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 17:51 IST

नान किंवा पराठा हा पदार्थ आता मराठवाड्यातील लोकांना चिरपरिचित आहे. हा पाहुणा म्हणून आलेला पदार्थ इथलाच वाटावा, इतपत मराठवाडी जनतेने हा पदार्थ स्वीकारला.

ठळक मुद्देचौदाव्या शतकात जेव्हा मोहम्मद तुघलकाने देवगिरीवर आक्रमण केले, तेव्हा या पदार्थाची मराठवाड्याला ओळख झाली.

औरंगाबाद : नान किंवा पराठा हा पदार्थ आता मराठवाड्यातील लोकांना चिरपरिचित आहे. हा पाहुणा म्हणून आलेला पदार्थ इथलाच वाटावा, इतपत मराठवाडी जनतेने हा पदार्थ स्वीकारला. चौदाव्या शतकात जेव्हा मोहम्मद तुघलकाने देवगिरीवर आक्रमण केले, तेव्हा या पदार्थाची मराठवाड्याला ओळख झाली. या पदार्थाचा रंजक प्रवास ज्येष्ठ इतिहास अभ्यासक रफत कु रेशी आणि दुलारी कुरेशी यांनी सांगितला.

याविषयी सविस्तरपणे सांगताना ते म्हणाले की, चौदाव्या शतकात मोहम्मद तुघलक हा देवगिरी प्रांत जिंकण्यासाठी या भागात आला. तेव्हा त्याच्यासोबत त्याचे अफाट सैन्य होते. एवढ्या मोठ्या सैन्याची भूक भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अन्नपुरवठा आवश्यक होता. तव्यावर पोळ्या करून हजारो सैन्याची भूक भागविणे अवघड होते.

त्यामुळे त्यावर उपाय म्हणून मैदा, तेल, रवा, मीठ हे पदार्थ एकत्रित करण्यात आले. जमिनीत एक मोठा खड्डा करून भट्टी पेटविण्यात आली. भट्टी तापली की नान किंवा पराठे बनवून यात थापले जायचे. या भट्टीमुळे एकाच वेळी शंभरपेक्षा अधिक नान किंवा पराठे बनविणे शक्य व्हायचे. आता याच भट्टीला आपण तंदूर भट्टी म्हणून ओळखतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या सैन्याची भूक भागविण्याच्या गरजेपोटी या पदार्थाची निर्मिती झाली आणि मोहम्मद तुघलकासोबत हा पदार्थ मराठवाड्यात दाखल झाला.

सध्या नान किंवा पराठ्याचे अनेक प्रकार उपलब्ध असून, पुरीपासून ते अगदी परातीपर्यंतच्या आकाराचे पराठे बनविण्यात येतात. वेगवेगळ्या भाज्यांसोबत अथवा हलव्यासोबत या पदार्थाची गोडी चाखता येते.

ईदला शिरखुर्माच का?मुस्लिम बांधव एक महिना रोजे ठेवतात आणि त्याचा आनंद ईदच्या दिवशी शिरखुर्मा करून साजरा करतात. या दिवशी शिरखुर्माच का, हे सांगताना रफत कुरेशी म्हणाले की, पूर्वी खजूर हे सौदी अरेबियाचे मुख्य पीक होते. तेथे ते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे सगळ्यांना ते घेणे शक्य व्हायचे. यामुळेच दूध म्हणजेच शिर आणि खुर्मा म्हणजेच खजूर या दोघांच्या मिश्रणातून शिरखुर्मा तयार झाला. काळानुसार आवड आणि खाद्यसंस्कृतीत झालेल्या बदलामुळे आता शिरखुर्मामध्ये सुकामेवा, शेवया हे पदार्थही आवडीनुसार समाविष्ट केले जातात; पण मूळ शिरखुर्मा म्हणजे खजूर आणि दूध यांचेच मिश्रण होय.

टॅग्स :Ramzanरमजानfoodअन्नAurangabadऔरंगाबाद