शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

लागवड क्षेत्र घटल्याने ११५ कोटींचा फटका

By admin | Updated: November 26, 2014 01:10 IST

राजेश खराडे , बीड जिल्ह्यात गतवर्षी पेक्षा कांदा लागवडीचे क्षेत्र निम्म्याहून कमी आले आहे. याचाच फटका व्यापारपेठांनाही बसणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वीस किलो प्रमाणे कांद्याचे दीडशे

 

राजेश खराडे , बीडजिल्ह्यात गतवर्षी पेक्षा कांदा लागवडीचे क्षेत्र निम्म्याहून कमी आले आहे. याचाच फटका व्यापारपेठांनाही बसणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वीस किलो प्रमाणे कांद्याचे दीडशे कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते. मात्र यंदा लागवड क्षेत्र कमी झाल्याने हेच उत्पन्न १५ रुपये किलो दराने ३५ कोटी ७५ लाखांवर येऊन ठेपले आहे. यामुळे जवळपास ११४ कोटी २५ लाखांचा फटका व्यापारपेठेला बसणार असल्याचे व्यापारी हफिज बागवान यांनी सांगितले. गतवर्षी जिल्ह्यात सहा हजार हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादनातही भरघोस वाढ झाली होती. जिल्ह्यातून चांगल्या प्रतीचा कांदा बंगरूळ , बेळगाव , सोलापूर, अहमदनगर, पुणे आदी ठिकाणी निर्यात केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला मोबदला मिळाला होता. मात्र यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी रबी, खरीप आणि उन्हाळी हंगामात कांदा लागवडीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात केवळ ११०० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. उत्पादन घटीचे परिणाम सध्या बाजारपेठेवर जाणवू लागले आहे. ऐन हिवाळ्यातच कांद्याची आवक ग्रामीण भागातून घटली आहे. त्यामुळे व्यापारात मात्र चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने कांदा आंतरपीकाच्या स्वरूपातही शेतकऱ्यांना परवडेना झाला आहे. दरवर्षी ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा यंदा मात्र व्यापाऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आणणार आहे. कांद्यासाठी व्यापाऱ्यांना वनवन भटकंती करावी लागणार आहे. ही परिस्थिती जिल्ह्यातीलच नसून इतर जिल्ह्यातही कांदा लागवडीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर गगणाला भिडणार असल्याचेही बागवान यांनी सांगितले. सध्या ग्रामीण भागातून थोड्याफार प्रमाणात कांद्याची आवक आहे. कांद्याचे दरही १५ ते २० रुपये किलो प्रमाणे आहेत. मात्र आगामी काळात हेच दर गगणाला भिडणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसभर दुकानावर थांबून सरासरी कांद्या, बटाट्याची विक्री होईना. तर दुसरीकडे ग्रामीण भागातून याची आवक घटल्याने पूर्ण बाजारपेठ सुनी-सुनी पडली आहे. दिवसाकाठी खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.- हफिज बागवान, व्यापारीआम्ही दुहेरी संकटात...एका बाजूने निसर्ग कोपलाय तर दुसऱ्या बाजूने प्रशासनाकडून कांद्याला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे बेभरवशी कांद्याचे उत्पादन घेण्याचे यंदा टाळले आहे. भाव घसरल्याने पीक न घेतलेलेच परवडले. आम्ही हतबल झालो आहोत.- भाऊसाहेब चाटे, शेतकरी, मांडवादरवर्षी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कांदा व्यापारपेठेत पाठविणे जिकीरीचे असते. यंदा लागवडच नसल्याने शेतकरी या पासून दूर आहेत. मात्र कसब लागणार आहे ती व्यापाऱ्यांची. दरवर्षी जिल्ह्यातून निर्यात केला जाणारा कांदा यंदा आयात करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. या करीता शहरातील बडे व्यापारी नगर, पुणे, सोलापूर या ठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे.