शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

लागवड क्षेत्र घटल्याने ११५ कोटींचा फटका

By admin | Updated: November 26, 2014 01:10 IST

राजेश खराडे , बीड जिल्ह्यात गतवर्षी पेक्षा कांदा लागवडीचे क्षेत्र निम्म्याहून कमी आले आहे. याचाच फटका व्यापारपेठांनाही बसणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वीस किलो प्रमाणे कांद्याचे दीडशे

 

राजेश खराडे , बीडजिल्ह्यात गतवर्षी पेक्षा कांदा लागवडीचे क्षेत्र निम्म्याहून कमी आले आहे. याचाच फटका व्यापारपेठांनाही बसणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वीस किलो प्रमाणे कांद्याचे दीडशे कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते. मात्र यंदा लागवड क्षेत्र कमी झाल्याने हेच उत्पन्न १५ रुपये किलो दराने ३५ कोटी ७५ लाखांवर येऊन ठेपले आहे. यामुळे जवळपास ११४ कोटी २५ लाखांचा फटका व्यापारपेठेला बसणार असल्याचे व्यापारी हफिज बागवान यांनी सांगितले. गतवर्षी जिल्ह्यात सहा हजार हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादनातही भरघोस वाढ झाली होती. जिल्ह्यातून चांगल्या प्रतीचा कांदा बंगरूळ , बेळगाव , सोलापूर, अहमदनगर, पुणे आदी ठिकाणी निर्यात केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला मोबदला मिळाला होता. मात्र यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी रबी, खरीप आणि उन्हाळी हंगामात कांदा लागवडीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात केवळ ११०० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. उत्पादन घटीचे परिणाम सध्या बाजारपेठेवर जाणवू लागले आहे. ऐन हिवाळ्यातच कांद्याची आवक ग्रामीण भागातून घटली आहे. त्यामुळे व्यापारात मात्र चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने कांदा आंतरपीकाच्या स्वरूपातही शेतकऱ्यांना परवडेना झाला आहे. दरवर्षी ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा यंदा मात्र व्यापाऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आणणार आहे. कांद्यासाठी व्यापाऱ्यांना वनवन भटकंती करावी लागणार आहे. ही परिस्थिती जिल्ह्यातीलच नसून इतर जिल्ह्यातही कांदा लागवडीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर गगणाला भिडणार असल्याचेही बागवान यांनी सांगितले. सध्या ग्रामीण भागातून थोड्याफार प्रमाणात कांद्याची आवक आहे. कांद्याचे दरही १५ ते २० रुपये किलो प्रमाणे आहेत. मात्र आगामी काळात हेच दर गगणाला भिडणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसभर दुकानावर थांबून सरासरी कांद्या, बटाट्याची विक्री होईना. तर दुसरीकडे ग्रामीण भागातून याची आवक घटल्याने पूर्ण बाजारपेठ सुनी-सुनी पडली आहे. दिवसाकाठी खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.- हफिज बागवान, व्यापारीआम्ही दुहेरी संकटात...एका बाजूने निसर्ग कोपलाय तर दुसऱ्या बाजूने प्रशासनाकडून कांद्याला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे बेभरवशी कांद्याचे उत्पादन घेण्याचे यंदा टाळले आहे. भाव घसरल्याने पीक न घेतलेलेच परवडले. आम्ही हतबल झालो आहोत.- भाऊसाहेब चाटे, शेतकरी, मांडवादरवर्षी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कांदा व्यापारपेठेत पाठविणे जिकीरीचे असते. यंदा लागवडच नसल्याने शेतकरी या पासून दूर आहेत. मात्र कसब लागणार आहे ती व्यापाऱ्यांची. दरवर्षी जिल्ह्यातून निर्यात केला जाणारा कांदा यंदा आयात करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. या करीता शहरातील बडे व्यापारी नगर, पुणे, सोलापूर या ठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे.