शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

संकटग्रस्त बालकांसाठी ‘१०९८’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:16 AM

कोणी मुलगा हरवला आहे, कोणावर घरात अत्याचार होत आहेत, बालकामगार म्हणून बळजबरीने काम करून घेतले जात आहे, कोणी मूल नशेच्या आहारी गेले आहे, कोणी संकटात सापडले आहे, कोणाला त्वरित वैद्यकीय सेवा पाहिजे आहे, अशा वेळेस १०९८ या टोल फ्री नंबरवर कॉल करा. चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक काही वेळातच आपल्या मदतीसाठी धावून येतील.

ठळक मुद्देत्वरित मदत : चाईल्ड हेल्पलाईनवर औरंगाबाद जिल्ह्यातून दररोज ४० ते ५० फोन कॉल्स; स्वयंसेवक धावताहेत मदतीला

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोणी मुलगा हरवला आहे, कोणावर घरात अत्याचार होत आहेत, बालकामगार म्हणून बळजबरीने काम करून घेतले जात आहे, कोणी मूल नशेच्या आहारी गेले आहे, कोणी संकटात सापडले आहे, कोणाला त्वरित वैद्यकीय सेवा पाहिजे आहे, अशा वेळेस १०९८ या टोल फ्री नंबरवर कॉल करा. चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक काही वेळातच आपल्या मदतीसाठी धावून येतील.जन्माला आलेल्या, प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क आहे; मात्र आपल्या समाजात बालकांच्या प्रश्नाकडे आजही गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. अनेक बालकांना घरातच अत्याचार सहन करावा लागत आहे. काही बाळांना भूल देऊन भिकारी त्यांचा भावनिक वापर करून घेत आहेत. कचरा वेचणाऱ्या मुलांच्याही समस्या आहेत. अनेकदा मूल घरचा रस्ता विसरतात, हरवतात. संकटात सापडतात, कोण्या बालकाचा अपघात झाला आहे, अशा संकटाच्या वेळी त्या संकटग्रस्त बालकांनी किंवा पालक, नातेवाईक वा घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी कोणीही १०९८ या नंबरवर फोन केला, तर त्या मुलाला त्वरित मदत मिळू शकते. यासाठी जिल्ह्यात चाईल्ड हेल्पलाईनची सुरुवात झाली आहे.जिल्ह्यात चाईल्ड लाईन सुरू करण्यासाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र समन्वयक, समुपदेशक, सदस्य, स्वयंसेवक यांचे पथक तयार करण्यात आले आहे.मागील ११ मेपासून चाईल्ड लाईनची सुरुवात झाली असून, दररोज जिल्ह्यातून ४० ते ५० कॉल्स येत असल्याची माहिती एमजीव्हीएस संस्थेचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी दिली.२४ तास सुरू चाईल्ड हेल्पलाईन० ते १८ वयोगटातील संकटग्रस्त बालकांना मदत करण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा २४ तास सुरू असते. काळजी घेण्याची व संरक्षण देण्याची गरज असणाºया मुलांसाठीही संस्था काम करते. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास संस्थेतर्फे तातडीने मदत पुरविण्यात येते. महिला आणि बालविकास या केंद्रीय मंत्रालयाचा चाईल्ड लाईनला आधार आहे. चाईल्ड लाईन हे राज्य सरकार, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट सेक्टरशी जोडलेली असल्याची माहिती एमजीव्हीएस संस्थेचे अध्यक्ष मनसुख झांबड यांनी दिली.शाळांमधून करणार जनजागृतीएमजीव्हीएस संस्थेचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी सांगितले की, चाईल्ड लाईनचे कार्य व १०९८ हा टोल फ्री फोननंबरची माहिती देण्यासाठी शाळांमधून जनजागृती करण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक