चोरीचे १ लाखांचे सागवान रेल्वेतून जप्त
By Admin | Updated: May 24, 2014 00:43 IST2014-05-24T00:24:47+5:302014-05-24T00:43:55+5:30
किनवट : २३ मे रोजी वनविभागाच्या गस्ती पथकाने आदिलाबाद-पूर्णा-परळी गाडीतून पहाटे ५ वाजता १ लाख रुपयांचे १९ मोठे सागवान नग जप्त केले़

चोरीचे १ लाखांचे सागवान रेल्वेतून जप्त
किनवट : २३ मे रोजी वनविभागाच्या गस्ती पथकाने आदिलाबाद-पूर्णा-परळी गाडीतून पहाटे ५ वाजता १ लाख रुपयांचे १९ मोठे सागवान नग जप्त केले़ अंधाराचा फायदा घेत लाकूड चोरटे तर पळालेच, पण काही नगही घेवून ते पसार झाले़ हा प्रकार किनवट रेल्वेस्टेशनवर घडला़ आदिलाबाद-नांदेड मार्गावरील किनवट हे रेल्वेस्टेशन आंध्रा सीमावर्ती आहे़ या मार्गावरून अनेक रेल्वे ये-जा करतात़ प्रवाशांसाठी असणार्या रेल्वे गाड्यांचा सर्रास वापर लाकूड चोरट्यांनी लाकूड तस्करीसाठी, दारू तस्करीसाठी चालविला आहे़ प्रवाशांना त्रास देत या तस्करी बिनभोबाटपणे सुरू असतानाही रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिस मूग गिळून गप्पच आहेत़ २३ मे रोजी आदिलाबाद ते परळी-पूर्णा या पॅसेंजर गाडीने सागवान लाकडे सीमावर्ती अंबाडी जंगलातून किनवट येथे येत असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली़ त्यावरून किनवटचे वनक्षेत्रपाल बी़पी़ आडे, वनपाल एस़बी़ कोळी, डी़आऱ वळदकर, आऱबी़ पोतदार, ए़बी़ राठोड, भारत गोफणे, खामकर, गुरूसिंगे, घोडके, वनमजूर भरगे, पवार, शे़रफीक पुय्यड, शे़अप्सर यांनी किनवट पोलिस स्थानकावर रेल्वे डब्यातून सुमारे १ लाख रुपये किमतीचे चार पाट काढलेले १९ नग जप्त केले़ यापूर्वीही धनबाद एक्स्प्रेसमधून व पॅसेंजर गाडीतून सागवान लाकडे वनविभागाने जप्त केली होती़ संबंधित रेल्वे अधिकारी, कर्मचारी याकडे कानाडोळ तर करतातच, पण अर्थपूर्ण व्यवहार करूनच गाडीत लाकडे टाकली जात असल्याचे सांगण्यात येते़ आदिलाबाद-नांदेड मार्गावरील किनवट व अंबाडी हे दोन रेल्वेस्टेशन अवैध दारू, गुटखा व लाकूड तस्करीसाठी अलीकडे चर्चेत आले आहे़ आदिलाबादहून येणार्या गाडीत सागवान लाकडे व गुटखा येतो तर जाणार्या गाडीत प्रचंड दारूचे बॉक्स जात असतानाही याला आळा घालण्यास कोणी पुढे येत नसल्याने याचा त्रास प्रवाशांना होत आहे़ परवाच अंबाडी येथून जाणारे दारूचे बॉक्स रेल्वेस्टेशन मास्तर व कर्मचार्यांनी रोखले़ मात्र दारू तस्करांनी हुज्जत तर घालीच, पण झटापट करून आपली व आल्या मालाची सुटका करून घेतली़ याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्धही केले होते़ पण लाकूडचोरटे, दारू तस्कर व गुटखा तस्कर यांचे व रेल्वेचे अधिकारी, कर्मचार्यांचे देवाण-घेवाणीचे संबंध असल्यानेच सध्या रेल्वे प्रवाशांबरोबरच लाकूड, दारू, गुटखा तस्करीसाठी वापरली जात आहे़ रेल्वेने होणारी सागवानाची तस्करी पाहता नांदेडचे उपवनसंरक्षक यांनी रेल्वेच्या नांदेड येथील अधिकार्यांच्या ही बाब पत्रव्यवहार करून निदर्शनास आणून दिली़ पण काहीच उपयोग झाला नसावा, असेच दिसून येते़ वेळीच लाकूड चोरट्यांचा बंदोबस्त न झाल्यास अंबाडी व रेल्वे पटरीला लागून असलेले किनवट तालुक्यातील जंगल नष्ट होण्याची भीती वृक्षपे्रमी करीत आहेत़ (वार्ताहर)