शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

वर्षभरापूर्वीच मनपाला रामाळातील प्रदूषणाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 5:00 AM

ऐतिहासिक रामाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे तलावाचे अस्तित्व नष्ट होत असून, या पाण्यामुळे मानवासह इतर पशुपक्षांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, तलाव भरल्यानंतर ते पाणी लगेच नदीत जाऊन नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देप्रदुषण मंडाळाने पाण्याचे नमूने घेण्यापूर्वीच प्रदूषणाची कळविली दाहकता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धन तसेच प्रदूषणाबाबत इको-प्रोने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आता  सामाजिक संघटनांसह सामान्य नागरिकही जुळत आहे. दरम्यान, रामाळा तलावातील प्रदूषणाची पातळी मोठी असून, ते पाणी पिण्यायोग्य नसून, जलचल प्राण्यांनाही धोकादायक ठरत आहे. यासंदर्भात वर्षभरापूर्वीच म्हणजे, १४ फेब्रुवारी २०२० लाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून अवगत केले होते. मात्र महापालिका प्रशासनाने या पत्राकडे दुर्लक्ष केल्याचे आता समोर आले आहे.येथील ऐतिहासिक रामाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे तलावाचे अस्तित्व नष्ट होत असून, या पाण्यामुळे मानवासह इतर पशुपक्षांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, तलाव भरल्यानंतर ते पाणी लगेच नदीत जाऊन नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले.विशेष म्हणजे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ५ मार्च २०२० तसेच १३ मार्च २०२० ला तलावाच्या पाण्याचे नमुने घेतले होते. या नमुन्याच्या पृथ्थकरण अहवालातून बीओडीचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे. घरगुती सांडपाण्यामुळे ते प्रमाण वाढण्याची शक्यताही व्यक्त केली होती. तसेच एसएस, टीडीएस, आर्यन, शिशे आदीचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचेही नमूद केले होते. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २५ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मनपाने वर्षभर काहीच का केले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नमुने घेण्यापूर्वीच मनपाला पत्रमहाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ५ मार्च २०२० तसेच १३ मार्च २०२० ला रामाळा तलावाच्या पाण्याचे नमुने घेतले होते. यापूर्वीच म्हणजे १४ फेब्रुवारी २०२० ला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने महापालिका प्रशासनाला  पत्र पाठवून पाणी प्रदूषित असल्याचे कळविले होते. हे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने २५  फेब्रुवारी २०२१ ला जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रातून स्पष्ट होत आहे. प्रदूषण मंडळाने तत्परता दाखविली असतानाही महापालिका प्रशासनाने रामाळा तलावातील प्रदूषणाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे.

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण