शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘रेफर टू’च्या प्रवासात महिलेचा मृत्यू

By admin | Updated: September 4, 2014 23:41 IST

माणिकगड पहाडावरील जिवती तालुक्यातील भारी येथील रहिवासी निर्मला रामचंद्र बावणे (२२) हिला प्रसुतीनंतर अचानक डायरीयाने ग्रासले. तिला भारी उपकेंद्रातून पाटणस्थित प्राथमिक आरोग्य केंद्रात

राजुरा : माणिकगड पहाडावरील जिवती तालुक्यातील भारी येथील रहिवासी निर्मला रामचंद्र बावणे (२२) हिला प्रसुतीनंतर अचानक डायरीयाने ग्रासले. तिला भारी उपकेंद्रातून पाटणस्थित प्राथमिक आरोग्य केंद्रात रेफर करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करुन गडचांदूरस्थित ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले. तिथेही महिलेची गंभीर स्थिती पाहून चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात रेफर केले. या प्रकारामुळे तिला वेळेवर योग्य उपचार मिळू शकला नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘रेफर टू’ अशी चालढकल केल्यामुळे चंद्रपूरच्या सार्वजनिक रुग्णालयात वाहनातच तिचा मृत्यू झाला.भारी येथील निर्मला बावने हिची पहिली प्रसुती भारी येथील आरोग्य उपकेंद्रातील परिचारिकेने ३ आॅगस्टला दुपारी २ वाजता केली. त्यानंतर तिला बाळासह घरी पाठविण्यात आले. रात्री ११ वाजता प्रसुत महिलेस अचानक डायरिया झाला. तेव्हा भारी उपकेंद्रातील परिचारिकेने उपचार करुन प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे रेफर केले. भारी येथे रुग्णवाहीका नसल्यामुळे जिवती येथील आरोग्य केंद्रातील फोन नंबर १०८ व १०२ वर कळवून रुग्णास नेण्यासाठी रुग्णवाहीका पाठविण्यास सांगण्यात आले. परंतु रुग्णवाहिका आली नाही. शेवटी रुग्णाची स्थिती पाहून गावातील अॉटोमध्ये तिला पाटण येथील प्रा.आरोग्य केंद्रात रात्री १ वाजता दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करुन गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. येथे रात्री ३ वाजता पोहोचताच रुग्णाची स्थिती व रात्रीची झोपमोड पाहता तिला चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आले. पहाटे पाच वाजताच्या दरम्यान चंद्रपूर रुग्णालयात येताना जवळच तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, प्रत्येक ठिकाणी तिच्यावर केवळ प्राथमिकच उपचार करण्यात आला. तिच्यावर पाटण व गडचांदूर येथील रुग्णालयात योग्य उपचार होणे आवश्यक होते. परंतु याकडे लक्ष दिले नाही.(तालुका प्रतिनिधी)