शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या इच्छाशक्तीने महापौरपदाची चुरस वाढणार

By admin | Updated: October 25, 2014 22:36 IST

केंद्रात भाजपा, राज्यात भाजपा आणि आता गावातही भाजपाचीच सत्ता हवी असा संदेश सदस्यांमध्ये घुमवित चंद्रपूर मनपातील महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे नगरसेवकही सिद्ध होऊ पाहात आहेत.

काँग्रेस विभागली तीन गटात : पुगलिया-नागरकर यांचा गट एकत्रगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरकेंद्रात भाजपा, राज्यात भाजपा आणि आता गावातही भाजपाचीच सत्ता हवी असा संदेश सदस्यांमध्ये घुमवित चंद्रपूर मनपातील महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे नगरसेवकही सिद्ध होऊ पाहात आहेत. काँग्रेसमधील एका गटाला मदत करण्यापेक्षा असंतुष्टांच्या सहकार्याने आपलीच सत्ता स्थापण्याचे मनसुबे भाजपाच्या गोटात रचले जात असल्याने चंद्रपुरातील महापौर पदाच्या निवडणुकीत रंग भरला जाण्याची शक्यता आहे.चंद्रपूर महानगर पालिकेत काँगे्रस हा सर्वात मोठा पक्ष आहे. २६ सदस्य या पक्षाकडे आहेत. त्या पाठोपाठ भाजपाकडे १८ सदस्य असल्याने या पक्षाचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून चंद्रपूर महानगर पालिकेत काँग्रेस तीन गटात विभागली आहे. विद्यमान महापौर संगीता अमृतकर आणि स्थायी समिती सभापती रामू तिवारी यांनी वेगळी चुल मांडल्यापासून पक्षातील अंतर्गत वातावरण ताणाताणीचे झाले आहे. आपल्या गटाकडे १० ते १२ सदस्य असल्याचा या गटाचा दावा आहे. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याकडे काँगे्रसच्या गटाची सर्व सुत्रे होती. मात्र रिलायन्स जीओच्या मुद्यावरून महापौरांचा गट वेगळा झाला. असे असले तरी नरेश पुगलिया यांनी मनपाच्या राजकारणातील आपली पकड घट्ट ठेवली आहे. १२ ते १५ सदस्य आपल्या गटाशी अद्यापही जुळून असल्याचा दावा या गटाकडून होत आहे.तिसरा गट माजी स्थायी समिती सभापती आणि विद्यमान महानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांचा आहे. माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया यांच्यासह पाच नगरसेवक या गटासोबत जुळून आहेत. काँग्रेस महानगर अध्यक्ष या नात्याने नागरकर यांची जबाबदारी मनपात वाढली आहे. महत्वाचे म्हणजे ते स्वत: मनपाच्या राजकारणात सक्रिय असून नगरसेवक आहेत. त्यामुळे आपली कामगिरी त्यांना पक्षापुढे दाखवावीच लागणार आहे.राजकारणातील बेरीज-वजाबाकीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर महापौर अमृतकर यांचा गट आणि भाजपा जवळ आले आहेत. अमृतकर गटाने राखी कंचर्लावार यांना भावी महापौर म्हणून पुढे केले आहे. भाजपानेही या नावावर सहमती दर्शवित या गटाला मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची मानसिकताहीे सत्तास्थापनेकडे झुकल्याने महापौरांचा गट अस्वस्थ झाला आहे. दरम्यान, तडजोडीच्या राजकारणात नंदू नागरकर आणि नरेश पुगलिया यांचा गट बराच जवळ आला आहे. या गटाच्या आजवर किमान दोन ते तीन वेळा बैठकाही झाल्या असून एकत्रित येऊन महापौरपदाची निवडणूक लढण्याची रणनिती आखली आहे. या दोन्ही गटांचे मिळून १५ नगरसेवकांचे संख्याबळ जुळले आहे. या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महापौर गटातील नगरसेवकही आपल्या संपर्कात असल्याचा दावा या गटाकडून होत असल्याने पुगलिया- नागरकर गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या गटाने अद्याप आपला महापौरपदाचा उमेदवार जाहीर केलेला नसला तरी सोमवारनंतर संयुक्त बैठकीतून महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.