शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

प्रशासनाने रेती घाट लिलाव प्रक्रिया का थांबविली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:46 IST

नदीपात्र वाचले की पोखरले?: घरकुलधारकांना रेती देण्याचे काय झाले?

राजेश बारसागडे लोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून नागभीड तालुक्यातील प्रत्येक गावांत मोठ्या प्रमाणात लाभार्थीना घरकुल दिले आहे. मात्र, प्रशासनाने रेती देण्याचे आश्वासन पाळले नाही. अथवा रेती घाटांचा मागील तीन वर्षापासून लिलाव केला नाही. का केला नाही, हे अजूनही प्रशासनाने स्पष्ट केले नाही. त्यामुळे काही घरकुलधारक चोरीच्या माध्यमातून रेती विकत घेऊन कसेबसे घराचे बांधकाम उरकविण्याच्या तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे रेती तस्करांनी रात्रभर चोरीच्या मार्गाने रेती संकलन करून चढ्या भावाने रेती विक्रीचा अवैध चोरटा धंदा सुरू केला आहे.

परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने या बाबीला प्रशासनातीलच काही लोकांची मूक संमती असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील सावरगाव, चिखलगाव, वाढोणा, तळोधी येथील रेती घाटांतून प्रचंड प्रमाणात रेती उत्खनन होत असल्याची माहिती आहे. रेतीचे ट्रॅक्टर दररोज रात्री चालत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरीही प्रशासन गप्प बसण्यातच धन्यता मानत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

शासनाच्या धोरणानुसार तालुक्यात अनेक गावांतील घरकुल लाभार्थीना घरकुल मिळाले आहे. विशिष्ट दिवसांत घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. शिवाय, शासनाची इतरही बांधकामे आहेत. मात्र, रेतीशिवाय घरकुल अथवा कुठल्याही बांधकामाची कल्पना करणे कठीणच आहे. तेव्हा रेती घाटांचे लिलाव करणे अत्यंत गरजेचे आहे.

त्यामुळे बऱ्यापैकी रेती तस्करीला आळा बसेल. मात्र, शासनाने तब्बल तीन वर्षांपासून रेती घाटांचे लिलाव थांबविले आहे. मग ही सर्व बांधकामे रेतीशिवाय कशा पद्धतीने पूर्ण होणार आहेत, याबाबत शासन विचार करतो की नाही, हे न समजण्यापलीकडचे कोडे आहे. मग घरकुलांची बांधकामे थांबविल्या तर जाऊ शकणार नाही. त्यामुळे रेती तस्करी जोमात सुरू असून, तस्कर चढ्या भावाने रेतीची विक्री करीत आहेत. म्हणूनच त्यांची गब्बरगिरी वाढली आहे. कारण, कारवाईचा कुठलाही बडगा त्यांच्यावर उभारला जात नाही.

घरकुल लाभार्थीना तस्करीतील रेती देण्याचे शासनाचे धोरण होते, ते तर हवेतच विरले आहे. नागभीड तालुक्यात कुण्याही घरकुल लाभार्थीला अशाप्रकारे शासन स्तरावरून रेती मिळाली नसल्याची माहिती आहे. 

ती घोषणा हवेतच विरली काय?रेती घाटांचे लिलाव झाले नाहीत. मात्र, तालुक्यात रेती तस्करी जोरात सुरू असून, शासनाचा महसूल बुडत आहे. एकंदरीत या पार्श्वभूमीवर तस्करीची मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध करून घरकुलधारकांना पुरविण्याची घोषणा प्रशासकीय यंत्रणेने केली होती. त्यानुसार काही घरकुलधारकांनी घराचे बांधकामच सुरू केले नसल्याची माहिती आहे. रेतीची वाट बघण्यातच अशांचे दिवस जात आहेत. प्रशासनाची ती घोषणा हवेतच विरली की काय, असे घरकुल लाभार्थीना आता वाटायला लागले आहे.

रेती तस्करांना कुणाचे अभय ?नागभीड पंचायत समितीने तहसील कार्यालयाकडे मंजूर घरकुलांसाठी एक हजार ५२० ब्रास रेतीची मागणी केली आहे. दरम्यान, तहसील कार्यालयानेही सदर प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती आहे. मात्र, घरकुल लाभार्थीना प्रत्यक्षात अजूनही रेती मिळालेली नाही. मात्र, अवैध मार्गाने नद्यांची दर्जेदार रेती इतरत्र उपलब्ध होत आहे. या सूट मागे कुणाचे हात आहे, हे सर्वज्ञात आहेच. 

३ वर्षांपासूनरेती घाटाचे अधिकृत लिलाव झाले नसले तरी तालुक्यातील सावरगाव, चिखलगाव, वाढोणा, तळोधी (बा.) आदी गावांतील नदीपात्रातील रेती घाटांवरील रेतीचा उपसा सातत्याने सुरू आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरsandवाळू