शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

५० वर्षे जुन्या वीज तारा केव्हा बदलणार ? महावितरणचा ग्रामीण भागाकडे कानाडोळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:34 IST

सत्तरच्या दशकातील तारा आजही वापरात : ग्रामीण भागाची वीजेवर चाललेली तगमग!

लोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव (पि) : गेल्या साठ-सत्तरीच्या दशकापासून ग्रामीण भागातील अनेक गावांत विजेचे आगमन होऊन दिव्यांचा झगमगाट झाला असला, तरी वीज वाहून नेणाऱ्या खांबावरील अल्युमिनिअमच्या तारा नव्याने पुनर्जीवित न झाल्यामुळे त्या शेवटची घटका मोजत ग्राहकांसाठी समस्यांचे माहेरघर बनल्या आहेत.

आज या तारांचीच वाट लागलेली असल्याने तार तुटणे, व्होल्टेज कमी होणे, वेळोवेळी फॉल्ट होणे, दिवसासातून दहा वेळा लाइन जाणे आदी समस्यांनी हाच विभाग त्रस्त झाला आहे. काही गावागावांत वीज चोरीवर आळा बसावा याकरिता केबल टाकल्या गेले आहे. आपल्याकडील शेतातील विद्युत तारा मात्र आहे, त्या अवस्थेत शेवटची घटका मोजत आहेत. शहरी भागात या जुन्या तारांचे नूतनीकरण झाले. मात्र, ग्रामीण भागात साठ सत्तरच्या दशकातील अल्युमिनिअमच्या ताराच कायम आहेत. 

तांब्याच्या तारा लागल्याच नाहीशहरी भागात मात्र तांब्याच्या ताराचा वापर केला गेला आहे. अल्युमिनिअमऐवजी तांब्याची तार वीज वहनासाठी सुरक्षित व दीर्घकाळ टिकणारी असताना शहरी भागात या जुन्या तारांचे नूतनीकरण झाले. मात्र, ग्रामीण भागात साठ-सत्तरच्या दशकातील ज्या अल्युमिनिअमच्या तारा आहेत, त्यावरच कारभार सुरू आहे.

लोंबकळणाऱ्या तारांना बांबूचा आधारअनेक वर्षांपासून या तारातून वीज वहन होत असल्याने या जीर्ण तारा अनेक ठिकाणी लांबल्या आहेत. त्यामुळे तारांना तारा चिकटत असल्यामुळे फॉल्ट होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह घरगुती ग्राहकांना दोन्ही ताराच्या मध्ये बांबूच्या काड्या बांधाव्या लागत आहे.

वीज समस्यांकडे कानाडोळाचपावसाळ्यापूर्वी वीज वितरणकडून दुरुस्तीच्या नावाखाली पैसे खर्च करून तारांवरील झाडांची छाटणी असो किंवा इतर किरकोळ कामे घाईगडबडीत केल्या जात असल्यामुळे ग्रामीण भागात भर पावसाळ्यात विजेच्या अनेक समस्या निर्माण होते. मात्र, याकडे महावितरण नेहमीच कानाडोळा करीत आले आहे.मंगेश शेंडे, तरुण युवक पळसगाव.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरelectricityवीज