शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

वऱ्हाडी नसलेला असाही एक लग्नसोहळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

लग्नपत्रिकाही छापल्या. त्या आप्तेष्ट नातेवाईक व संबधित व्यक्तींना वाटण्यातही आल्या. घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. वरात नेण्यासाठी वाहनही बुक झाले. बॅन्ड पथकही ठरविले. घोडीही ठरविण्यात आली. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. परंतु त्यांच्या आनंदावर विरजण पडले एका मंदिरात फक्त वधूचे आईवडील मामा व वराचे आईवडील आणि मामा यांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडला.

ठळक मुद्देसंडे अ‍ँकर। समाजापुढे आदर्श, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याचा प्रयत्न

अमोद गौरकार ।लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : ना सनई-चौघडे...ना बॅन्ड बाजा पथक..ना भटजी...ना वऱ्हाडी..ना जेवनावडी.. नाही मानपान.. नाही कोणताच थाटमाट. अगदी साध्या पद्धतीने विवाह करून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याचा प्रयत्न दोन कुटुंबीयांनी करीत समाजापुढे आदर्श ठेवला आहे.मागील काही दिवसांपासून कोरोनाने देशभरातच थैमान घातले आहे. त्यामुळे प्रशासनाने लोकांना एकत्रित जमा होऊ नका, एकमेकांच्या संपर्कात येऊ नका, शक्य होत असेल तर लग्न कार्य पुढे ढकला, असे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसादही मिळत आहे. प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी शंकरपूर येथील हिंगे परिवार पुढे आला. शंकर हिंगे यांच्या मुलगा आकाश याचे लग्न डिसेंबर महिन्यात जुळले. तेव्हाच साक्षगंध आटोपून १९ मार्च तारीखही काढली. लग्नपत्रिकाही छापल्या. त्या आप्तेष्ट नातेवाईक व संबधित व्यक्तींना वाटण्यातही आल्या. घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. वरात नेण्यासाठी वाहनही बुक झाले. बॅन्ड पथकही ठरविले. घोडीही ठरविण्यात आली. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. परंतु त्यांच्या आनंदावर विरजण पडले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयापासूनच कोरोना या विषाणूजन्य रोगाने महाराष्ट्रात पाय पसरलाय सुरुवात केली. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून जनतेला आवाहन केल.े त्यामुळे लग्न करायचे की नाही, की पुढे ढकलायचे असा गंभीर प्रश्न हिंगे परिवाराला पडला. अखेर त्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत फक्त वर-वधु आणि आईवडील एवढेच जण एकत्र येत लग्न सोहळा उरकविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वधू पक्षांकडील हिरुडकर परिवाराला कळविण्यात आला.त्यांनीसुद्धा या निर्णयाला समर्थन दिले आणि एका मंदिरात फक्त वधूचे आईवडील मामा व वराचे आईवडील आणि मामा यांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडला. शनिवारी होणारे स्वागत समारंभही रद्द करण्यात आले. या निर्णयामुळे लग्न समारंभाच्या आनंदावर विरजण जरी पडले असेल तरीपण लोकांच्या आरोग्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे जनमाणसात स्वागत केले जात आहे.

टॅग्स :marriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस