शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

आझाद गार्डन भकास होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:24 IST

विविध उद्योग व वाढत्या वाहनांमुळे धूळ आणि प्रदूषित हवा हे चंद्रपूर शहराचे आजचे वास्तव आहे. शहरात सिमेंटचे जंगल झपाट्याने वाढू लागले. तितकेच प्रदूषणही वाढत आहे. शहर विकासाचे नियोजन करताना निसर्गाशी असलेला माणसासोबतचा संबंध कायम दुर्लक्षित केला जात आहे.

ठळक मुद्देसोयीसुविधांचा अभाव : मौलाना आझाद गार्डनच्या विकासात राजकारणाचा शिरकाव नको

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विविध उद्योग व वाढत्या वाहनांमुळे धूळ आणि प्रदूषित हवा हे चंद्रपूर शहराचे आजचे वास्तव आहे. शहरात सिमेंटचे जंगल झपाट्याने वाढू लागले. तितकेच प्रदूषणही वाढत आहे. शहर विकासाचे नियोजन करताना निसर्गाशी असलेला माणसासोबतचा संबंध कायम दुर्लक्षित केला जात आहे. यातून निसर्गाचा समतोल ढासळला. मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहेत, असा आरोग्य विभागाचा अहवाल सांगतो. त्यामुळे आझाद गार्डनच्या विकासासाठी कालबद्ध नियोजनाची आज गरज आहे.शहरातील नागरिकांच्या श्वासांना प्राणवायू देणारी एक विलक्षण जागा म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद गार्डनची ओळख बच्चे कंपनीपासून तर ज्येष्ठांपर्यंत आहे. खरे तर ही काही करमणुकीची जागा नाही. पण, विकासाच्या दीर्घकालीन नियोजनाचा अभाव आणि स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा बगीचा आता भकास होण्याचा मार्गावर आहे, अशी खंत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मौलाना अबुल कलाम आझाद गार्डनेचे संवर्धन करणे, ही मनपा प्रशासन व आपल्या जगण्याची एक नितांत गरज आहे. याचा सांभाळ केला नाही तर भविष्यात मोठी संकटे येतील. सिमेंटच्या जंगलात हीच एक हक्काची जागा आहे, अशी भावना दररोज सकाळी योगसनासाठी येणाऱ्या महिलांनी बोलून दाखविली. शहराच्या वाढत्या सिमेंटीकरणात माणसांची प्रकृती सुदृढ ठेवण्याचे दायित्व मनपा प्रशासनाला टाळता येणार नाही. गार्डनच्या विकासासाठी नगरसेवकांनी राजकारण करूनये, अशी अपेक्षा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाºया श्रीकांत येवले या विद्यार्थ्याने व्यक्त केली.- तर बालके शहरातच निसर्ग अनुभवतीलमोबाईल टिव्हीसारख्या विविध साधनांमुळे मुलांचे बालपण करपू लागले. पालकांशी संवाद तुटू लागला. अशा अस्वस्थ कालखंडात शहराच्या मध्यभागी असलेले आझाद गार्डन मुलांच्या निसर्ग शिक्षणासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र, गार्डनला नैसर्गिक स्वरूप देण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. यातून मुले निसर्गप्रेमी होतील. निरीक्षणशक्ती वाढेल. शहराचा भूगोल व इतिहासातून मुलांची मने समृद्ध होतील. मुलांना बदलत्या काळाशी सुसंगत ठेवताना आपल्या परिसराशी नाळ कायम राहील. निसर्गाबाबत आस्था निर्माण झाल्यास त्यांच्यात सामाजिक जाणिवा वाढतील. मनपाने याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना निवृत्त जिल्हा कोषाधिकारी प्रल्हाद कोल्हटकर यांनी केली.