शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आझाद गार्डन भकास होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:24 IST

विविध उद्योग व वाढत्या वाहनांमुळे धूळ आणि प्रदूषित हवा हे चंद्रपूर शहराचे आजचे वास्तव आहे. शहरात सिमेंटचे जंगल झपाट्याने वाढू लागले. तितकेच प्रदूषणही वाढत आहे. शहर विकासाचे नियोजन करताना निसर्गाशी असलेला माणसासोबतचा संबंध कायम दुर्लक्षित केला जात आहे.

ठळक मुद्देसोयीसुविधांचा अभाव : मौलाना आझाद गार्डनच्या विकासात राजकारणाचा शिरकाव नको

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विविध उद्योग व वाढत्या वाहनांमुळे धूळ आणि प्रदूषित हवा हे चंद्रपूर शहराचे आजचे वास्तव आहे. शहरात सिमेंटचे जंगल झपाट्याने वाढू लागले. तितकेच प्रदूषणही वाढत आहे. शहर विकासाचे नियोजन करताना निसर्गाशी असलेला माणसासोबतचा संबंध कायम दुर्लक्षित केला जात आहे. यातून निसर्गाचा समतोल ढासळला. मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहेत, असा आरोग्य विभागाचा अहवाल सांगतो. त्यामुळे आझाद गार्डनच्या विकासासाठी कालबद्ध नियोजनाची आज गरज आहे.शहरातील नागरिकांच्या श्वासांना प्राणवायू देणारी एक विलक्षण जागा म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद गार्डनची ओळख बच्चे कंपनीपासून तर ज्येष्ठांपर्यंत आहे. खरे तर ही काही करमणुकीची जागा नाही. पण, विकासाच्या दीर्घकालीन नियोजनाचा अभाव आणि स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा बगीचा आता भकास होण्याचा मार्गावर आहे, अशी खंत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मौलाना अबुल कलाम आझाद गार्डनेचे संवर्धन करणे, ही मनपा प्रशासन व आपल्या जगण्याची एक नितांत गरज आहे. याचा सांभाळ केला नाही तर भविष्यात मोठी संकटे येतील. सिमेंटच्या जंगलात हीच एक हक्काची जागा आहे, अशी भावना दररोज सकाळी योगसनासाठी येणाऱ्या महिलांनी बोलून दाखविली. शहराच्या वाढत्या सिमेंटीकरणात माणसांची प्रकृती सुदृढ ठेवण्याचे दायित्व मनपा प्रशासनाला टाळता येणार नाही. गार्डनच्या विकासासाठी नगरसेवकांनी राजकारण करूनये, अशी अपेक्षा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाºया श्रीकांत येवले या विद्यार्थ्याने व्यक्त केली.- तर बालके शहरातच निसर्ग अनुभवतीलमोबाईल टिव्हीसारख्या विविध साधनांमुळे मुलांचे बालपण करपू लागले. पालकांशी संवाद तुटू लागला. अशा अस्वस्थ कालखंडात शहराच्या मध्यभागी असलेले आझाद गार्डन मुलांच्या निसर्ग शिक्षणासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र, गार्डनला नैसर्गिक स्वरूप देण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. यातून मुले निसर्गप्रेमी होतील. निरीक्षणशक्ती वाढेल. शहराचा भूगोल व इतिहासातून मुलांची मने समृद्ध होतील. मुलांना बदलत्या काळाशी सुसंगत ठेवताना आपल्या परिसराशी नाळ कायम राहील. निसर्गाबाबत आस्था निर्माण झाल्यास त्यांच्यात सामाजिक जाणिवा वाढतील. मनपाने याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना निवृत्त जिल्हा कोषाधिकारी प्रल्हाद कोल्हटकर यांनी केली.