शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आझाद गार्डन भकास होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:24 IST

विविध उद्योग व वाढत्या वाहनांमुळे धूळ आणि प्रदूषित हवा हे चंद्रपूर शहराचे आजचे वास्तव आहे. शहरात सिमेंटचे जंगल झपाट्याने वाढू लागले. तितकेच प्रदूषणही वाढत आहे. शहर विकासाचे नियोजन करताना निसर्गाशी असलेला माणसासोबतचा संबंध कायम दुर्लक्षित केला जात आहे.

ठळक मुद्देसोयीसुविधांचा अभाव : मौलाना आझाद गार्डनच्या विकासात राजकारणाचा शिरकाव नको

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विविध उद्योग व वाढत्या वाहनांमुळे धूळ आणि प्रदूषित हवा हे चंद्रपूर शहराचे आजचे वास्तव आहे. शहरात सिमेंटचे जंगल झपाट्याने वाढू लागले. तितकेच प्रदूषणही वाढत आहे. शहर विकासाचे नियोजन करताना निसर्गाशी असलेला माणसासोबतचा संबंध कायम दुर्लक्षित केला जात आहे. यातून निसर्गाचा समतोल ढासळला. मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहेत, असा आरोग्य विभागाचा अहवाल सांगतो. त्यामुळे आझाद गार्डनच्या विकासासाठी कालबद्ध नियोजनाची आज गरज आहे.शहरातील नागरिकांच्या श्वासांना प्राणवायू देणारी एक विलक्षण जागा म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद गार्डनची ओळख बच्चे कंपनीपासून तर ज्येष्ठांपर्यंत आहे. खरे तर ही काही करमणुकीची जागा नाही. पण, विकासाच्या दीर्घकालीन नियोजनाचा अभाव आणि स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा बगीचा आता भकास होण्याचा मार्गावर आहे, अशी खंत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मौलाना अबुल कलाम आझाद गार्डनेचे संवर्धन करणे, ही मनपा प्रशासन व आपल्या जगण्याची एक नितांत गरज आहे. याचा सांभाळ केला नाही तर भविष्यात मोठी संकटे येतील. सिमेंटच्या जंगलात हीच एक हक्काची जागा आहे, अशी भावना दररोज सकाळी योगसनासाठी येणाऱ्या महिलांनी बोलून दाखविली. शहराच्या वाढत्या सिमेंटीकरणात माणसांची प्रकृती सुदृढ ठेवण्याचे दायित्व मनपा प्रशासनाला टाळता येणार नाही. गार्डनच्या विकासासाठी नगरसेवकांनी राजकारण करूनये, अशी अपेक्षा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाºया श्रीकांत येवले या विद्यार्थ्याने व्यक्त केली.- तर बालके शहरातच निसर्ग अनुभवतीलमोबाईल टिव्हीसारख्या विविध साधनांमुळे मुलांचे बालपण करपू लागले. पालकांशी संवाद तुटू लागला. अशा अस्वस्थ कालखंडात शहराच्या मध्यभागी असलेले आझाद गार्डन मुलांच्या निसर्ग शिक्षणासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र, गार्डनला नैसर्गिक स्वरूप देण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. यातून मुले निसर्गप्रेमी होतील. निरीक्षणशक्ती वाढेल. शहराचा भूगोल व इतिहासातून मुलांची मने समृद्ध होतील. मुलांना बदलत्या काळाशी सुसंगत ठेवताना आपल्या परिसराशी नाळ कायम राहील. निसर्गाबाबत आस्था निर्माण झाल्यास त्यांच्यात सामाजिक जाणिवा वाढतील. मनपाने याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना निवृत्त जिल्हा कोषाधिकारी प्रल्हाद कोल्हटकर यांनी केली.