शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
2
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
3
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
4
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
5
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
6
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
7
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
8
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
9
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
10
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
11
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
12
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
13
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
14
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
15
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
16
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
17
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
18
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
19
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
20
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी

१५ गावात पाणी टंचाईच्या झळा तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 3:46 PM

Chandrapur : पाण्यासाठी सुरु आहे पायपीट; विहिरींनी गाठला तळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड पंचायत समिती अंतर्गत १५ गावात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या गावातील विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींचे पाणी तळाशी गेल्याने १५ गावातील नागरिकांची पाण्यासाठी चांगलीच त्रेधा तिरपट उडत असल्याची माहिती आहे.

उन्हाळा आता ऐन भरात आहे. त्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक पाणी स्त्रोतावर महिलांची गर्दी वाढली आहे. परिणामी विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींनी तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी नळयोजनेच्या पाईपलाईन जीर्ण झाल्याने तर काही ठिकाणी जल जीवन मिशनद्वारा सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे.

पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार पांजरेपार येथील नळयोजना बंद पडल्याने येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पान्होळी येथील नळयोजनेच्या विहिरीत पाणी नसल्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कोर्धा, कोसंबी गवळी, नवेगाव हुंडेश्वरी, ढोरपा, चारगाव चक, मोहाळी, मिंथूर, कसर्ला येथील विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींनी तळ गाठल्याने या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कन्हाळगाव व बोंड येथे नळयोजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्याने या दोन गावात पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. कसर्ला येथील पाणीटंचाईस जल जीवन मिशनचे काम अपूर्ण हेही कारण सांगितल्या जात आहे.

सुचविण्यात आलेल्या उपाययोजनाया गावात पाणी टंचाईच्या समस्येचे त्वरित निवारण करण्यासाठी गावातील विहिरींचे गाळ काढणे, जुन्या विंधन विहिरी फ्लशिंग करणे, गावात नवीन विंधन विहिरी खोदणे, इन्व्हेल बोअर मारणे आदी उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. मात्र या उपाययोजनांची पूर्तता केव्हा करण्यात येते या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यातच आहे. यासंदर्भात येथील प्रभारी गटविकास अधिकारी शुक्रे यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, पण त्यांचेकडून प्रतिसाद मिळाला नाही.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर