शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या १५ हजारांत चार गावांत जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोळसा खाणींमुळे 'ड्राय झोन' तयार झाले आहे. पळसगाव व विसलोनसारख्या गावांमध्ये एक हजार फुटांपर्यंत बोअरवेल खोदले तरी पाणी लागत नाही. परिणामी, पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. गावापासून नदी वाहात असतानाही पाणीटंचाईची ही स्थिती उद्भवत असल्याने गावकरी चिंतेत सापडले होते.

ठळक मुद्देलोकसहभागाची फलश्रुती : शेतकऱ्यांना मिळते मुबलक पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी खर्च केल्यानंतरही अनेक ठिकाणी पाणी साठवता आलो नाही. परंतु, लोकसहभागातून गावकऱ्यांनी अवघ्या १५ हजारात भद्रावती तालुक्यातील चार गावांमध्ये जलक्रांती घडवून आणण्याची किमया करून दाखवली. शिरना नदीवर १५ फुट मातीचा बंधारा बांधल्यामुळे चार किलोमीटर परिसरात मुलबल पाणी उपलब्ध झाले. पळसगाव, विसलोन, कुचना व नागलोन येथील गावकऱ्यांप्रमाणे इच्छाशक्ती दाखविल्यास असे प्रयोग जिल्हाभरात यशस्वी होऊ शकतात.भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोळसा खाणींमुळे 'ड्राय झोन' तयार झाले आहे. पळसगाव व विसलोनसारख्या गावांमध्ये एक हजार फुटांपर्यंत बोअरवेल खोदले तरी पाणी लागत नाही. परिणामी, पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. गावापासून नदी वाहात असतानाही पाणीटंचाईची ही स्थिती उद्भवत असल्याने गावकरी चिंतेत सापडले होते. मात्र, यावर्षी लोकसहभागातून एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. पळसगाव, विसलोन, कुचना आणि नागलोन या कोळशाने व्याप्त गावांमध्ये जलक्रांती घडवून आणल्याची अनुभूती आली आहे. या गावांमधील शेतकरी अवघ्या १५ हजार रुपये व श्रमदानामुळे दुबार पेरणीसाठी उपयुक्त ठरले आहे. नंदोरीपासून विसलोन, पळसगाव, माजरी व नंतर वर्धा नदीला मिळणारी शिरना नदी पावसाळ्यात प्रवाहित असते.खरीप व रब्बी हंगामात या नदीला पाणी राहत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडतात. मात्र, यावर्षी केवळ १५ हजार रूपये खर्च करून काही दिवसांपूर्वी शिरना नदीत मातीचा १५ ते २० फूट आडवा बंधारा टाकण्यात आला. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात जनावरांनाही पिण्यासाठी पाणी राहात नसताना आता चार किलोमीटरपर्यंत पाणी साठविले आहे. पळसगाव येथे किसानपूत्र गटशेती योजनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र्र जीवतोडे यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग करण्यात आला असून चारही गावे जलयुक्त झाली आहे. या प्रयोगासाठी संदीप झाडे, प्रकाश निब्रड, परशराम डाहुले यांच्यासह गावकरी पुढे सरसावल्याने तिनही गावांतील जलसंकट कायमचे दूर झाले आहे.जिल्ह्यातील पहिला प्रयोगशेतकरी व गावकऱ्यांना सोबत घेऊन जलसिंचनाचे प्रयोग केल्यास समस्या दूर होऊ शकता. त्यासाठी लोकसहभाचे तत्त्व महत्त्वाचे आहे. पळसगाव, विसलोन, कुचना व नागलोन येथील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बांधलेला हा बंधारा शासनाच्या योजनेसाठी पथदर्शी ठरू शकतो. त्यामुळे असे शाश्वत सिंचनाचे प्रयोग जिल्ह्यात राबविण्याची गरज आहे.चंद्र्रपूर जिल्हा कोळशाने व्याप्त असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. वेकोलिच्या सीएसआर फंडातून लहान व मोठ्या नद्यांवरही बंधारे बांधणे गरजेचे आहे. पळसगाव व परिसरात आम्ही राबविलेला प्रयोग प्रत्येक गावात झाला तर जिल्ह्यात जलक्रांती होऊ शकते.- नरेंद्र्र जीवतोडे,जिल्हाध्यक्ष, किसानपूत्रशेतकरी गटशेती योजना

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प