शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

अवघ्या १५ हजारांत चार गावांत जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोळसा खाणींमुळे 'ड्राय झोन' तयार झाले आहे. पळसगाव व विसलोनसारख्या गावांमध्ये एक हजार फुटांपर्यंत बोअरवेल खोदले तरी पाणी लागत नाही. परिणामी, पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. गावापासून नदी वाहात असतानाही पाणीटंचाईची ही स्थिती उद्भवत असल्याने गावकरी चिंतेत सापडले होते.

ठळक मुद्देलोकसहभागाची फलश्रुती : शेतकऱ्यांना मिळते मुबलक पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी खर्च केल्यानंतरही अनेक ठिकाणी पाणी साठवता आलो नाही. परंतु, लोकसहभागातून गावकऱ्यांनी अवघ्या १५ हजारात भद्रावती तालुक्यातील चार गावांमध्ये जलक्रांती घडवून आणण्याची किमया करून दाखवली. शिरना नदीवर १५ फुट मातीचा बंधारा बांधल्यामुळे चार किलोमीटर परिसरात मुलबल पाणी उपलब्ध झाले. पळसगाव, विसलोन, कुचना व नागलोन येथील गावकऱ्यांप्रमाणे इच्छाशक्ती दाखविल्यास असे प्रयोग जिल्हाभरात यशस्वी होऊ शकतात.भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोळसा खाणींमुळे 'ड्राय झोन' तयार झाले आहे. पळसगाव व विसलोनसारख्या गावांमध्ये एक हजार फुटांपर्यंत बोअरवेल खोदले तरी पाणी लागत नाही. परिणामी, पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. गावापासून नदी वाहात असतानाही पाणीटंचाईची ही स्थिती उद्भवत असल्याने गावकरी चिंतेत सापडले होते. मात्र, यावर्षी लोकसहभागातून एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. पळसगाव, विसलोन, कुचना आणि नागलोन या कोळशाने व्याप्त गावांमध्ये जलक्रांती घडवून आणल्याची अनुभूती आली आहे. या गावांमधील शेतकरी अवघ्या १५ हजार रुपये व श्रमदानामुळे दुबार पेरणीसाठी उपयुक्त ठरले आहे. नंदोरीपासून विसलोन, पळसगाव, माजरी व नंतर वर्धा नदीला मिळणारी शिरना नदी पावसाळ्यात प्रवाहित असते.खरीप व रब्बी हंगामात या नदीला पाणी राहत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडतात. मात्र, यावर्षी केवळ १५ हजार रूपये खर्च करून काही दिवसांपूर्वी शिरना नदीत मातीचा १५ ते २० फूट आडवा बंधारा टाकण्यात आला. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात जनावरांनाही पिण्यासाठी पाणी राहात नसताना आता चार किलोमीटरपर्यंत पाणी साठविले आहे. पळसगाव येथे किसानपूत्र गटशेती योजनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र्र जीवतोडे यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग करण्यात आला असून चारही गावे जलयुक्त झाली आहे. या प्रयोगासाठी संदीप झाडे, प्रकाश निब्रड, परशराम डाहुले यांच्यासह गावकरी पुढे सरसावल्याने तिनही गावांतील जलसंकट कायमचे दूर झाले आहे.जिल्ह्यातील पहिला प्रयोगशेतकरी व गावकऱ्यांना सोबत घेऊन जलसिंचनाचे प्रयोग केल्यास समस्या दूर होऊ शकता. त्यासाठी लोकसहभाचे तत्त्व महत्त्वाचे आहे. पळसगाव, विसलोन, कुचना व नागलोन येथील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बांधलेला हा बंधारा शासनाच्या योजनेसाठी पथदर्शी ठरू शकतो. त्यामुळे असे शाश्वत सिंचनाचे प्रयोग जिल्ह्यात राबविण्याची गरज आहे.चंद्र्रपूर जिल्हा कोळशाने व्याप्त असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. वेकोलिच्या सीएसआर फंडातून लहान व मोठ्या नद्यांवरही बंधारे बांधणे गरजेचे आहे. पळसगाव व परिसरात आम्ही राबविलेला प्रयोग प्रत्येक गावात झाला तर जिल्ह्यात जलक्रांती होऊ शकते.- नरेंद्र्र जीवतोडे,जिल्हाध्यक्ष, किसानपूत्रशेतकरी गटशेती योजना

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प