शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

अवघ्या १५ हजारांत चार गावांत जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोळसा खाणींमुळे 'ड्राय झोन' तयार झाले आहे. पळसगाव व विसलोनसारख्या गावांमध्ये एक हजार फुटांपर्यंत बोअरवेल खोदले तरी पाणी लागत नाही. परिणामी, पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. गावापासून नदी वाहात असतानाही पाणीटंचाईची ही स्थिती उद्भवत असल्याने गावकरी चिंतेत सापडले होते.

ठळक मुद्देलोकसहभागाची फलश्रुती : शेतकऱ्यांना मिळते मुबलक पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी खर्च केल्यानंतरही अनेक ठिकाणी पाणी साठवता आलो नाही. परंतु, लोकसहभागातून गावकऱ्यांनी अवघ्या १५ हजारात भद्रावती तालुक्यातील चार गावांमध्ये जलक्रांती घडवून आणण्याची किमया करून दाखवली. शिरना नदीवर १५ फुट मातीचा बंधारा बांधल्यामुळे चार किलोमीटर परिसरात मुलबल पाणी उपलब्ध झाले. पळसगाव, विसलोन, कुचना व नागलोन येथील गावकऱ्यांप्रमाणे इच्छाशक्ती दाखविल्यास असे प्रयोग जिल्हाभरात यशस्वी होऊ शकतात.भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोळसा खाणींमुळे 'ड्राय झोन' तयार झाले आहे. पळसगाव व विसलोनसारख्या गावांमध्ये एक हजार फुटांपर्यंत बोअरवेल खोदले तरी पाणी लागत नाही. परिणामी, पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. गावापासून नदी वाहात असतानाही पाणीटंचाईची ही स्थिती उद्भवत असल्याने गावकरी चिंतेत सापडले होते. मात्र, यावर्षी लोकसहभागातून एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. पळसगाव, विसलोन, कुचना आणि नागलोन या कोळशाने व्याप्त गावांमध्ये जलक्रांती घडवून आणल्याची अनुभूती आली आहे. या गावांमधील शेतकरी अवघ्या १५ हजार रुपये व श्रमदानामुळे दुबार पेरणीसाठी उपयुक्त ठरले आहे. नंदोरीपासून विसलोन, पळसगाव, माजरी व नंतर वर्धा नदीला मिळणारी शिरना नदी पावसाळ्यात प्रवाहित असते.खरीप व रब्बी हंगामात या नदीला पाणी राहत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडतात. मात्र, यावर्षी केवळ १५ हजार रूपये खर्च करून काही दिवसांपूर्वी शिरना नदीत मातीचा १५ ते २० फूट आडवा बंधारा टाकण्यात आला. या बंधाऱ्यामुळे नदीपात्रात जनावरांनाही पिण्यासाठी पाणी राहात नसताना आता चार किलोमीटरपर्यंत पाणी साठविले आहे. पळसगाव येथे किसानपूत्र गटशेती योजनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र्र जीवतोडे यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग करण्यात आला असून चारही गावे जलयुक्त झाली आहे. या प्रयोगासाठी संदीप झाडे, प्रकाश निब्रड, परशराम डाहुले यांच्यासह गावकरी पुढे सरसावल्याने तिनही गावांतील जलसंकट कायमचे दूर झाले आहे.जिल्ह्यातील पहिला प्रयोगशेतकरी व गावकऱ्यांना सोबत घेऊन जलसिंचनाचे प्रयोग केल्यास समस्या दूर होऊ शकता. त्यासाठी लोकसहभाचे तत्त्व महत्त्वाचे आहे. पळसगाव, विसलोन, कुचना व नागलोन येथील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बांधलेला हा बंधारा शासनाच्या योजनेसाठी पथदर्शी ठरू शकतो. त्यामुळे असे शाश्वत सिंचनाचे प्रयोग जिल्ह्यात राबविण्याची गरज आहे.चंद्र्रपूर जिल्हा कोळशाने व्याप्त असल्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. वेकोलिच्या सीएसआर फंडातून लहान व मोठ्या नद्यांवरही बंधारे बांधणे गरजेचे आहे. पळसगाव व परिसरात आम्ही राबविलेला प्रयोग प्रत्येक गावात झाला तर जिल्ह्यात जलक्रांती होऊ शकते.- नरेंद्र्र जीवतोडे,जिल्हाध्यक्ष, किसानपूत्रशेतकरी गटशेती योजना

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प