शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना निवडणुकीच्या भत्त्याची प्रतीक्षा

By admin | Updated: August 31, 2014 23:43 IST

लोकसभा निवडणुकीच्या कामात असलेल्या होमगार्ड व पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंतही भत्ता मिळाला नव्हता. आता विधानसभा निवडणूक समोर आली आहे. तेव्हा भत्त्यावरुन पोलीस

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या कामात असलेल्या होमगार्ड व पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंतही भत्ता मिळाला नव्हता. आता विधानसभा निवडणूक समोर आली आहे. तेव्हा भत्त्यावरुन पोलीस दलात नाराजीचा सूर दिसून येत आहे.चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडावी, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि होमगार्डसना तैनात करण्यात आले होते. ४ हजार ५०० पोलीस कर्मचारी आणि ७५९ होमगार्ड यांना कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी दिली होती. यात नागपूर आणि नाशिक येथील होमगार्डचा समावेश होता. मुंबई येथून २५० महिला पोलीस येथे बोलविण्यात आल्या. होमगार्डसना एक दिवसासाठी सुमारे आठशे रुपये भत्ता दिला जातो. परंतु निवडणूक विभागाने बूथवरील काही कर्मचाऱ्यास भत्ता देवून मोकळे केले आहे. त्यांचे सहकारी त्याच्यासोबतच काम करीत होते. परंतु त्यांना भत्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे भत्त्यावरुन येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पोलीस दलात नाराजी पसरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रात्री प्रशासकीय भवनात आपला भत्ता घेण्यासाठी होमगार्ड गेले असता त्यांना भत्ता मिळाला नाही. जवळपास ३५० होमगार्डना भत्त्यापासून वंचित राहावे लागले. तसेच काही पोलीस कर्मचारीही भत्त्याच्या प्रतीक्षेत होते. निवडणूक काळातील तैनात कर्मचाऱ्यांना निवडणूक केंद्रावरच भत्ता देण्याची पद्धत आहे. मात्र, यातही दुजाभाव करण्यात आला. काही कर्मचाऱ्यांना मिळाला, तर काही वंचित राहिले. ज्यांना भत्ता मिळाला नाही, त्यांना चंद्रपूर येथील प्रशासकीय भवनात स्टॉल लावून भत्ता दिला जाईल, असे सांगितले. त्यानुसार कर्मचारी पोहोचलेसुद्धा. मात्र येथे भत्ता देण्यासंदर्भात कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे संतापलेले पोलीस कर्मचारी व होमगार्ड कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारणा केली. या अधिकाऱ्यांनीदेखील कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमधञये नाराजी पसरली आहे. निवडणुकीतील कर्तव्याचा भत्ता मिळाला नाही, याबाबत विचारणा कुणाकडे करायची, असा प्रश्न पोलीस विभागाकडे पडला आहे. त्यामुळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची नाराजी कायम आहे. (शहर प्रतिनिधी)