शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पोलिसांना निवडणुकीच्या भत्त्याची प्रतीक्षा

By admin | Updated: August 31, 2014 23:43 IST

लोकसभा निवडणुकीच्या कामात असलेल्या होमगार्ड व पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंतही भत्ता मिळाला नव्हता. आता विधानसभा निवडणूक समोर आली आहे. तेव्हा भत्त्यावरुन पोलीस

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या कामात असलेल्या होमगार्ड व पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंतही भत्ता मिळाला नव्हता. आता विधानसभा निवडणूक समोर आली आहे. तेव्हा भत्त्यावरुन पोलीस दलात नाराजीचा सूर दिसून येत आहे.चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडावी, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि होमगार्डसना तैनात करण्यात आले होते. ४ हजार ५०० पोलीस कर्मचारी आणि ७५९ होमगार्ड यांना कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी दिली होती. यात नागपूर आणि नाशिक येथील होमगार्डचा समावेश होता. मुंबई येथून २५० महिला पोलीस येथे बोलविण्यात आल्या. होमगार्डसना एक दिवसासाठी सुमारे आठशे रुपये भत्ता दिला जातो. परंतु निवडणूक विभागाने बूथवरील काही कर्मचाऱ्यास भत्ता देवून मोकळे केले आहे. त्यांचे सहकारी त्याच्यासोबतच काम करीत होते. परंतु त्यांना भत्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे भत्त्यावरुन येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पोलीस दलात नाराजी पसरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रात्री प्रशासकीय भवनात आपला भत्ता घेण्यासाठी होमगार्ड गेले असता त्यांना भत्ता मिळाला नाही. जवळपास ३५० होमगार्डना भत्त्यापासून वंचित राहावे लागले. तसेच काही पोलीस कर्मचारीही भत्त्याच्या प्रतीक्षेत होते. निवडणूक काळातील तैनात कर्मचाऱ्यांना निवडणूक केंद्रावरच भत्ता देण्याची पद्धत आहे. मात्र, यातही दुजाभाव करण्यात आला. काही कर्मचाऱ्यांना मिळाला, तर काही वंचित राहिले. ज्यांना भत्ता मिळाला नाही, त्यांना चंद्रपूर येथील प्रशासकीय भवनात स्टॉल लावून भत्ता दिला जाईल, असे सांगितले. त्यानुसार कर्मचारी पोहोचलेसुद्धा. मात्र येथे भत्ता देण्यासंदर्भात कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे संतापलेले पोलीस कर्मचारी व होमगार्ड कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारणा केली. या अधिकाऱ्यांनीदेखील कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमधञये नाराजी पसरली आहे. निवडणुकीतील कर्तव्याचा भत्ता मिळाला नाही, याबाबत विचारणा कुणाकडे करायची, असा प्रश्न पोलीस विभागाकडे पडला आहे. त्यामुळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची नाराजी कायम आहे. (शहर प्रतिनिधी)