शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

मामा तलावांना सीमांकनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 9:48 PM

चंद्रपूर जिल्ह्यात जि.प.च्या लघु सिंचन विभागाकडे १ हजार ६७८ मामा तलाव असून हे सर्व तलाव सीमांकनाच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देअतिक्रमण वाढले : शेतकरी व प्रशासनात वाद

घनश्याम नवघडे।आॅनलाईन लोकमतनागभीड : चंद्रपूर जिल्ह्यात जि.प.च्या लघु सिंचन विभागाकडे १ हजार ६७८ मामा तलाव असून हे सर्व तलाव सीमांकनाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी या तलावांवरील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सिंचन क्षमता कमी होत आहे.१६ मे २०१६ च्या जल-१ या निर्णयानुसार या तलावांचे पुनरूज्जीवन करण्याचे शासनाने ठरविले आहे. यानुसार २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ४१४ तलावांच्या दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. ऊर्वरित कामे २०१९ पर्यत करण्यात येणार आहेत. असे असले तरी त्याअगोदर या तलावांचे सीमांकन होणे गरजेचे आहे. मात्र या तलावांचे सीमांकन करण्याची तसदी न घेता जि.प.च्या लघु सिंचन विभागाने तलावांचे पुनरूज्जीवन करण्याचे काम सुरू केले. तेच मुळ चुकीचे आहे, असे यासंदर्भात बोलले जात आहे.वास्तविक, सीमांकनाअभावी या तलावात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अतिक्रमणामुळे मामा तलाव काही ठिकाणी आपले अस्तित्व हरवून बसले असून सिंचन क्षमता कमी झाली आहे. या अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी अतिक्रमणधारक, गावकरी व प्रशासन यांच्यात संघर्ष उद्भवल्याची उदाहरणे माहित असूनही जि.प या तलावांच्या सीमांकनाबाबत वेळ काढूपणाचे धोरण का अवलंबत आहे, हे एक कोडेच आहेसीमांकन करून तलावातील अतिक्रमण हटविल्यास पाण्याच्या संचय साठ्यात भर पडून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.प्रशासन व शेतकऱ्यांमधील वादही थांबतीललघु सिंचान विभागाकडे नसलेल्या पण जि. प. कडील एका विभागाच्या अखत्यारीतील मांगरूड आणि गोविंदपूर येथील तलावाच्या सीमांकनावरून नागभीड तालुक्यातच मोठे वाद उद्भवले होते. मांगरूड येथे तर उपविभागीय पातळीवरील वरिष्ठ अधिकाºयांच्या उपस्थितीत वेस्ट वेअर फोडावा लागल्याची घटना मागील वर्षी घडली होती. हेच सीमांकन अगोदर झाले असते तर ही वेळ आली नसती.मोजणी शुल्क भरण्यासाठी निधीच नाहीमामा तलावांचे सीमांकन करण्यासाठी उपविभागीय कार्यालयांनी सबंधित भूमी अभिलेख कार्यालयांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. असे असले तरी भूमी अभिलेख कार्यालय मोजणी शुल्क प्राप्त झाल्याशिवाय सीमांकन करून देत नसल्याने येथेच लघु सिंचाई विभागाचे घोडे अडले आहे. मात्र मोजणी शुल्क अदा करायला लघु सिंचन विभागाकडे निधीच नाही.तलावाच्या पोटात झालेल्या अतिक्रमणामुळे वारंवार होत असलेले वाद लक्षात घेऊन या सर्व तलावांचे सीमांकन करणे गरजेचे आहे. यावर जि.प.च्या सभेत आपण प्रश्नही उपस्थित केला होता. या तलावांचे सीमांकन करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहणार.- संजय गजपुरे, जि. प. सदस्य, चंद्रपूर .