शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ जिवलग मित्रांच्या मृत्यूने पाणावले गावकऱ्यांचे डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

गोवरी येथील संतोष रामकिसन लांडे (२७) व प्रीतम श्रीहरी परसुटकर (२५) या दोन जिवलग मित्रांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. सकाळी हसत-खेळत आनंदी असणारे दोन्ही चेहरे अचानक कायमचे निघून गेले. गावात निधनाची वार्ता धडकताच स्मशान शांतता पसरली. दुसºया दिवशी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एकाच रूग्णवाहिकेतून दोघांचेही शव गावात आणल्यानंतर अनेकांनी एकच हंबरडा फोडला.

ठळक मुद्देगोवरीत शोककळा । गावात पेटल्या नाही चुली

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : मृत्यू हे आयुष्यातले अंतिम सत्य आहे. मृत्युला कुणालाही नाकारता येत नाही. मात्र, अकाली नको, ही मानवाची इच्छा असते. येथील दोन जिवलग मित्रांचा दुचाकी अपघातात अकाली बळी गेल्याने चितेकडे पाहून गावकऱ्यांचे डोळे पाणावले. शुक्रवारी गावात कुणाचीही चूल पेटली नाही.गोवरी येथील संतोष रामकिसन लांडे (२७) व प्रीतम श्रीहरी परसुटकर (२५) या दोन जिवलग मित्रांचा दुचाकी अपघातातमृत्यू झाला. सकाळी हसत-खेळत आनंदी असणारे दोन्ही चेहरे अचानक कायमचे निघून गेले. गावात निधनाची वार्ता धडकताच स्मशान शांतता पसरली. दुसºया दिवशी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एकाच रूग्णवाहिकेतून दोघांचेही शव गावात आणल्यानंतर अनेकांनी एकच हंबरडा फोडला. वृद्धापकाळात आपल्या भावासोबत आईवडिलांचा आधार ठरणारे दोन युवक जीव कायम नजरेआड झाल्याने गावकºयांनी अन्नालाही शिवले नाही. संतोष लांडे या युवकाचा १२ एप्रिल २०२० रोजी विवाह ठरला होता. त्यामुळे संतोषच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरू होती. भावी जोडीदारासोबत आयुष्याची स्वप्ने रंगवित संतोषही आनंदाने घराची कामे करीत होता. घरात सर्वत्र आनंदी वातावरण होते. प्रीतम परसुटकर नुकताच मार्केटिंगचे काम करणाºया एका खासगी कंपनीत कामाला लागला होता. घरी आईवडिलांना आधार व्हावा म्हणून तोही मोठ्या जिद्दीने कामे करायचा. लहानपणी एकाच अंगणात खेळणाºया या दोन जिवलग मित्रांना आपण एकाच वेळेस दोघेही जगाचा निरोप घेणार असा विचारही कधी शिवला नसावा? मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.संतोष हा स्वत:च्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटप करून घराकडे परतत असताना आणि प्रीतम गावाकडून राजुरा येथे काही कामानिमित्त जात असताना अचानक नियतीने डाव साधला.दोघांच्याही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाल्याने दोनही जिवलग मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता गावात पसरताच येथे शोककळा पसरली. गावात काही घरी चूली पेटल्या नाही. नियतीने एवढा जबरदस्त आघात कुटुंबियांवर केला की त्यांच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. दोन मित्रांचे अकाली जाणे मनाला कायमचे चटका लावून गेले. शांत व मनमिळावू स्वभावाच्या दोन्ही मित्राने कायमचा जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पेटलेल्या चितेकडे गावकºयांना हुंदके आवरता आले नाही.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू