शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
3
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
4
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
5
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
6
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
7
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
8
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
9
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
10
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
11
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
12
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
13
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
14
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
15
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
16
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
17
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
18
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
19
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला

मुख्यमंत्र्यांच्या दौºयाकडे लागल्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:47 IST

चिमूर स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यविरांना मानवंदना देण्यासाठी देशाचे महामहीम राष्टÑपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी या भूमीत आले.

ठळक मुद्देचिमूरवासीयांचा सवाल : स्वातंत्र्यवीराच्या बलिदानाला न्याय मिळेल काय?

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यविरांना मानवंदना देण्यासाठी देशाचे महामहीम राष्टÑपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी या भूमीत आले. चिमूर स्वातंत्र लढ्याचा इतिहास पाहता चिमूर क्रांती जिल्ह्याचे आश्वासने दिलीत. मात्र चिमूर स्वातंत्र लढ्याच्या हिरक वर्षातही चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी शासन दरबारी खितपत पडली आहे. त्यामुळे अनेक आश्वासनानंतरही चिमूरकरांची झोळी रिकामीच आहे. इंग्रजकालीन परगणा असलेल्या चिमूरला स्वतंत्र भारतात क्रांती जिल्हा म्हणून घोषित केले जाईल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १६ आॅगस्टला चिमुरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर चिमूरसह वरोरा, नागभीड, ब्रह्मपुरी या तालुक्यांकडूनही जिल्ह्याची मागणी होत आहे. एकूणच आता सर्वांच्या नजरा मुख्यमंत्र्यांच्या दौºयाकडे लागल्या आहेत.१६ आॅगस्ट १९४२ ला चिमुरात इंग्रजाविरुद्ध रणसंग्राम झाला आणि चिमूर देशात प्रथमच तीन दिवस स्वतंत्र झाला. या तीन दिवस स्वातंत्र्यांची नोंद सुभाषचंद्र बोस यांनी बर्लीन रेडीओवरुन केली होती. या स्वातंत्र्यासाठी २१ क्रांतीविरांना फाशीची शिक्षा, २८ क्रांतीविराना जन्मठेप, ३०० चिमूरकरांना ब्रिटीश सरकारने अटक केली तर तीन क्रांतीवर शहीद झाले. इतकी किंमत चिमूरकरांनी चुकविली होती. चिमूरच्या स्वातंत्र्याची दखल पूर्ण जगाने घेतली होती. चिमूरचा स्वातंत्र लढा पूर्ण देशाच्या स्वातंत्र लढ्याचा मानबिंदू ठरला होता.इंग्रज राजवटीत चिमूर शहर ‘परगणा’ असल्याची नोंद इतिहासात आहे. त्यामुळे चिमूर क्रांती जिल्हा घोषित करावा, अशी मागणीस स्वतंत्र्य भारतात मागील ४७ वर्षापासून चिमूरकर करीत आहेत. आगस्ट महिना आला की राजकीय पुढाºयासह शासनाला चिमूरच्या लढ्याची आठवण होते आणि यासाठी देशाचे राष्टÑपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री महोदय या भूमीला वंदन करुन गेलेत व जिल्ह्याचे आश्वासनही देवून गेलेत. मात्र अजून हिरक वर्षातही चिमूरकरांच्या स्वातंत्र लढ्यासाठी सांडवलेल्या रक्ताला न्याय मिळाला नाही. चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीसाठी मागील ४७ वर्षात अनेक आंदोलने झाली. एक आंदोलन उग्र झाले होते. चक्क तहसील कार्यालयाची जाळपोळ करण्यात आली होती. तरी त्या शासनकर्त्यांना जाग आली नाही. इंग्रज राजवटीत चिमूर परगणा (जिल्हा) होता. इंग्रजाचा कारभार चिमूरवरुन चालायचा. आजच्या घडीला चिमूर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून ९३ ग्रामपंचायती आहेत. तर चिमूरमध्ये अनेक विकासकामाच्या दृष्टीने भौगोलिक परिस्थिती आहे.आंदोलनकर्ते स्थानबद्धचिमूर क्राती जिल्ह्याच्या मागणीसाठी आज रविवारी चक्काजाम आंदोलनं करीत असताना अटक करण्यात आलेले शिवसेना तालुका प्रमुख धरमसिह वर्मा, जिल्हा कृती समिती अध्यक्ष नरेंद्र बंडे, बाळुभाऊ बोभाटे, अविनाश अगडे, विलास मोहीनकर, मोतीराम लाखे, गजानन अगडे, मंगेश भैसारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबध्द करण्यात आले.तीच खरी श्रध्दांजलीचिमूरकर जे मागत आहेत, ते त्यांना मिळतच नाही. चिमूरकर म्हणतात, क्रांती जिल्हा हवा आहे. भारताच्या स्वातंत्र लढ्यात चुकविलेली किंमत आजही आम्ही भोगत आहेत. चिमूर स्वातंत्र लढ्याचे नाव सूवर्ण अक्षरानी इतिहासात लिहिले गेले आहे. स्वातंत्र्यानंतर संघराज्य निर्माण झाला. त्यात अनेक राज्य, जिल्हे निर्माण झालेत. मात्र चिमूर आजही उपेक्षितच राहिले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमूर स्वातंत्र्य लढ्याच्या हिरक वर्षात चिमूर क्रांती जिल्ह्याच्या निर्मितीचा शब्द देवून त्या स्वातंत्रविरांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या तालुक्यांनाही अपेक्षाआपला तालुकाही जिल्हा व्हावा, अशी अपेक्षा चिमूरसह नागभीड, ब्रह्मपुरी आणि वरोरा तालुकावासीयांचीही आहे. भौगोलिकदृष्टया त्यांचा परिसरही जिल्ह्यासाठी योग्य आहे, असा त्या त्या तालुकावासीयांचा दावा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हालाही न्याय द्यावा, अशी मागणी वरोरा, नागभीड व ब्रह्मपुरी तालुकावासीयांनी केली आहे.