शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

मुख्यमंत्र्यांच्या दौºयाकडे लागल्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:47 IST

चिमूर स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यविरांना मानवंदना देण्यासाठी देशाचे महामहीम राष्टÑपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी या भूमीत आले.

ठळक मुद्देचिमूरवासीयांचा सवाल : स्वातंत्र्यवीराच्या बलिदानाला न्याय मिळेल काय?

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यविरांना मानवंदना देण्यासाठी देशाचे महामहीम राष्टÑपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी या भूमीत आले. चिमूर स्वातंत्र लढ्याचा इतिहास पाहता चिमूर क्रांती जिल्ह्याचे आश्वासने दिलीत. मात्र चिमूर स्वातंत्र लढ्याच्या हिरक वर्षातही चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी शासन दरबारी खितपत पडली आहे. त्यामुळे अनेक आश्वासनानंतरही चिमूरकरांची झोळी रिकामीच आहे. इंग्रजकालीन परगणा असलेल्या चिमूरला स्वतंत्र भारतात क्रांती जिल्हा म्हणून घोषित केले जाईल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १६ आॅगस्टला चिमुरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर चिमूरसह वरोरा, नागभीड, ब्रह्मपुरी या तालुक्यांकडूनही जिल्ह्याची मागणी होत आहे. एकूणच आता सर्वांच्या नजरा मुख्यमंत्र्यांच्या दौºयाकडे लागल्या आहेत.१६ आॅगस्ट १९४२ ला चिमुरात इंग्रजाविरुद्ध रणसंग्राम झाला आणि चिमूर देशात प्रथमच तीन दिवस स्वतंत्र झाला. या तीन दिवस स्वातंत्र्यांची नोंद सुभाषचंद्र बोस यांनी बर्लीन रेडीओवरुन केली होती. या स्वातंत्र्यासाठी २१ क्रांतीविरांना फाशीची शिक्षा, २८ क्रांतीविराना जन्मठेप, ३०० चिमूरकरांना ब्रिटीश सरकारने अटक केली तर तीन क्रांतीवर शहीद झाले. इतकी किंमत चिमूरकरांनी चुकविली होती. चिमूरच्या स्वातंत्र्याची दखल पूर्ण जगाने घेतली होती. चिमूरचा स्वातंत्र लढा पूर्ण देशाच्या स्वातंत्र लढ्याचा मानबिंदू ठरला होता.इंग्रज राजवटीत चिमूर शहर ‘परगणा’ असल्याची नोंद इतिहासात आहे. त्यामुळे चिमूर क्रांती जिल्हा घोषित करावा, अशी मागणीस स्वतंत्र्य भारतात मागील ४७ वर्षापासून चिमूरकर करीत आहेत. आगस्ट महिना आला की राजकीय पुढाºयासह शासनाला चिमूरच्या लढ्याची आठवण होते आणि यासाठी देशाचे राष्टÑपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री महोदय या भूमीला वंदन करुन गेलेत व जिल्ह्याचे आश्वासनही देवून गेलेत. मात्र अजून हिरक वर्षातही चिमूरकरांच्या स्वातंत्र लढ्यासाठी सांडवलेल्या रक्ताला न्याय मिळाला नाही. चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीसाठी मागील ४७ वर्षात अनेक आंदोलने झाली. एक आंदोलन उग्र झाले होते. चक्क तहसील कार्यालयाची जाळपोळ करण्यात आली होती. तरी त्या शासनकर्त्यांना जाग आली नाही. इंग्रज राजवटीत चिमूर परगणा (जिल्हा) होता. इंग्रजाचा कारभार चिमूरवरुन चालायचा. आजच्या घडीला चिमूर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून ९३ ग्रामपंचायती आहेत. तर चिमूरमध्ये अनेक विकासकामाच्या दृष्टीने भौगोलिक परिस्थिती आहे.आंदोलनकर्ते स्थानबद्धचिमूर क्राती जिल्ह्याच्या मागणीसाठी आज रविवारी चक्काजाम आंदोलनं करीत असताना अटक करण्यात आलेले शिवसेना तालुका प्रमुख धरमसिह वर्मा, जिल्हा कृती समिती अध्यक्ष नरेंद्र बंडे, बाळुभाऊ बोभाटे, अविनाश अगडे, विलास मोहीनकर, मोतीराम लाखे, गजानन अगडे, मंगेश भैसारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबध्द करण्यात आले.तीच खरी श्रध्दांजलीचिमूरकर जे मागत आहेत, ते त्यांना मिळतच नाही. चिमूरकर म्हणतात, क्रांती जिल्हा हवा आहे. भारताच्या स्वातंत्र लढ्यात चुकविलेली किंमत आजही आम्ही भोगत आहेत. चिमूर स्वातंत्र लढ्याचे नाव सूवर्ण अक्षरानी इतिहासात लिहिले गेले आहे. स्वातंत्र्यानंतर संघराज्य निर्माण झाला. त्यात अनेक राज्य, जिल्हे निर्माण झालेत. मात्र चिमूर आजही उपेक्षितच राहिले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमूर स्वातंत्र्य लढ्याच्या हिरक वर्षात चिमूर क्रांती जिल्ह्याच्या निर्मितीचा शब्द देवून त्या स्वातंत्रविरांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या तालुक्यांनाही अपेक्षाआपला तालुकाही जिल्हा व्हावा, अशी अपेक्षा चिमूरसह नागभीड, ब्रह्मपुरी आणि वरोरा तालुकावासीयांचीही आहे. भौगोलिकदृष्टया त्यांचा परिसरही जिल्ह्यासाठी योग्य आहे, असा त्या त्या तालुकावासीयांचा दावा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हालाही न्याय द्यावा, अशी मागणी वरोरा, नागभीड व ब्रह्मपुरी तालुकावासीयांनी केली आहे.