अवकाळी वादळी पावसाचा पिकांना तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:35+5:30
शेतकऱ्यांना नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आता निसर्गासोबत कोरोनाही शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला हातभार लावत आहे. यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला रोहिण्या बरसल्या नाहीत. मृग नक्षत्रातही पाऊस वेळेवर आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाण्याची खरेदी करून लागवड केली. त्यानंतरही अनेक भागात कमी पाऊस झाला.

अवकाळी वादळी पावसाचा पिकांना तडाखा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातल्याने लॉकडाऊन सुरू आहे. शेतकरी रब्बी हंगामातील भाजीपाला व अन्य पिकांची काळजी घेत असतानाच गुरूवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी अकाली वादळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन असल्याने रब्बी हंगामातील कापसाची विक्री कुठे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
शेतकऱ्यांना नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आता निसर्गासोबत कोरोनाही शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला हातभार लावत आहे. यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला रोहिण्या बरसल्या नाहीत. मृग नक्षत्रातही पाऊस वेळेवर आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाण्याची खरेदी करून लागवड केली. त्यानंतरही अनेक भागात कमी पाऊस झाला. सोयाबीन, कापूस या खरीप पिकांचे आॅक्टोबर-नोव्हेंबरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. शेतकºयांना रब्बी पिकाच्या उत्पादनाची आशा होती. पीकही चांगले आले. ऐन पीक काढणीला आले असताना, मार्च अखेरीस कोरोनाने देशात धुमाकूळ घातला. हंगामातील गहू, हरभरा या पिकांची विक्री कुठे करायची, असा प्रश्न आता शेतकºयांसमोर आहे.
कपाशी पेरा घटणार
खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असून पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. यंदा जिल्ह्यात कपाशीचा पेरा घटण्याची चिन्हे दिसत आहेत. सोयाबीन, तूर व इतर पिकांचा पेरा अधिक वाढणार असल्याचे चित्र आहे. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहे. गतवर्षी गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली होती. संकटावर मात करीत यंदा खरीप तयारीसाठी शेतकरी कामाला लागला आहे. शेतांमध्ये खरिपासाठी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी व मजुरांद्वारे कोळपणी करण्याची कामे सुरू आहेत. रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने मजूर कामात व्यस्त आहेत. बँकेच्या नियमित कर्जदारांना पीक कर्जाचे वितरण एप्रिलच्या पहिल्या तारखेपासूनच वितरणाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी लागणारा पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणे गरजेचे झाले आहे.
धान, गहू उत्पादनात घट
जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे धान, सोयाबीन उत्पादन घटले. गहू पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने खर्चाच्या तुलनेत उत्पन्न झाले नाही. गव्हाची शेती तोट्यात गेल्याने खर्चाचा मेळ घालणे कठीण झाले आहे.
कापूस घरात पडून
शेतकऱ्यांनी भाव कमी असल्यामुळे अद्याप कापूस विकला नाही. भाव वाढतील, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला. मात्र, लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. घरात ठेवलेल्या कापसाची विक्री कशी करायची, असा प्रश्न उभा ठाकला आहे.