शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मोफत शाळा प्रवेशासाठी अडीच लाख विद्यार्थी रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:24 IST

आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकिया ५ मार्चपासून सुरु झाली आहे. राज्यातील एक लाख १६ हजार ८२१ जागेसांठी दोन लाख ३० हजार ६२३ जणांना आॅनलाईन अर्ज केले आहेत. प्रवेशासाठी पहिली सोडत एप्रिल महिन्यात निघणार आहे.

ठळक मुद्देराईट टू एज्युकेशन : एप्रिल महिन्यात निघणार सोडत

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकिया ५ मार्चपासून सुरु झाली आहे. राज्यातील एक लाख १६ हजार ८२१ जागेसांठी दोन लाख ३० हजार ६२३ जणांना आॅनलाईन अर्ज केले आहेत. प्रवेशासाठी पहिली सोडत एप्रिल महिन्यात निघणार आहे.आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. २०१९-२०२० या सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.यावर्षी राज्यातील ३६ जिल्ह्यातील नऊ हजार १९४ शाळांमधील एक लाख १६ हजार ८२१ जागांसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार राज्यात दोन लाख ३० हजार ६२३ अर्ज आले आहेत. यामध्ये विदर्भातील अकोला जिल्ह्यात ६००७, अमरावती ७८३१, भंडारा २३५३, बुलढाणा ४८६६, चंद्रपूर ३४८५, गडचिरोली ११०६, गोंदिया २५१४, नागपूर २५१६०, वर्धा ३८८५, वाशिम १४४८, यवतमाळ ४७४५ पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज सादर केले आहेत.मोबाईल अ‍ॅपमार्फत ८४५ अर्जआरटीईतर्फे नामांकित शाळेत प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट सुरु करण्यात आली. तसेच मोबाईल अ‍ॅपसुद्धा तयार करण्यात आले आहे. मात्र अ‍ॅपद्वारे केवळ ८४५ पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज केले आहे. त्यामध्ये हिंगोली एक, गोंदिया सहा, जलगाव १७, जालना ३६, कोल्हापूर ५४, लातूर १६, मुंबई १७, मुंबई १, नागपूर ४५, नांदेळ १७, अहमदनगर ३५, अकोला १२, अमरावती ६, औरंगाबाद ७९, भंडारा दोन, बीड ३५, बुलढाणा १९, चंद्रपूर तीन, धुळे ६, गडचिरोली दोन, नंदूरबार एक, नाशिक ४३, उस्मानाबाद १३, पालघर आठ, परभणी ८, पुणे २२४, राजगड १८, रत्नागीरा दोन, सांगली २६, सातारा आठ, सोलापूर १९, ठाणे ५२, वर्धा पाच, वाशिम चार, यवतमाळ पाच अ‍ॅपद्वारे अर्ज केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही अर्ज आला नाही.पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्जआरटीईतंर्गत मोफत प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यातील ९६३ शाळेतील १६६२३ जागेसाठी ५१ हजार ३२० पालकांनी अर्ज केले आहेत. नागपूर सात हजार २०४ जागेसाठी २५१६०, ठाणे १५१५२, औरंगाबाद १३५५० तर सर्वात कमी नंदूरबार ४८०, रत्नागिरी ८८९, सिंधुदुर्ग ५९३ पालकांनी अर्ज केले आहेत.