शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

मोफत शाळा प्रवेशासाठी अडीच लाख विद्यार्थी रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:24 IST

आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकिया ५ मार्चपासून सुरु झाली आहे. राज्यातील एक लाख १६ हजार ८२१ जागेसांठी दोन लाख ३० हजार ६२३ जणांना आॅनलाईन अर्ज केले आहेत. प्रवेशासाठी पहिली सोडत एप्रिल महिन्यात निघणार आहे.

ठळक मुद्देराईट टू एज्युकेशन : एप्रिल महिन्यात निघणार सोडत

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकिया ५ मार्चपासून सुरु झाली आहे. राज्यातील एक लाख १६ हजार ८२१ जागेसांठी दोन लाख ३० हजार ६२३ जणांना आॅनलाईन अर्ज केले आहेत. प्रवेशासाठी पहिली सोडत एप्रिल महिन्यात निघणार आहे.आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. २०१९-२०२० या सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.यावर्षी राज्यातील ३६ जिल्ह्यातील नऊ हजार १९४ शाळांमधील एक लाख १६ हजार ८२१ जागांसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार राज्यात दोन लाख ३० हजार ६२३ अर्ज आले आहेत. यामध्ये विदर्भातील अकोला जिल्ह्यात ६००७, अमरावती ७८३१, भंडारा २३५३, बुलढाणा ४८६६, चंद्रपूर ३४८५, गडचिरोली ११०६, गोंदिया २५१४, नागपूर २५१६०, वर्धा ३८८५, वाशिम १४४८, यवतमाळ ४७४५ पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज सादर केले आहेत.मोबाईल अ‍ॅपमार्फत ८४५ अर्जआरटीईतर्फे नामांकित शाळेत प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट सुरु करण्यात आली. तसेच मोबाईल अ‍ॅपसुद्धा तयार करण्यात आले आहे. मात्र अ‍ॅपद्वारे केवळ ८४५ पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज केले आहे. त्यामध्ये हिंगोली एक, गोंदिया सहा, जलगाव १७, जालना ३६, कोल्हापूर ५४, लातूर १६, मुंबई १७, मुंबई १, नागपूर ४५, नांदेळ १७, अहमदनगर ३५, अकोला १२, अमरावती ६, औरंगाबाद ७९, भंडारा दोन, बीड ३५, बुलढाणा १९, चंद्रपूर तीन, धुळे ६, गडचिरोली दोन, नंदूरबार एक, नाशिक ४३, उस्मानाबाद १३, पालघर आठ, परभणी ८, पुणे २२४, राजगड १८, रत्नागीरा दोन, सांगली २६, सातारा आठ, सोलापूर १९, ठाणे ५२, वर्धा पाच, वाशिम चार, यवतमाळ पाच अ‍ॅपद्वारे अर्ज केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही अर्ज आला नाही.पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्जआरटीईतंर्गत मोफत प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यातील ९६३ शाळेतील १६६२३ जागेसाठी ५१ हजार ३२० पालकांनी अर्ज केले आहेत. नागपूर सात हजार २०४ जागेसाठी २५१६०, ठाणे १५१५२, औरंगाबाद १३५५० तर सर्वात कमी नंदूरबार ४८०, रत्नागिरी ८८९, सिंधुदुर्ग ५९३ पालकांनी अर्ज केले आहेत.