शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

मोफत शाळा प्रवेशासाठी अडीच लाख विद्यार्थी रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:24 IST

आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकिया ५ मार्चपासून सुरु झाली आहे. राज्यातील एक लाख १६ हजार ८२१ जागेसांठी दोन लाख ३० हजार ६२३ जणांना आॅनलाईन अर्ज केले आहेत. प्रवेशासाठी पहिली सोडत एप्रिल महिन्यात निघणार आहे.

ठळक मुद्देराईट टू एज्युकेशन : एप्रिल महिन्यात निघणार सोडत

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१९-२०२० या शैक्षणिक सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रकिया ५ मार्चपासून सुरु झाली आहे. राज्यातील एक लाख १६ हजार ८२१ जागेसांठी दोन लाख ३० हजार ६२३ जणांना आॅनलाईन अर्ज केले आहेत. प्रवेशासाठी पहिली सोडत एप्रिल महिन्यात निघणार आहे.आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. २०१९-२०२० या सत्रासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.यावर्षी राज्यातील ३६ जिल्ह्यातील नऊ हजार १९४ शाळांमधील एक लाख १६ हजार ८२१ जागांसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार राज्यात दोन लाख ३० हजार ६२३ अर्ज आले आहेत. यामध्ये विदर्भातील अकोला जिल्ह्यात ६००७, अमरावती ७८३१, भंडारा २३५३, बुलढाणा ४८६६, चंद्रपूर ३४८५, गडचिरोली ११०६, गोंदिया २५१४, नागपूर २५१६०, वर्धा ३८८५, वाशिम १४४८, यवतमाळ ४७४५ पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज सादर केले आहेत.मोबाईल अ‍ॅपमार्फत ८४५ अर्जआरटीईतर्फे नामांकित शाळेत प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट सुरु करण्यात आली. तसेच मोबाईल अ‍ॅपसुद्धा तयार करण्यात आले आहे. मात्र अ‍ॅपद्वारे केवळ ८४५ पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज केले आहे. त्यामध्ये हिंगोली एक, गोंदिया सहा, जलगाव १७, जालना ३६, कोल्हापूर ५४, लातूर १६, मुंबई १७, मुंबई १, नागपूर ४५, नांदेळ १७, अहमदनगर ३५, अकोला १२, अमरावती ६, औरंगाबाद ७९, भंडारा दोन, बीड ३५, बुलढाणा १९, चंद्रपूर तीन, धुळे ६, गडचिरोली दोन, नंदूरबार एक, नाशिक ४३, उस्मानाबाद १३, पालघर आठ, परभणी ८, पुणे २२४, राजगड १८, रत्नागीरा दोन, सांगली २६, सातारा आठ, सोलापूर १९, ठाणे ५२, वर्धा पाच, वाशिम चार, यवतमाळ पाच अ‍ॅपद्वारे अर्ज केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही अर्ज आला नाही.पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्जआरटीईतंर्गत मोफत प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यातील ९६३ शाळेतील १६६२३ जागेसाठी ५१ हजार ३२० पालकांनी अर्ज केले आहेत. नागपूर सात हजार २०४ जागेसाठी २५१६०, ठाणे १५१५२, औरंगाबाद १३५५० तर सर्वात कमी नंदूरबार ४८०, रत्नागिरी ८८९, सिंधुदुर्ग ५९३ पालकांनी अर्ज केले आहेत.