शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

आदिवासी सोसायटी हमी भावाने करणार धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 6:00 AM

शासनाने नाफेड मार्फत हमी भावाने धान खरेदी केंद्र चिमूर येथे सुरू केले. परंतु चिमूर येथे धान विक्रीस जाणे त्रासदायक होते. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी हमी भावाने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करीत होते. शासनाने हमी भाव उच्च धान प्रती क्विंटल १ हजार ८३५ व १ हजार ८१५ असा जाहीर केला आहे. तर प्रती क्विंटल ७०० रुपये अनुदान जाहीर केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : धान उत्पादकांना चिमूरला जाण्याची अडचण दूर

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यावर्षी धानाचे उत्पादन बऱ्यापैकी झाले. परंतु बाजारामध्ये धानाचे भाव गडगडल्याने हमी भावाने धान खरेदी करावी, अशी मागणी केली जात होती. शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ आदिवासी सेवा सहकारी सोसायटींना हमी भावाने धान खरेदी करण्याचे अधिकार दिल्याने या केंद्रावर धान विकल्यास हमी भाव व धानाकरिता शासनाने जाहीर केलेले अनुदानही धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.शासनाने नाफेड मार्फत हमी भावाने धान खरेदी केंद्र चिमूर येथे सुरू केले. परंतु चिमूर येथे धान विक्रीस जाणे त्रासदायक होते. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी हमी भावाने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करीत होते. शासनाने हमी भाव उच्च धान प्रती क्विंटल १ हजार ८३५ व १ हजार ८१५ असा जाहीर केला आहे. तर प्रती क्विंटल ७०० रुपये अनुदान जाहीर केले आहे.शेतकऱ्यांना धान विक्रीकरिता जाताना धानाची नोंद असलेला सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक असने गरजेचे आहे. धान खरेदी एका शेतकऱ्यांकडून प्रती हेक्टर ३५ क्विंटल तर अनुदान ५० क्विंटलपर्यंत दिले जाणार आहे. धान विकल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. या नविन निर्णयामुळे काही प्रमाणात धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सोयाबीनची आवक वाढताच दर घसरलेचंद्रपूर : कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट सहन करीत शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक फटका सहन करावा लागतो. परतीच्या पावसात अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. काढणीला आलेले काही शेतकऱ्यांचे पीक पाण्यात गेले तर काही ठिकाणी पाणी लागल्याने सोयाबीनला डाग लागला. हाच डाग व्यापाऱ्यांची चांदी करणारा ठरला असून शेतकऱ्यांना मात्र याचा फटका सहन करावा लागत आहे. सोयाबीन काढणीनंतर बाजारात सोयाबीनला सर्वसाधारण दर तीन हजार ६०० रुपये प्रती क्विंटल होता मात्र, शेतकऱ्यांचा माल बाजारात विक्रीसाठी येताच सोयाबीनचा काळा डाग शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरला. ९० टक्के शेतकऱ्यांना कधीच उच्चांकी दर मिळाला नाही. मागील वर्षी साठवणूक करून ठेवणाऱ्या शेतकरी, व्यापाऱ्यांना दरवाढीचा अधिक फायदा झाला आहे. काळ्या डागाने प्रति क्विंटल किमान ८०० ते एक हजार रुपये शेतकऱ्यांना कमी मिळाले. त्यात पुन्हा ओलावा आल्याने शेतकरी पुरते हतबल झाले. रबी पेरणीच्या मशागतीसाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी मिळेल तो दर घेवून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केले. मात्र महिना भरातच दर वाढत गेल्याने अनेक शेतकऱ्यांना पश्चातपही झाला.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड