शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

घरात शौचालय, तरीही नागरिक उघड्यावर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 14:24 IST

Chandrapur : गावखेड्यात हागणदारीमुक्तीचा फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्क वासेरा : शासनाने ग्रामीण भागात 'स्वच्छ भारत मिशन' राबवून जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी गावे हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला घरोघरी शौचालय संकल्पना राबवून शौचालय बांधून दिले. मात्र, आजही घरात शौचालय असताना सिंदेवाही तालुक्यातील गावखेड्यांत महिला, पुरुष हे उघड्यावर शौचास जाताना दिसतात. तर शौचालयात काड्या, गोवरी इत्यादी साहित्य ठेवलेले आढळते. परिणामी ग्रामीण भागात हागणदारीमुक्तीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

गतकाळात शासनाने हागणदारीमुक्तीचा नारा देत सर्वत्र जनजागृती केली. जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे, या दृष्टीने ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे पटवून देण्यात आले. शासनाने कोणीही उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी प्रत्येक कुटुंबाला शौचालयासाठी अनुदान उपलब्ध करून दिले. तसेच ग्रामीण भागात पंचायत समिती व ग्रामपंचायतींतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. गुड मॉर्निंग पथके नेमण्यात आली. या पथकांद्वारे रोज फेरफटका मारून जनतेमध्ये जनजागृती करत आवश्यक सूचना केल्या. त्यासाठी हागणदारीमुक्त गावांना पुरस्कृतही करण्यात आले. पण हे अभियान काही दिवसांपुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसून येते.

गुड मार्निंग पथके गेली कुठे?■ सद्यस्थितीत कोणत्याही गावात हागणदारीमुक्तीची संकल्पना प्रत्यक्षात कुणीही अमलात आणताना दिसत नाही. तसेच कुठेही गुड मॉर्निंग पथक कार्यरत असल्याचे जाणवत नाही. त्यामुळेच की काय सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या दिव- सागणिक वाढत आहे.■ एकूणच प्रशासनाच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे स्वच्छता अभियानाचे व हाग- णदारीमुक्तीचे तीनतेरा वाजले आहेत. तेव्हा ग्रामीण भागात खरंच हागण- दारीमुक्ती करायची असेल, तर प्रशासनाला जोमाने आणि निरंतर काम करावे लागेल. जेणेकरून गावखेड्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे नागरिकांचे मत आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानchandrapur-acचंद्रपूर