शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

आजचा दिवस ठरविणार २७४ सदस्यांचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST

मूल : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम संपली. शुक्रवारी २७४ सदस्यांचे भवितव्य ...

मूल : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम संपली. शुक्रवारी २७४ सदस्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. यासाठी तालुका प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, १०९ केंद्रात कर्मचारी व पोलीस कामाला लागले आहेत.

निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ.रवींद्र होळी, निवडणूक नायब तहसीलदार यशवंत पवार विशेष लक्ष ठेवून आहेत. तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, २७४ सदस्यांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. यात ६९३ उमेदवार रिंगणात असून, ५१ हजार ६७७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. डोअर टु डोअर प्रचार थांबला असून, रात्रीला होणारा प्रचार उमेदवाराला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण पूर्वीच जाहीर न झाल्याने सरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी आपला गट निवडून यावा, यासाठी प्रयत्न चालविला जात आहे. शासन विविध कामांसाठी थेट ग्रामपंचायतीला निधी देत असल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने भाजपा, काँग्रेस या पक्षात चुरस असली तरी शिवसेना, बसपा, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. गावगाड्यातील राजकारण शहरापेक्षा वेगळे असल्याने वातावरण केव्हा तापेल, याचा नेम नाही. यासाठी तालुका प्रशासन ३५ गावात पोलीस यंत्रणेसह विशेष लक्ष ठेवून असल्याचे जाणवते.