शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

पोळ्यासाठी हजारो पळस वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:48 AM

पळस हा वरकरणी निरुपयोगी वाटत असला तरी या वृक्षात अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंतु, या वृक्षाची विज्ञानयुगातही पोळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पळस वृक्षांच्या फांद्या ग्रामीण व शहरी भागातही परंपरेने घरासमोर मेढे म्हणून ठेवल्या जातात. त्यामुळे पळस वृक्षांची संख्या कमी होताना दिसत आहे.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींकडून चिंता : पळस नामशेष होण्याच्या मार्गावर, नवीन पर्याय शोधावा

लोकमत न्यूज नेटवर्कआयुध निर्माणी (भद्रावती) : पोळा सणादरम्यान मेढ्यासाठी बहुगुणी पळस वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जाते. यामुळे पर्यावरणाचा ºहास होत असून बहुगुणी पळस वृक्षांची संख्या कमी होण्याची भिती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे.पळस हा वरकरणी निरुपयोगी वाटत असला तरी या वृक्षात अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंतु, या वृक्षाची विज्ञानयुगातही पोळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पळस वृक्षांच्या फांद्या ग्रामीण व शहरी भागातही परंपरेने घरासमोर मेढे म्हणून ठेवल्या जातात. त्यामुळे पळस वृक्षांची संख्या कमी होताना दिसत आहे. पळस वृक्ष ग्रामीण भागातील जनतेसाठी संकटमोचक म्हणून ओळखला जातो. घराला छत म्हणून, भिंतीला पाणी लागू नये म्हणून, तर कधी पत्रावळी व द्रोण म्हणून पळसाच्या पानांचावापर होतो. विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्यास सुरक्षिततेसाठी पळस वृक्षाचा आधार घेतात. व्यावसायिक दृष्टयाही पळसाचे महत्त्व आहे. प्लास्टिक बंदीनंतर पळसाच्या पानाच्या पत्रावळी द्रोणची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातून बेरोजगारांना रोजगार मिळू लागला आहे. पळस झाडावर लाख निर्मिती केली जाते. शेतकरी पळसाच्या मुळापासून शेतीपयोगी दोर बनवितात. पळसामध्ये औषधी गुणधर्महीआहे. अनेक औषधांमध्ये पळसाचा वापर केल्या जाते. मात्र पोळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पळसाची अवैधपणे कत्तल केली जाते. निसर्ग प्रखर उन्हाळ्यात रखरखीत असतो तेव्हा पळसाची केशरी रंगाची फुले निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकत टाकतात. होळी सणात याच फुलांपासून रंगपंचमीचा रंग बनविण्याची प्रथा आहे. मात्र परंपरा जपताना निसर्गाचा समतोल ढासळणार नाही याचेही भान सुशिक्षित पिढीने ठेवणे आता गरजेचे झाले, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे. शासनानेच पुढाकार घेऊन सणावारांच्या निमित्ताने होणारी बहुपयोगी पळसाची कत्तल थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण