शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

हजारो हेक्टर शेती पाण्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:37 AM

आसोलामेंढा तलाव पाथरी परिसरातील शेतकऱ्यांना वरदान तर पेंढरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहे. परिसरात आसोलामेंढा तलावाचा कोणत्याही प्रकारचा कालवा नाही. परंतु आसोलामेंढा तलावाच्या नावाखाली शेतकऱ्यांला पिक विमा मिळत नाहीं.

ठळक मुद्देसिंचन सुविधांचा अभाव : शेतकऱ्यांनी काय करावे?

सुनिल दहेलकर।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : आसोलामेंढा तलाव पाथरी परिसरातील शेतकऱ्यांना वरदान तर पेंढरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहे. परिसरात आसोलामेंढा तलावाचा कोणत्याही प्रकारचा कालवा नाही. परंतु आसोलामेंढा तलावाच्या नावाखाली शेतकऱ्यांला पिक विमा मिळत नाहीं. या परिसरात हजारो हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली आहे. सद्यस्थितीत धान पिकांना पाणी मिळत नसल्याने धान शेती पाण्यापासून वंचित आहे.तालुक्यातील पेंढरी परिसरात हजारो हेक्टर शेतीवर धान पिकाची लागवड केली आहे. या परिसरात सायमारा, मेंढा, मुण्डाला, पेंढरी, मरेगाव, चक मनकापूर, भारपायली, चारगाव, पणधारसराड, हिरापूर इत्यादी गावे येतात. समाजाचा विकास आणि देशाची आर्थिक भरभराट शेतीवर आहे. ग्रामीण भागात ८० टक्के कुटुंबातील सदस्याचे पोट शेतीवर अवलंबून आहे. तालुक्यात बोड्या, तलावासारखे पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु पाणी साठवणूक करण्याचे तंत्र आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात प्रशासनाला करता आले नाही. जलस्रोत वाढले नाही. याकरिता शासनाला आणखी जोर लावणे गरजेचे झाले आहे. आसोलामेंढा तलावाचा पेंढरी परिसरातील शेतकऱ्याला पाण्याचा लाभ मिळत नाही. यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असेल ?सिंचन क्षेत्रात शिस्त आणण्याची शासन एकीकडे घोषणा करते. सिंचन क्षेत्राचा अनुशेष भरून काढण्यासाठी विधानमंडळात आवाज उठविला जातो. पंरतु सिंचनाच्या सुविधा पाहिजे त्या प्रमाणात अजूनही मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. जलयुत शिवाराची चर्चा राज्यभर खूप झाली. जलयुक्त शिवार हा दुष्काळमुक्तीचा संकल्प पेंढरी परिसरात कूचकामी ठरतोय. परिसरात पाणी टंचाई असल्याने धान पीक ओंबीवर येत असताना जमिनीत ओलावा नाही. शेतीला भेगा जात आहेत. त्सिंचनाच्या सुविधांची कमतरता आहे. त्यावर उपाययोजना होताना दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. परिणामी शेतकरी चिंतेत आहे. आसोलामेंढातील पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी सरपंच बंडू मेश्राम, दामोदर गोबाडे, शेतकरी दशरथ शेडमाके, नामदेव कस्तुरे आदींनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती