शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

६५ वर्षापासून फ्लोराईडयुक्त पाण्यावरच तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 6:00 AM

नवानगर हे त्या गावाचे नाव असून नागभीड तालुक्यातील बोंड या ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. १९५६ साली ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा या गावचे या ठिकाणी पूनर्वसन करण्यात आले आणि नवानगर हे गाव उदयास आले. पूनर्वसन करण्यात आले. त्यावेळी ३१ कुटुंबांना वनविभागाने घरे आणि शेतीसाठी जागा उपलब्ध करून दिली.

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : १९५६ साली त्या गावाचे पूनर्वसन झाले. आणि एक नवीन गाव उदयास आले. अगदी तेव्हापासून ते गाव फ्लोराइडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवत आहे. एक वर्षापूर्वी तिथे वॉटर एटीएमचे काम करण्यात आले असले तरी अजून हे एटीएम सुरू झालेच नाही.नवानगर हे त्या गावाचे नाव असून नागभीड तालुक्यातील बोंड या ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. १९५६ साली ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा या गावचे या ठिकाणी पूनर्वसन करण्यात आले आणि नवानगर हे गाव उदयास आले. पूनर्वसन करण्यात आले. त्यावेळी ३१ कुटुंबांना वनविभागाने घरे आणि शेतीसाठी जागा उपलब्ध करून दिली. आता गावाचा विस्तार बराच झाला आहे. आणि गावाची लोकसंख्याही चारशेवर पोचली आहे. मात्र हे गाव पूर्णपणे जंगलात वसले असल्याने गावात जे काही पाण्याचे स्रोत्र आहेत, ते पूर्णपणे फ्लोराईडयुक्त आहेत. परिणामी गावातील अनेक लोक या पाण्याच्या आजाराचे बळी ठरले आहेत. दात पिवळी पडणे, ते वेडीवाकडी होणे, हातपाय दुखणे, सांधेदुखीचा त्रास या आजारांचा यात समावेश आहे. प्रारंभी लोकांना पुरेसे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा या पाण्याच्या दुष्परिणामाविषयी लोकांना कळू लागले, तेव्हा या पाण्यापासून आमची मुक्तता करा, अशी एकमुखी ते मागणी करू लागले. २००५ पासून तर ते या मागणीचा पाठपुरावा करीत आहेत. पण एकाही अधिकाऱ्याने या मागणीचा व समस्येचा अनेक वर्ष गांभीर्याने विचार केला नाही. मात्र गावकऱ्यांनी हार पत्करली नाही. त्यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. आणि अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. या गावात शुद्ध पाण्याचे वॉटर एटीएम मंजूर करण्यात आले. वर्षभरापूर्वीच वॉटर एटीएम लावण्यातही आले. मात्र वर्षभराचा कालावधी झाला असला तरी हे वॉटर एटीएम सुरू झालेच नाही. परिणामी नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे.

टॅग्स :Waterपाणी