शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

लॉकडाऊनमुळे अनेकांनी जपून ठेवल्या लॉकरमध्येच अस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 8:50 PM

लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांची इच्छा असतानाही धार्मिक स्थळी अस्थी नेण्यावर निर्बंध आले. त्यामुळे काही कुटुंंबीयांनी आप्तेष्टांच्या स्मृती जपण्यासाठी लॉकरमध्ये अस्थी जपून ठेवल्या तर काहींनी सोयीनुसार अस्थी विसर्जन करून कार्यक्रम आटोपता घेत आहेत.

ठळक मुद्देअस्थी विसर्जनास अडचणीपरवानगीचा ससेमिरा

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करून काही कुटुंबीय विविध धार्मिक ठिकाणी अस्थी विसर्जनासाठी घेऊन जातात. मात्र लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांची इच्छा असतानाही धार्मिक स्थळी अस्थी नेण्यावर निर्बंध आले. त्यामुळे काही कुटुंंबीयांनी आप्तेष्टांच्या स्मृती जपण्यासाठी लॉकरमध्ये अस्थी जपून ठेवल्या तर काहींनी सोयीनुसार अस्थी विसर्जन करून कार्यक्रम आटोपता घेत आहेत. चंद्रपूर शहरातील शांती धाममध्येही परवागनीविना काही व्यक्तींच्या अस्थी लॉकरमध्ये जपून ठेवण्यात आल्या आहेत.मृत्यूनंतर अस्थी विसर्जन करण्याच्या विविध धर्मांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रथा-परंपरा पाळताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. सर्वसाधारणपणे विदर्भात वर्धानदीच्या वढा संगम, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथील वैनगंगा नदी व माहूर येथेही अस्थी विसर्जन करण्यासाठी नेल्या जाते. मात्र लॉकडाऊनमुळे बंधने आली. बाहेर गावी जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असल्याने अस्थीचे विसर्जन कुठे करावे, हा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे. काहींनी आपल्या आप्तेष्टांच्या स्मृती जपण्यासाठी लॉकडाऊन संपेपर्यंत स्मशानघाटातील लॉकरमध्ये अस्थी सुरक्षित ठेवल्या आहेत. चंद्रपूर शहरातील शांतीधाममध्ये अस्थी ठेवण्यासाठी १६ लॉकरची व्यवस्था आहे. या लॉकरमध्ये सध्या १० अस्थी ठेवल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी या लॉकरमध्ये एक किंवा दोन दिवसच अस्थी ठेवल्या जात होत्या. काही कुटुंब अस्थी विसर्जन करण्यासाठी प्रशासकीय परवानगी मागत असून परवानगी मिळाल्यानंतरच त्या अस्थी येथून नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.इरईच्या पात्रात अस्थीचे विसर्जनलॉकडाऊन व शासकीय परवानगीचा ससेमीरा टाळण्यासाठी काही कुटुंबीय इरई नदीच्या पात्रात अस्थी कलशाचे विसर्जन करीत आहे. यात वेळ व पैशाचीही बचत होत आहे. काही जण सोयीनुसार आपआपल्या पद्धतीने अस्थीचे विसर्जन करीत आहेत.लॉकडाऊनपूर्वी शांतीधाममध्ये असलेल्या लॉकरमध्ये एक किंवा दोन दिवस अस्थी ठेवल्या जात होत्या. मात्र सध्या अस्थी ठेवण्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. अनेक जण आपल्या इच्छेनुसार अस्थीकलशचे विसर्र्जन करतात. मात्र आता ये-जा करण्याची परवानगी घ्यावी लागत असल्याने निर्बंध आले आहे.- नरेंद्र गर्गेलवार,टालव्यवस्थापक, शांतीधाम चंद्रपूर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस