शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागातील बदल्यांचा 'घोळ' संपेना ; प्रस्ताव मंत्रालयातील कृषी विभागातच रखडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:12 IST

Chandrapur : बदल्यांविरोधात तब्बल २१ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासन न्यायाधिकरणात (मॅट) धाव घेतली असून, काहींनी असंतोषातून रजेचा मार्ग स्वीकारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूरः राज्यातील १०० हून अधिक अधीक्षक, सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, लिपिक आणि लघुलेखक यांच्या विनंती बदल्यांभोवतीचा गोंधळ अद्यापही कायम आहे. या बदल्यांविरोधात तब्बल २१ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासन न्यायाधिकरणात (मॅट) धाव घेतली असून, काहींनी असंतोषातून रजेचा मार्ग स्वीकारला आहे. परिणामी, या बदल्यांचा 'घोळ' नेमका केव्हा संपणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समुपदेशन आणि विनंती बदलीद्वारे पदस्थापना मिळालेल्या अनेक अधिकाऱ्यांनी अद्याप नवीन ठिकाणी पदभार स्वीकारलेला नाही. परिणामी, कृषी आयुक्तांनी तब्बल ९९ अधिकाऱ्यांना पदमुक्त केले आहे. मात्र, पदमुक्तीनंतरही संबंधित अधिकारी नव्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. यातील ५० हून अधिक अधिकाऱ्यांनी कृषिमंत्र्यांकडे धाव घेतली असून, विविध कारणे नमूद करून त्यांनी विनंती बदल्यांचे अर्ज सादर केले होते.

आठ दिवसांपूर्वी कृषिमंत्र्यांनी या बदल्यांना मान्यताही दिली होती. मात्र, तो प्रस्ताव सध्या मंत्रालयातील कृषी विभागातच रखडला आहे. तांत्रिक कारणांचा दाखला देत या बदल्या थांबविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, काही अधिकाऱ्यांना मध्यस्थांमार्फत फोनवरून 'योग्य संदेश' देण्यात आल्याचेही वृत्त असून, त्यामुळे अनेक अधिकारी मंत्रालयातच ठाण मांडून बसल्याची माहिती चंद्रपूर कृषी विभागातील सूत्रांनी दिली. कृषी विभागातील वर्ग तीनच्या मुदतपूर्व विनंती बदल्यांचे अधिकार कृषिमंत्री आणि राज्यमंत्र्यांना होते. त्यांच्या शिफारशीनंतर या बदल्या होत होत्या. मात्र, तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी हे अधिकार कृषी आयुक्तांना दिले होते. मात्र, विनंती बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांची कारणे संयुक्तिक असूनही बदल्यांचा घोळ अद्याप संपलेला नाही. 

काहींनी स्वीकारला रजेचा पर्याय

प्रशासकीय बदल्या झाल्यानंतर नको असलेल्या ठिकाणी रुजू झाल्यास तेथेच कायम राहावे लागेल, या धास्तीने काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रजेचा पर्याय स्वीकारला आहे. पत्नी, आई, वडिलांचे आजारपण, मुलांचे शिक्षण, स्वतःचे आजारपण अशी कारणे सांगत वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केली. यात काही जणांनी आपले घर कार्यालयापासून ४०० मीटर अंतरावर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी बदली करावी, अशी कारणे दिल्याची माहिती आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Agriculture Department Transfers Muddle Continues; Proposal Stuck in Ministry

Web Summary : The transfer chaos in Maharashtra's agriculture department persists. Requests are pending, officers are on leave, and the proposal is stuck in the ministry due to technical issues despite ministerial approval.
टॅग्स :farmingशेतीGovernmentसरकार