शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

वाघाची डरकाळीने वरोरा तालुक्यातील गावात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 5:00 AM

सद्या शेतीचा हंगाम असून शेतात गहू, चणा, कापूस आदी पिके उभी आहेत. शेतकरी पिकाच्या मशागतीमध्ये व्यस्त असताना वरोरा तालुक्यातील शेंबळ करंजी, वायगाव, बेंबळ, बोरगाव (शि) आदी गावाच्या शेत शिवारात वाघाने धुमाकुळ घालणे सुरू केले आहे. सद्या वाघाने गाय व बैलावर हल्ले केले आहेत. वरोरा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना वाघाने दर्शन दिले आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून कापूस वेचणीकरिता मजूर मिळणे कठीण झाल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात शेतातील पिकांची काढणीसाठ शेतकरी व्यस्त असताना वरोरा तालुक्यातील अनेक गावाच्या शिवारात वाघाची दहशत आहे. सद्यातरी पाळीव प्राण्यांवर हल्ला करणे सुरू केल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक वाघाच्या दहशतीखाली असून बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.सद्या शेतीचा हंगाम असून शेतात गहू, चणा, कापूस आदी पिके उभी आहेत. शेतकरी पिकाच्या मशागतीमध्ये व्यस्त असताना वरोरा तालुक्यातील शेंबळ करंजी, वायगाव, बेंबळ, बोरगाव (शि) आदी गावाच्या शेत शिवारात वाघाने धुमाकुळ घालणे सुरू केले आहे. सद्या वाघाने गाय व बैलावर हल्ले केले आहेत. वरोरा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना वाघाने दर्शन दिले आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून कापूस वेचणीकरिता मजूर मिळणे कठीण झाल्याचे दिसून येत आहे. एकटी व्यक्ती शेतीकडे जात नाही. सायंकाळी लवकरच घराकडे परत येत असल्याने शेतातील कामावर त्याचा विपरित परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.वायगाव, बेंबळ, बोरगाव या गाव परिसरात वाघाने बस्तान मांडले असल्याने वाघ केव्हा येईल, याचा नेम नसल्याने शेतकरी वर्ग चांगलाच धस्तावला आहे. वन विभागाने वाघ वावरत असलेल्या ठिकाणी रात्र व दिवसा गस्त करणे सुरू केल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.शेतकऱ्याचा प्रामाणिकपणाबोरगाव (शि) येथील शेतशिवारात वाघ आल्याचे नागरिकांना दिसताच त्याला हुसकावून लावले. अशातच शेतात बांधून असलेल्या बैलाने दोर तोडला. त्याच्या तोंडाला दुखापत झाली. ही दुखापत वाघाने हल्ला केल्याने झाल्याची माहिती पंचक्रोशीत पोहचली. त्यानंतर शेतमालक अशोक खंगार यांनी बैल बांधून असलेल्या ठिकाणी शहानिशा केली तर बैलाने दोर तोडल्याने त्याला दुखापत झाल्याचे त्यांना दिसले. येथेही त्यांनी आपला प्रामाणिकपणा सिद्ध करुन दाखविला.जंगलामध्ये पाळीव प्राणी गेल्यानंतर जंगली प्राण्याने हल्ला केल्यास त्या पशुधन मालकाजवळ चराई पास असणे आवश्यक आहे.- किरण धानकुटेवनपरिक्षेत्र अधिकारी, खडसंगी.

टॅग्स :forestजंगल