शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

महाराष्ट्राच्या जमिनीवर तेलंगणाने दिले शेतकऱ्यांना वनहक्काचे पट्टे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 14:23 IST

‘त्या’ १४ गावांना वालीच नाही : महाराष्ट्राची जमीन अन् तेलंगणाचा ताबा

दीपक साबने

जिवती (चंद्रपूर) :महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमावादात अडकलेल्या 'त्या' वादग्रस्त १४ गावांतील पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या २३८७ हेक्टर जमिनीपैकी ४२९ हेक्टर जमिनीचे महसूल मोजणीचे काम भूमी अभिलेख कार्यालयाकडून झाले. उर्वरित मोजणीचे काम सुरू असतानाच तेलंगणासरकारने त्या वादग्रस्त १४ गावातील अनु. जमातीच्या ६१७ शेतकऱ्यांना वैयक्तिक वनहक्काचे पट्टे वितरीत केले आहे.

२००९ मध्येसुद्धा येथील ९६ अनु. जमातीच्या शेतकऱ्यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या हस्ते जमिनीचे पट्टे वितरित केले होते. मराठी माणसे व महाराष्ट्राचीच जमीन असताना महाराष्ट्रानेच त्या १४ गावांना वाळीत टाकले आहे. परिणामी महाराष्ट्राच्या गाफिलपणाचा फायदा घेत आधी आंध्रप्रदेश व आता तेलंगणा सरकार आपले अधिपत्य गाजवत आहे.

न्यायमूर्ती फाजल अली समितीने ठरविलेल्या आंतरराज्य सीमारेषेनुसार ही १४ गावे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत वसलेली आहेत. महाराष्ट्र-तेलंगणा सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयातून निकाली लागला आहे. १७ जुलै १९९७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही १४ वादग्रस्त गावे महाराष्ट्रात असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला. परिणामी २१ ऑगस्ट १९९७ ला आंध्रप्रदेशने दाखल केलेली रिट याचिका मागे घेतली. त्यामुळे या गावावर तेलंगणा सरकारचा कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु तेलंगणा सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत त्या १४ गावांत आपला हक्क गाजवत आहे.

महाराष्ट्र शासनाचे मौन का?

महाराष्ट्राच्या जमिनीवर मराठी नागरिकांना तेलंगणा सरकार जमिनीचे पट्टे वाटप करतात. तरीही महाराष्ट्र सरकार मौन का धारण करून बसलेय, हेच कळायला मार्ग नाही. महाराष्ट्रातील मराठी भाषिक असलेले एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयात लढा देणार असल्याचे भाष्य करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार सरकार आता चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात असलेल्या वादग्रस्त १४ गावांची दखल घेणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या गावात दिले पट्टे

जिवती तालुक्यातील पदमावती, अंतापूर, इंदिरानगर, महाराजगुडा, परमडोली तांडा, शंकरलोधी, भोलापूर येथील अनु. जामतीच्या ६१७ शेतकऱ्यांना वनहक्क समितीच्या माध्यमातून केरामेरी मंडल, कुमराम भीम असिफाबाद जिल्ह्याचे जिल्हा वनअधिकारी, प्रकल्प अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त सहीचे वैयक्तिक वनहक्काचे पट्टे वितरीत केले.

टॅग्स :SocialसामाजिकFarmerशेतकरीGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रTelanganaतेलंगणा