ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांची घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 05:00 AM2020-12-16T05:00:00+5:302020-12-16T05:00:26+5:30

 जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा व डाळवगीर्य पिके घेतली जातात. यंदा गव्हाचे क्षेत्र ८ हजार ४२४ हेक्टर झाले आहे. गत हंगामाच्या तुलनेत लागवड क्षेत्र वाढले. शासनाकडून हरभरा बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. महाबीजनेही यंदा पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे सिंचनाची अल्प सुविधा असणारे शेतकरीही या बियाण्यांचा लाभ घेऊन लागवड केली. परिणामी, हरभ-याचे लागवड क्षेत्र ३५ हजार  १९० हेक्टर  झाले.

Take care of rabi crops due to cloudy weather | ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांची घ्या काळजी

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांची घ्या काळजी

googlenewsNext
ठळक मुद्दे उत्पादन घटण्याची भीती : गहू, हरभरा पिके धोक्यात

  लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व भात लागवडीचे क्षेत्र मोठे असते. १५ पैकी चार तालुक्यात अजुनही सिंचनाच्या सुविधा वाढल्या नाही. त्यामुळे खरीपातील लागवड क्षेत्र अन्य तालुक्यांच्या तुलनेत अल्प असते. सध्या धानाचे चुरणे अंतिम टप्प्यात आहेत. कपाशीची काढणी सुरू आहे. दरम्यान, या आठवड्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले.  रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे या पिकांना जपण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
 जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा व डाळवगीर्य पिके घेतली जातात. यंदा गव्हाचे क्षेत्र ८ हजार ४२४ हेक्टर झाले आहे. गत हंगामाच्या तुलनेत लागवड क्षेत्र वाढले. शासनाकडून हरभरा बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. महाबीजनेही यंदा पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे सिंचनाची अल्प सुविधा असणारे शेतकरीही या बियाण्यांचा लाभ घेऊन लागवड केली. परिणामी, हरभ-याचे लागवड क्षेत्र ३५ हजार  १९० हेक्टर  झाले.  रब्बी हंगामात वाढलेला हरभरा पेरा नोंद घेण्यासारखाच आहे. परंतु, या आठवड्यात अचानक ढगाळ वातावरण झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कायार्लयाने शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी पथक तयार केले आहेत.

ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता निर्माण होतो. पिकांना वाचविण्यासाठी काय काळजी घ्यावी, हे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, ग्रामीण विकास कृषी व कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीतर्फे तयार केलेली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहे.
- डाॅ. उदय पाटील, 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

हरभरा लागवड करणारे शेतकरी चिंतातूर  
यंदा हरभरा लागवड करणारे शेतकरी या हंगामात वाढले आहेत.  काही ठिकाणी हरभरा पिकाला शेंगा लागत आहे. सध्या तरी कोणत्याही कीड रोगाची लागण झाली नाही. शेंगा अद्याप परिपक्व झाल्या नाही. अशा स्थितीत अकाली पाऊस पडल्यास नुकसान हाेण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.

पाणी व खताच्या मात्रेकडे दुर्लक्ष नको 
ढगाळ वातावरणामुळे कीडरोग उद्भवण्याचा धोका आहे. अशावेळी शेतक-यांनी पिकांना अतिरिक्त पाणी देऊ नये. शिवाय, खतांची मात्रा देताना कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मात्र चुकीची कीडनाशके वापरू नये. कृषी विभागाला सूचना देऊन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: Take care of rabi crops due to cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती