शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

सायफन तंत्राने ७०० एकर शेतीचे सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:08 IST

तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्के पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावातील तलाव कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देपालेबारा येथील शेतकºयांचे कष्ट : विजेविना सुरू असते पाण्याचा प्रवाह

उदय गडकरी ।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्के पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावातील तलाव कोरडे पडले आहेत. तर कित्येक ठिकाणातील तलाव अर्धेच भरल्याने धानाचे पीक घेणाºया शेतकºयांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती सावली तालुक्यातील पालेबारसा गावाची आहे.डोक्यावरुन गोसीखुर्द प्रकल्पाचा कालवा वाहत असताना सुद्धा पालेबारसा येथील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळू शकत नाही. या परिस्थितीचा गावकºयांनी विचार केला. आणि कोणत्याही परिस्थितीत नहराचे पाणी शेतापर्यंत पोहचवायचे यासाठी चंग बांधला. त्यांनी कालवा फोडून पाईप टाकायचे आणि सातशे एकर शेतीचे सिंचन करायचे, हे मनाशी पक्के केले. त्यासाठी गावकºयांनी लोकवर्गणीतून सुमारे एक लाख रुपयाचे पाईपही खरेदी केले व कालवा फोडण्याच्या तयारीला लागले. ही बाब गोसीखुर्द प्रकल्पाच्या अधिकाºयांना कळताच त्यांनी पालेबारसा येथील शेतकºयांना मज्जाव केला. मात्र ही बाब गावकºयांच्या पचनी पडली नाही. त्यात ते हतबल झाले. शेवटी काय करायचे, या विवंचनेत असतानाच गोसीखुर्दचे कार्यकारी अभियंता हटवार यांनी गावकºयांना सायफन तंत्राची कल्पना सुचविली. या बाबीला गावकरी तयार झाले. परंतु पाण्याचा उपसा करण्याची परवानगी मिळविण्यासाठी अडचण येत होती.शेवटी आमदार विजय वडेट्टीवार यांनी सहकार्य करुन सायफन तंत्राने पाण्याचा उपसा करण्याची परवानगी मिळवून दिली. त्यामुळे पालेबारसा परिसरातील सुमारे सातशे एकर शेती सिंचनाखाली येणार असल्याने सर्व गावकरी आनंदीत झाले आहेत.गेल्या दहा-बारा दिवसांपासून शंभर फुटाच्या १५ पाईपमधून रात्रंदिवस पाणी सुरु असून त्या पाण्याने गावातील तीन तलाव भरुन संपूर्ण शेती सिंचनाखाली आणण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. इंधन आणि विना यंत्राने, कोणताही विद्युत प्रवाह न वापरता दिवस-रात्र सतत पाणी सुरु आहे. त्यासाठी गावकरी मात्र आळीपाळीने परिश्रम करताना दिसतात. प्रस्तुत प्रतिनिधीने सायफन तंत्राची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली असता, नहराच्या काठावर पेट्रोमॅक्सवर चालणारे छोटे यंत्र ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला ते इंजीन सुरु करून पाईपमधून पाणी सोडण्यात येते. एकदा पाणी सुरु झाले की, इंजीन मधून पाणी जाणारा पाईप काढून टाकला जातो. अशाप्रकारे पंधरा पाईपमधून पाणी टाकण्याचे काम अविरत सुरू आहे. या पाईपांमधून निघणारे पाणी तीन किमी अंतरावर असलेल्या तलावांमध्ये सोडले जात आहे, हे विशेष!तसे हे तंत्रज्ञान जुनेच असले तरी (तोंडावारे छोट्या पाईपातून कोणताही द्रव पदार्थ ओढण्याची पद्धत) बहुतेक एवढ्या मोठ्या प्रमाणात सायफन तंत्राद्वारे पाण्याचा उपसा करण्याची शक्यतो पहिलीच घटना असावी. गावकºयांच्या एकजुटीने व लोकसहभागातून कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाने सातशे एकर शेती सिंचनाखाली येणार असल्याने गावकºयांत आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर्षी तरी चांगले उत्पादन होईल, अशी शेतकºयांना आशा आहे.