शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सायफन तंत्राने ७०० एकर शेतीचे सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:08 IST

तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्के पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावातील तलाव कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देपालेबारा येथील शेतकºयांचे कष्ट : विजेविना सुरू असते पाण्याचा प्रवाह

उदय गडकरी ।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्के पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावातील तलाव कोरडे पडले आहेत. तर कित्येक ठिकाणातील तलाव अर्धेच भरल्याने धानाचे पीक घेणाºया शेतकºयांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती सावली तालुक्यातील पालेबारसा गावाची आहे.डोक्यावरुन गोसीखुर्द प्रकल्पाचा कालवा वाहत असताना सुद्धा पालेबारसा येथील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळू शकत नाही. या परिस्थितीचा गावकºयांनी विचार केला. आणि कोणत्याही परिस्थितीत नहराचे पाणी शेतापर्यंत पोहचवायचे यासाठी चंग बांधला. त्यांनी कालवा फोडून पाईप टाकायचे आणि सातशे एकर शेतीचे सिंचन करायचे, हे मनाशी पक्के केले. त्यासाठी गावकºयांनी लोकवर्गणीतून सुमारे एक लाख रुपयाचे पाईपही खरेदी केले व कालवा फोडण्याच्या तयारीला लागले. ही बाब गोसीखुर्द प्रकल्पाच्या अधिकाºयांना कळताच त्यांनी पालेबारसा येथील शेतकºयांना मज्जाव केला. मात्र ही बाब गावकºयांच्या पचनी पडली नाही. त्यात ते हतबल झाले. शेवटी काय करायचे, या विवंचनेत असतानाच गोसीखुर्दचे कार्यकारी अभियंता हटवार यांनी गावकºयांना सायफन तंत्राची कल्पना सुचविली. या बाबीला गावकरी तयार झाले. परंतु पाण्याचा उपसा करण्याची परवानगी मिळविण्यासाठी अडचण येत होती.शेवटी आमदार विजय वडेट्टीवार यांनी सहकार्य करुन सायफन तंत्राने पाण्याचा उपसा करण्याची परवानगी मिळवून दिली. त्यामुळे पालेबारसा परिसरातील सुमारे सातशे एकर शेती सिंचनाखाली येणार असल्याने सर्व गावकरी आनंदीत झाले आहेत.गेल्या दहा-बारा दिवसांपासून शंभर फुटाच्या १५ पाईपमधून रात्रंदिवस पाणी सुरु असून त्या पाण्याने गावातील तीन तलाव भरुन संपूर्ण शेती सिंचनाखाली आणण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. इंधन आणि विना यंत्राने, कोणताही विद्युत प्रवाह न वापरता दिवस-रात्र सतत पाणी सुरु आहे. त्यासाठी गावकरी मात्र आळीपाळीने परिश्रम करताना दिसतात. प्रस्तुत प्रतिनिधीने सायफन तंत्राची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली असता, नहराच्या काठावर पेट्रोमॅक्सवर चालणारे छोटे यंत्र ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला ते इंजीन सुरु करून पाईपमधून पाणी सोडण्यात येते. एकदा पाणी सुरु झाले की, इंजीन मधून पाणी जाणारा पाईप काढून टाकला जातो. अशाप्रकारे पंधरा पाईपमधून पाणी टाकण्याचे काम अविरत सुरू आहे. या पाईपांमधून निघणारे पाणी तीन किमी अंतरावर असलेल्या तलावांमध्ये सोडले जात आहे, हे विशेष!तसे हे तंत्रज्ञान जुनेच असले तरी (तोंडावारे छोट्या पाईपातून कोणताही द्रव पदार्थ ओढण्याची पद्धत) बहुतेक एवढ्या मोठ्या प्रमाणात सायफन तंत्राद्वारे पाण्याचा उपसा करण्याची शक्यतो पहिलीच घटना असावी. गावकºयांच्या एकजुटीने व लोकसहभागातून कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाने सातशे एकर शेती सिंचनाखाली येणार असल्याने गावकºयांत आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर्षी तरी चांगले उत्पादन होईल, अशी शेतकºयांना आशा आहे.