शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

सायफन तंत्राने ७०० एकर शेतीचे सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:08 IST

तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्के पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावातील तलाव कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देपालेबारा येथील शेतकºयांचे कष्ट : विजेविना सुरू असते पाण्याचा प्रवाह

उदय गडकरी ।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्के पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावातील तलाव कोरडे पडले आहेत. तर कित्येक ठिकाणातील तलाव अर्धेच भरल्याने धानाचे पीक घेणाºया शेतकºयांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती सावली तालुक्यातील पालेबारसा गावाची आहे.डोक्यावरुन गोसीखुर्द प्रकल्पाचा कालवा वाहत असताना सुद्धा पालेबारसा येथील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळू शकत नाही. या परिस्थितीचा गावकºयांनी विचार केला. आणि कोणत्याही परिस्थितीत नहराचे पाणी शेतापर्यंत पोहचवायचे यासाठी चंग बांधला. त्यांनी कालवा फोडून पाईप टाकायचे आणि सातशे एकर शेतीचे सिंचन करायचे, हे मनाशी पक्के केले. त्यासाठी गावकºयांनी लोकवर्गणीतून सुमारे एक लाख रुपयाचे पाईपही खरेदी केले व कालवा फोडण्याच्या तयारीला लागले. ही बाब गोसीखुर्द प्रकल्पाच्या अधिकाºयांना कळताच त्यांनी पालेबारसा येथील शेतकºयांना मज्जाव केला. मात्र ही बाब गावकºयांच्या पचनी पडली नाही. त्यात ते हतबल झाले. शेवटी काय करायचे, या विवंचनेत असतानाच गोसीखुर्दचे कार्यकारी अभियंता हटवार यांनी गावकºयांना सायफन तंत्राची कल्पना सुचविली. या बाबीला गावकरी तयार झाले. परंतु पाण्याचा उपसा करण्याची परवानगी मिळविण्यासाठी अडचण येत होती.शेवटी आमदार विजय वडेट्टीवार यांनी सहकार्य करुन सायफन तंत्राने पाण्याचा उपसा करण्याची परवानगी मिळवून दिली. त्यामुळे पालेबारसा परिसरातील सुमारे सातशे एकर शेती सिंचनाखाली येणार असल्याने सर्व गावकरी आनंदीत झाले आहेत.गेल्या दहा-बारा दिवसांपासून शंभर फुटाच्या १५ पाईपमधून रात्रंदिवस पाणी सुरु असून त्या पाण्याने गावातील तीन तलाव भरुन संपूर्ण शेती सिंचनाखाली आणण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. इंधन आणि विना यंत्राने, कोणताही विद्युत प्रवाह न वापरता दिवस-रात्र सतत पाणी सुरु आहे. त्यासाठी गावकरी मात्र आळीपाळीने परिश्रम करताना दिसतात. प्रस्तुत प्रतिनिधीने सायफन तंत्राची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली असता, नहराच्या काठावर पेट्रोमॅक्सवर चालणारे छोटे यंत्र ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला ते इंजीन सुरु करून पाईपमधून पाणी सोडण्यात येते. एकदा पाणी सुरु झाले की, इंजीन मधून पाणी जाणारा पाईप काढून टाकला जातो. अशाप्रकारे पंधरा पाईपमधून पाणी टाकण्याचे काम अविरत सुरू आहे. या पाईपांमधून निघणारे पाणी तीन किमी अंतरावर असलेल्या तलावांमध्ये सोडले जात आहे, हे विशेष!तसे हे तंत्रज्ञान जुनेच असले तरी (तोंडावारे छोट्या पाईपातून कोणताही द्रव पदार्थ ओढण्याची पद्धत) बहुतेक एवढ्या मोठ्या प्रमाणात सायफन तंत्राद्वारे पाण्याचा उपसा करण्याची शक्यतो पहिलीच घटना असावी. गावकºयांच्या एकजुटीने व लोकसहभागातून कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाने सातशे एकर शेती सिंचनाखाली येणार असल्याने गावकºयांत आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर्षी तरी चांगले उत्पादन होईल, अशी शेतकºयांना आशा आहे.