शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

शेतकऱ्यांची अशीही बोळवण

By admin | Updated: May 25, 2017 00:32 IST

निसर्गाचा लहरीपणा व त्यामुळे सततची नापिकी व त्यातच कर्जफेडीचे ओझे या विवंचनेत शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

पीक विमा : घामाचा पैसा विमा कंपन्यांच्या घशातलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निसर्गाचा लहरीपणा व त्यामुळे सततची नापिकी व त्यातच कर्जफेडीचे ओझे या विवंचनेत शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मरण येत नाही म्हणून तो कसाबसा जीवन जगत आहे. या आर्थिक संकटाचा सामना करीत असताना त्याला अस्मानी व सुलतानी संकटसुद्धा पेलावे लागत आहे. हातात आलेले पीक हिरावल्या जात आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाच्या कळा बळीराजाला सहन कराव्या लागत आहे. याही बिकट परिस्थितीत शेतकरी हा पीक विम्याचा हप्ता भरत आहे. यातून जमीनदोस्त झालेल्या पिकाची नुकसानभरपाई मिळेल ही आशा आहे. पण, या विम्यासाठी पात्र असतानाही त्यांची पुरती बोळवण केली जात आहे. विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याने त्यांच्यात कमालीचा आक्रोश पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा घामाचा पैसा विमा कंपनीच्या घशात गेल्याने ते मालामाल झाले आहे. या व्यवस्थेला प्रशासनातील अनास्था जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. कृषी कर्मचारी व तलाठी हे कार्यालयात बसून पिकाची आकडेमोड करून नोंद करीत असल्याने शेतकरी हक्काच्या लाभापासून वंचित राहिला आहे.राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी १८ सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून पीक विमा उतरविला आहे. २५०० ते ५००० पर्यंतचा विमा हप्ता सक्तीने वसूल केला गेला. यात २ कोटीपेक्षा जास्त विम्याची रक्कम वसूल केली गेली. या विम्यातून पिकाची नुकसानभरपाई मिळेल ही आशा होती. पण, ५० पेक्षा जास्त कशी गेली हा एक गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. करोडो रुपयाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कवडीसुद्धा मिळाली नाही. मागील २ ते ३ वर्षांपासून शेतकऱ्यांवर ओला व कोरडा दुष्काळाची गडद छाया पडली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला सहन करावा लागत आहे. अवकाळी पावसाने हातच्या पिकावर संक्रांत येत आहे. सततच्या नापिकीने तो पुरता बेजार झाला आहे. त्यातच कर्जाच्या ओझ्यामुळे तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. तरीही शेतकऱ्याला चिमटा लावून पीकविमा उतरवित आहे. पण, या आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला पीकविम्याचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. घामाचा पैसा विमा हप्त्यात देऊनदेखील शेतकरी पात्र ठरत असतानाही त्याला या योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. या अन्यायामुळे शेतकरी पुरता हवालदिल व मेटाकुटीस आला आहे. राजुरा तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला पीकविम्याचा लाभ मिळाला नाही, हे विशेष.दोन कोटीवर रक्कमराजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी १८ सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून पीक विमा उतरविला आहे. २५०० ते ५००० पर्यंतचा विमा हप्ता सक्तीने वसूल केला गेला. यात २ कोटीपेक्षा जास्त विम्याची रक्कम वसूल केली गेली.