शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

शेतकऱ्यांची अशीही बोळवण

By admin | Updated: May 25, 2017 00:32 IST

निसर्गाचा लहरीपणा व त्यामुळे सततची नापिकी व त्यातच कर्जफेडीचे ओझे या विवंचनेत शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

पीक विमा : घामाचा पैसा विमा कंपन्यांच्या घशातलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निसर्गाचा लहरीपणा व त्यामुळे सततची नापिकी व त्यातच कर्जफेडीचे ओझे या विवंचनेत शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मरण येत नाही म्हणून तो कसाबसा जीवन जगत आहे. या आर्थिक संकटाचा सामना करीत असताना त्याला अस्मानी व सुलतानी संकटसुद्धा पेलावे लागत आहे. हातात आलेले पीक हिरावल्या जात आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाच्या कळा बळीराजाला सहन कराव्या लागत आहे. याही बिकट परिस्थितीत शेतकरी हा पीक विम्याचा हप्ता भरत आहे. यातून जमीनदोस्त झालेल्या पिकाची नुकसानभरपाई मिळेल ही आशा आहे. पण, या विम्यासाठी पात्र असतानाही त्यांची पुरती बोळवण केली जात आहे. विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याने त्यांच्यात कमालीचा आक्रोश पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा घामाचा पैसा विमा कंपनीच्या घशात गेल्याने ते मालामाल झाले आहे. या व्यवस्थेला प्रशासनातील अनास्था जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. कृषी कर्मचारी व तलाठी हे कार्यालयात बसून पिकाची आकडेमोड करून नोंद करीत असल्याने शेतकरी हक्काच्या लाभापासून वंचित राहिला आहे.राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी १८ सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून पीक विमा उतरविला आहे. २५०० ते ५००० पर्यंतचा विमा हप्ता सक्तीने वसूल केला गेला. यात २ कोटीपेक्षा जास्त विम्याची रक्कम वसूल केली गेली. या विम्यातून पिकाची नुकसानभरपाई मिळेल ही आशा होती. पण, ५० पेक्षा जास्त कशी गेली हा एक गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. करोडो रुपयाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कवडीसुद्धा मिळाली नाही. मागील २ ते ३ वर्षांपासून शेतकऱ्यांवर ओला व कोरडा दुष्काळाची गडद छाया पडली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला सहन करावा लागत आहे. अवकाळी पावसाने हातच्या पिकावर संक्रांत येत आहे. सततच्या नापिकीने तो पुरता बेजार झाला आहे. त्यातच कर्जाच्या ओझ्यामुळे तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. तरीही शेतकऱ्याला चिमटा लावून पीकविमा उतरवित आहे. पण, या आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला पीकविम्याचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. घामाचा पैसा विमा हप्त्यात देऊनदेखील शेतकरी पात्र ठरत असतानाही त्याला या योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. या अन्यायामुळे शेतकरी पुरता हवालदिल व मेटाकुटीस आला आहे. राजुरा तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला पीकविम्याचा लाभ मिळाला नाही, हे विशेष.दोन कोटीवर रक्कमराजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी १८ सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून पीक विमा उतरविला आहे. २५०० ते ५००० पर्यंतचा विमा हप्ता सक्तीने वसूल केला गेला. यात २ कोटीपेक्षा जास्त विम्याची रक्कम वसूल केली गेली.