शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

खनिज निधीच्या नियमबाह्य खर्चाची एसआयटी चौकशी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:08 IST

नरेश पुगलिया : पालकमंत्र्यांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खनिज विकास निधी खर्चाच्या नियमांना बगल देत चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच वर्षात शेकडो कोटी रुपये नियमबाह्य खर्च करण्यात आल्याचा आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला आहे. सोमवारी (१४ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची जोरदार मागणी केली.

नियमांनुसार, खनिज विकास निधी प्रामुख्याने प्रकल्प क्षेत्राच्या १५ किमी परिसरात ७०टक्के आणि त्यालगतच्या १० किमी भागात ३० टक्के या प्रमाणात २५ किमी परिसरातच १०० टक्के निधी खर्च करणे आवश्यक आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात गत पाच वर्षात शेकडो कोटी निधी नियमबाह्य खर्च करण्यात आला. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्ह्यातील बँकांमध्ये ८६५ कोटी रुपये खनिज विकास निधी शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.

या निधीवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे व्याज मिळत असताना, इरई आणि झरपट नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी का वापरला जात नाही, असा सवाल करत, नवीन पालकमंत्र्यांना निधीच्या वापराबाबत अंधारात ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्हा आर्थिकदृष्ट्या कमकुमत दाखवत जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार द्यावा असे आवाहन केले आहे. हे कितपत योग्य आहे, याकडेही पुगलिया यांनी लक्ष वेधले आहे. 

झरपट व इरई पुनरुज्जीवनासाठी ३०० कोटी द्यावेचंद्रपूर महानगरपालिकेला दाताळा येथे इरई नदीच्या पुलाजवळ विसर्जन टाके निर्माण व सांडपाणी प्रकल्प दुरुस्तीकरिता कोट्यवधी रुपये मायनिंग रायल्टीमधून देण्यात येत आहे. असे असताना इरई व झरपट नदीच्या संरक्षण भिंत, बंधारे, खोलीकरण व सौंदर्याकरण व विकासासाठी ३०० कोटी का दिले जात नाहीत, याबाबत पालकमंत्री अशोक उईके यांना सविस्तर माहिती का दिली जात नाही, खनिज निधीचे ८६५ कोटी रुपये बँकेत जमा आहेत, ही बाब का लपवून ठेवली, चंद्रपूर जिल्ह्याला दारिद्रध जिल्हा भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा जिल्ह्याचा अपमान आहे, असा आरोपही नरेश पुगलिया यांनी केला.

वेकोलिने तीन वर्षांत दिले ६०० कोटीमहाराष्ट्रात सर्वाधिक ४०० कोटींचा खनिज निधी दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्याला मिळतो. यामध्ये चंद्रपूर, राजुरा, कोरपना, वरोरा व भद्रावती या तालुक्यांतून ८० टक्के वाटा वेकोलिचा आहे. २० टक्के वाटा सिमेंट कारखान्यांचा आहे. एकट्या वेकालिने मागील तीन वर्षात ६०० कोटी रुपये खनिज निधी दिला आहे. या भागातील आमदार याचा सदुपयोग करीत नाही हे दुर्दैव असल्याचे पुगलिया म्हणाले.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर