शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खनिज निधीच्या नियमबाह्य खर्चाची एसआयटी चौकशी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:08 IST

नरेश पुगलिया : पालकमंत्र्यांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खनिज विकास निधी खर्चाच्या नियमांना बगल देत चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच वर्षात शेकडो कोटी रुपये नियमबाह्य खर्च करण्यात आल्याचा आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला आहे. सोमवारी (१४ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची जोरदार मागणी केली.

नियमांनुसार, खनिज विकास निधी प्रामुख्याने प्रकल्प क्षेत्राच्या १५ किमी परिसरात ७०टक्के आणि त्यालगतच्या १० किमी भागात ३० टक्के या प्रमाणात २५ किमी परिसरातच १०० टक्के निधी खर्च करणे आवश्यक आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात गत पाच वर्षात शेकडो कोटी निधी नियमबाह्य खर्च करण्यात आला. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्ह्यातील बँकांमध्ये ८६५ कोटी रुपये खनिज विकास निधी शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.

या निधीवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे व्याज मिळत असताना, इरई आणि झरपट नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी का वापरला जात नाही, असा सवाल करत, नवीन पालकमंत्र्यांना निधीच्या वापराबाबत अंधारात ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्हा आर्थिकदृष्ट्या कमकुमत दाखवत जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार द्यावा असे आवाहन केले आहे. हे कितपत योग्य आहे, याकडेही पुगलिया यांनी लक्ष वेधले आहे. 

झरपट व इरई पुनरुज्जीवनासाठी ३०० कोटी द्यावेचंद्रपूर महानगरपालिकेला दाताळा येथे इरई नदीच्या पुलाजवळ विसर्जन टाके निर्माण व सांडपाणी प्रकल्प दुरुस्तीकरिता कोट्यवधी रुपये मायनिंग रायल्टीमधून देण्यात येत आहे. असे असताना इरई व झरपट नदीच्या संरक्षण भिंत, बंधारे, खोलीकरण व सौंदर्याकरण व विकासासाठी ३०० कोटी का दिले जात नाहीत, याबाबत पालकमंत्री अशोक उईके यांना सविस्तर माहिती का दिली जात नाही, खनिज निधीचे ८६५ कोटी रुपये बँकेत जमा आहेत, ही बाब का लपवून ठेवली, चंद्रपूर जिल्ह्याला दारिद्रध जिल्हा भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा जिल्ह्याचा अपमान आहे, असा आरोपही नरेश पुगलिया यांनी केला.

वेकोलिने तीन वर्षांत दिले ६०० कोटीमहाराष्ट्रात सर्वाधिक ४०० कोटींचा खनिज निधी दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्याला मिळतो. यामध्ये चंद्रपूर, राजुरा, कोरपना, वरोरा व भद्रावती या तालुक्यांतून ८० टक्के वाटा वेकोलिचा आहे. २० टक्के वाटा सिमेंट कारखान्यांचा आहे. एकट्या वेकालिने मागील तीन वर्षात ६०० कोटी रुपये खनिज निधी दिला आहे. या भागातील आमदार याचा सदुपयोग करीत नाही हे दुर्दैव असल्याचे पुगलिया म्हणाले.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर