शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

खनिज निधीच्या नियमबाह्य खर्चाची एसआयटी चौकशी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:08 IST

नरेश पुगलिया : पालकमंत्र्यांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खनिज विकास निधी खर्चाच्या नियमांना बगल देत चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच वर्षात शेकडो कोटी रुपये नियमबाह्य खर्च करण्यात आल्याचा आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला आहे. सोमवारी (१४ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची जोरदार मागणी केली.

नियमांनुसार, खनिज विकास निधी प्रामुख्याने प्रकल्प क्षेत्राच्या १५ किमी परिसरात ७०टक्के आणि त्यालगतच्या १० किमी भागात ३० टक्के या प्रमाणात २५ किमी परिसरातच १०० टक्के निधी खर्च करणे आवश्यक आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात गत पाच वर्षात शेकडो कोटी निधी नियमबाह्य खर्च करण्यात आला. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्ह्यातील बँकांमध्ये ८६५ कोटी रुपये खनिज विकास निधी शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.

या निधीवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे व्याज मिळत असताना, इरई आणि झरपट नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी का वापरला जात नाही, असा सवाल करत, नवीन पालकमंत्र्यांना निधीच्या वापराबाबत अंधारात ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्हा आर्थिकदृष्ट्या कमकुमत दाखवत जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार द्यावा असे आवाहन केले आहे. हे कितपत योग्य आहे, याकडेही पुगलिया यांनी लक्ष वेधले आहे. 

झरपट व इरई पुनरुज्जीवनासाठी ३०० कोटी द्यावेचंद्रपूर महानगरपालिकेला दाताळा येथे इरई नदीच्या पुलाजवळ विसर्जन टाके निर्माण व सांडपाणी प्रकल्प दुरुस्तीकरिता कोट्यवधी रुपये मायनिंग रायल्टीमधून देण्यात येत आहे. असे असताना इरई व झरपट नदीच्या संरक्षण भिंत, बंधारे, खोलीकरण व सौंदर्याकरण व विकासासाठी ३०० कोटी का दिले जात नाहीत, याबाबत पालकमंत्री अशोक उईके यांना सविस्तर माहिती का दिली जात नाही, खनिज निधीचे ८६५ कोटी रुपये बँकेत जमा आहेत, ही बाब का लपवून ठेवली, चंद्रपूर जिल्ह्याला दारिद्रध जिल्हा भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा जिल्ह्याचा अपमान आहे, असा आरोपही नरेश पुगलिया यांनी केला.

वेकोलिने तीन वर्षांत दिले ६०० कोटीमहाराष्ट्रात सर्वाधिक ४०० कोटींचा खनिज निधी दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्याला मिळतो. यामध्ये चंद्रपूर, राजुरा, कोरपना, वरोरा व भद्रावती या तालुक्यांतून ८० टक्के वाटा वेकोलिचा आहे. २० टक्के वाटा सिमेंट कारखान्यांचा आहे. एकट्या वेकालिने मागील तीन वर्षात ६०० कोटी रुपये खनिज निधी दिला आहे. या भागातील आमदार याचा सदुपयोग करीत नाही हे दुर्दैव असल्याचे पुगलिया म्हणाले.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर