शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सिंदेवाहीला लवकरच कृषी महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:26 IST

सिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शनिवारी पार पडला. यावेळी ...

सिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शनिवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य गणेश कंडारकर, स्नेहा हरडे, विनायक सरनाईक, मोरेश्वर वानखेडे, डॉ. व्ही के खर्चे, सरेंद्र काळबांडे, रजनी लोणारे, आशा गंडाटे, मंदा बाळबुद्धे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. अनिल कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या विकासासाठी येत्या चार वर्षात डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येऊन विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलविण्यात येईल. सिंदेवाही येथील कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रासाठी १५ कोटी रुपये खर्चून नवीन प्रशासकीय इमारत उभी होणार आहे. यापूर्वीची इमारत १९११ ची होती १०९ वर्षानी नवीन इमारत बांधण्यात येत आहे, येथून विकासाचे नवीन पर्व सुरू होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या केंद्राला उपसा सिंचन प्रकल्पासाठीदेखील निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्राद्वारे शेती करून आपला वेळ व श्रम वाचवावे, त्यातूनच शेतीवरील लागत व मनुष्यबळावरील खर्च कमी होऊन आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, हे सांगताना पालकमंत्री यांनी अमेरिकेत २०० एकर शेती चार लोक आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करतात याचे उदाहरण दिले.

गोसेखुर्द सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यातून निर्माण होणाऱ्या सिंचनाचा सर्वाधिक फायदा ब्रह्मपुरी विभागात होणार असून ब्रह्मपुरी विभाग महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षमता असलेला विभाग म्हणून नावारूपास येईल असेही प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

तत्पूर्वी कुलगुरू डॉ. भाले यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या धान पिकांच्या वाणांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

संचालन डॉ. सोनाली लोखंडे तर आभार डॉ. मदन वांढरे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे शास्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते.